शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

मुंबई-पुणे महामार्ग : थांबणाऱ्या वाहनांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 3:08 AM

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.

कामशेत : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच रस्त्याच्या बाजूला मोठी अवजड वाहने रांगेत उभी असतात. महामार्गाशेजारी असणा-या हॉटेल, ढाबा व इतरत्र थांबलेल्या या वाहनांची संख्या अधिक असते. या वाहनांमुळे महामार्गावरून धावणाºया इतर वाहनांसाठी रस्ता अरुंद होतो, रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषत: या थांबलेल्या वाहनांमुळे दुचाकीस्वारांसाठी मोठी अडचण निर्माण होत असून, अपघात होत आहेत. याकडे रस्ते महामंडळ व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महामार्गावर प्रवासादरम्यान आजपर्यंत अनेकांचे निष्कारण बळी गेले आहेत.महामार्गावर थांबलेल्या वाहनांवर दुसरे एखादे वाहन धडकून एखादा अपघात झाला की ही वाहने बाजूला केली जातात. तसेच नादुरुस्त वाहने भर रस्त्यावर उभी राहत असून येथे कोणत्याही प्रकारच्या सूचना अथवा फलक लावले जात नाहीत. वाहनाच्या मागील बाजूस एखाद्या झाडाची फांदी लटकावून ठेवली जाते. मात्र क्रेन अथवा इतर मार्गाने ते वाहन रस्त्यामधून बाजूला केले जात नाही.याचप्रमाणे महामार्गाच्या साईड पट्ट्यांवर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे इतर वाहनचालकांना त्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. यातूनही अनेकदा किरकोळ अपघात घडत असतात. कामशेतमधील पवनानगर फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्याने वळविण्यात आली आहे. या सेवारस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी अनेक अवजड व इतर वाहने उभी असतात. अगोदरच अरुंद असलेला सेवारस्ता त्यामुळे आणखी अरुंद होत असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यातूनच किरकोळ व मोठे अपघात नेहमीच घडत असून या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेPuneपुणेnewsबातम्या