शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

पिंपरी चिंचवडच्या शांतता क्षेत्राबाबत महापालिका आणि पोलीस अनाभिज्ञ; कारवाई होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:10 IST

शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये तसेच निवासी भाग अशा काही ठिकाणांना काही वर्षांपूर्वी शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केले

नारायण बडगुजर

पिंपरी : शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये तसेच निवासी भाग अशा काही ठिकाणांना काही वर्षांपूर्वी शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केले. महापालिकेने त्याबाबत फलक देखील लावले. मात्र, ते फलक सध्या अडगळीत आहेत. तसेच या क्षेत्रात शांतता भंग होत असूनही त्याबाबत कारवाई होत नाही. त्यासाठी यंत्रणा असल्याचेही दिसून येत नाही.

शहरात विविध कार्यक्रम, सोहळे होतात. त्यात डीजेसह इतर वाद्ये वाजविली जातात. तसेच शहरातील बहुतांश अंतर्गत रस्तेही प्रशस्त असून वाहने दामटली जातात. त्यामुळे हाॅर्न व रहदारीमुळे होणारे ध्वनीप्रदूषण शांतता क्षेत्रात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होते. 

पोलीस आयुक्तालय झाले, आढाव्याचे काय?

पिंपरी-चिंचवड शहरासाठी २०१८ मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. मात्र, त्यानंतर एकदाही महापालिका आणि पोलिसांकडून शांतता क्षेत्रांबाबत आढावा घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील शांतता क्षेत्र किती आहेत, याची अद्ययावत माहिती उपलब्ध होत नाही. 

कोट्यवधींच्या रुग्णालयासाठी नाही हजाराचा फलक

महापालिकेतर्फे शहरात पिंपरीगाव, भोसरी, चिंचवडगाव, थेरगाव आदी ठिकाणी सुसज्ज रुग्णालयांची उभारणी करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र या रुग्णालयांच्या परिसरात शांतता क्षेत्राचे फलक लावण्यात आलेले नाहीत. यावरून प्रशासनाची उदासीनता दिसून येते. 

फलक अतिक्रमणाच्या विळख्यात

महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाच्या बाहेर शांतता क्षेत्राचे फलक आहेत. मात्र हे फलक अडगळीत आहेत. या फलकांना अतिक्रमणांचा विळखा आहे. त्यामुळे हे फलक सहज दिसून येत नाहीत. शहरातील इतर ठिकाणच्या बहुतांश फलकांची अशीच दुरवस्था झाली आहे. काही फलक जीर्ण झाले आहेत. 

ठळक माहितीची आवश्यकता

शांतता क्षेत्राचा फलक मोठा असवा तसेच त्यावर माहिती व सूचना ठळकपणे नमूद केलेली असातवी. तसेच संबंधित फलक दर्शनी भागात वाहनचालक व नागरिकांना सहज दिसून येईल अशा पद्धतीने लावणे आवश्यक आहे. 

शहरात शांतता क्षेत्र नेमके किती?

शहरात काही ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आणि रहिवासी भाग एकाच परिसरात असल्याचे दिसून येते. यातील सध्या किती ठिकाणी शांतता क्षेत्र आहेत याची अद्ययावत नोंद प्रशासनाकडे नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत दरवर्षी आढावाही घेतला जात नाही. 

शांतता क्षेत्रात मर्यादा किती?

नियमानुसार शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्रीला ४० डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तर रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ तर रात्रीला ४५ डेसिबल, विपणन क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्रीला ५५ डेसिबलची मर्यादा आहे. मर्यादेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई होऊ शकते. 

दंडात्मक कारवा्ईसह तरतूद

सर्वोच्य न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन १९८६ व ध्वनीप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदींचे सक्‍त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार रात्री दहापासून सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्‍त बंदी आहे. सकाळी सहापासून रात्री दहापर्यंतसुदधा लाऊडस्पीकर, फटाके, वाद्ये आदींवर मर्यादा आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास ५ वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यानंतरही गुन्हे सुरू राहिल्यास प्रत्येक दिवसाला ५ हजारांचा दंड व ७ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

एकावरही नाही कारवाई

शहरात विविध कार्यक्रमात डीजे वापरला जातो. हे महापालिका, पोलीस प्रशासनालाही माहीत आहे. मात्र कारवाई एकावरही झाली नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस