शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पिंपरी चिंचवडच्या शांतता क्षेत्राबाबत महापालिका आणि पोलीस अनाभिज्ञ; कारवाई होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:10 IST

शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये तसेच निवासी भाग अशा काही ठिकाणांना काही वर्षांपूर्वी शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केले

नारायण बडगुजर

पिंपरी : शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये तसेच निवासी भाग अशा काही ठिकाणांना काही वर्षांपूर्वी शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केले. महापालिकेने त्याबाबत फलक देखील लावले. मात्र, ते फलक सध्या अडगळीत आहेत. तसेच या क्षेत्रात शांतता भंग होत असूनही त्याबाबत कारवाई होत नाही. त्यासाठी यंत्रणा असल्याचेही दिसून येत नाही.

शहरात विविध कार्यक्रम, सोहळे होतात. त्यात डीजेसह इतर वाद्ये वाजविली जातात. तसेच शहरातील बहुतांश अंतर्गत रस्तेही प्रशस्त असून वाहने दामटली जातात. त्यामुळे हाॅर्न व रहदारीमुळे होणारे ध्वनीप्रदूषण शांतता क्षेत्रात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होते. 

पोलीस आयुक्तालय झाले, आढाव्याचे काय?

पिंपरी-चिंचवड शहरासाठी २०१८ मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. मात्र, त्यानंतर एकदाही महापालिका आणि पोलिसांकडून शांतता क्षेत्रांबाबत आढावा घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील शांतता क्षेत्र किती आहेत, याची अद्ययावत माहिती उपलब्ध होत नाही. 

कोट्यवधींच्या रुग्णालयासाठी नाही हजाराचा फलक

महापालिकेतर्फे शहरात पिंपरीगाव, भोसरी, चिंचवडगाव, थेरगाव आदी ठिकाणी सुसज्ज रुग्णालयांची उभारणी करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र या रुग्णालयांच्या परिसरात शांतता क्षेत्राचे फलक लावण्यात आलेले नाहीत. यावरून प्रशासनाची उदासीनता दिसून येते. 

फलक अतिक्रमणाच्या विळख्यात

महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाच्या बाहेर शांतता क्षेत्राचे फलक आहेत. मात्र हे फलक अडगळीत आहेत. या फलकांना अतिक्रमणांचा विळखा आहे. त्यामुळे हे फलक सहज दिसून येत नाहीत. शहरातील इतर ठिकाणच्या बहुतांश फलकांची अशीच दुरवस्था झाली आहे. काही फलक जीर्ण झाले आहेत. 

ठळक माहितीची आवश्यकता

शांतता क्षेत्राचा फलक मोठा असवा तसेच त्यावर माहिती व सूचना ठळकपणे नमूद केलेली असातवी. तसेच संबंधित फलक दर्शनी भागात वाहनचालक व नागरिकांना सहज दिसून येईल अशा पद्धतीने लावणे आवश्यक आहे. 

शहरात शांतता क्षेत्र नेमके किती?

शहरात काही ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आणि रहिवासी भाग एकाच परिसरात असल्याचे दिसून येते. यातील सध्या किती ठिकाणी शांतता क्षेत्र आहेत याची अद्ययावत नोंद प्रशासनाकडे नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत दरवर्षी आढावाही घेतला जात नाही. 

शांतता क्षेत्रात मर्यादा किती?

नियमानुसार शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्रीला ४० डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तर रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ तर रात्रीला ४५ डेसिबल, विपणन क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्रीला ५५ डेसिबलची मर्यादा आहे. मर्यादेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई होऊ शकते. 

दंडात्मक कारवा्ईसह तरतूद

सर्वोच्य न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन १९८६ व ध्वनीप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदींचे सक्‍त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार रात्री दहापासून सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्‍त बंदी आहे. सकाळी सहापासून रात्री दहापर्यंतसुदधा लाऊडस्पीकर, फटाके, वाद्ये आदींवर मर्यादा आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास ५ वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यानंतरही गुन्हे सुरू राहिल्यास प्रत्येक दिवसाला ५ हजारांचा दंड व ७ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

एकावरही नाही कारवाई

शहरात विविध कार्यक्रमात डीजे वापरला जातो. हे महापालिका, पोलीस प्रशासनालाही माहीत आहे. मात्र कारवाई एकावरही झाली नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस