शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक इंदोरी पूल मोजतोय शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 03:54 IST

तळेगाव दाभाडे -चाकण रस्त्यावरील इंदोरी येथे इंग्रजांनी बांधलेल्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक चिरेबंदी पुलाकडे पुरातत्त्व आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे -चाकण रस्त्यावरील इंदोरी येथे इंग्रजांनी बांधलेल्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक चिरेबंदी पुलाकडे पुरातत्त्व आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. दगडी चिरे गायब होणे, वृक्षतोड आदी कारणांमुळे या ऐतिहासिक ठेव्याची ऱ्हासाकडे वाटचाल सुरू आहे.तळेगाव-चाकण राज्य मार्ग ५५ वर इंद्रायणी नदीवर इंग्रजांनी दीडशे वर्षांपूर्वी सुमारे तीनशे मीटर लांबीचा पूल उभारला. हा मावळ तालुक्यातील एक महत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. कोकण आणि मुंबई बंदरातून वर देशाकडे होणाऱ्या वाहतुकीला सोयीचा म्हणून बैलगाड्यांसाठी इंग्रजांनी बांधलेल्या या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिश शासनाने थेट इंग्लंडहून पुणे जिल्हा प्रशासनाला त्या आशयाचे पत्र देखील पाठविले होते. तळेगाव स्टेशनचा जुना रेल्वे पूल आणि इंदोरीचा हा ऐतिहासिक पूल एकाच कालखंडात बांधले गेल्याचे जाणकार सांगतात. पुलाच्या मजबुतीकरणासाठी दोन्ही बाजूने रस्त्याकडेला नदीतीरावर वृक्षलागवड देखील ब्रिटिश शासनाने केली होती. इंदोरी बाह्यवळण रस्ता झाल्यानंतर नवीन पूल बांधल्यावर शासनाने या जुन्या पुलाकडे दुर्लक्ष केले आहे. पुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे १९९८ मध्ये ‘आ अब लौट चले’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण या पुलावर करण्यात आले होते. गाडी पुलावरून नदीत कोसळतानाचे चित्रीकरण करताना कठड्याची झालेली पडझड दुरुस्तीसाठी निर्मात्याने भरपाई दिली होती.भारदस्तपणा, बांधकाम कालावधी लक्षात घेता ऐतिहासिक ठेवा म्हणून पुरातत्त्व खात्याने पूल ताब्यात घेऊन जतन करावा, असे मत इतिहासप्रेमी, अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)सध्या पुलाची ऱ्हासाकडे वाटचाल सुरु असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इंदोरी ग्रामपंचायतीला मात्र याचे क ोणतेही सोयरसुतक दिसत नाही. सध्या फक्त इंदोरीकर आणि स्थानिक रहिवाशांकडून हलकी प्रवासी वाहने नेण्यासाठीच पुलाचा वापर होत आहे. रात्री दहानंतर पुलावरील वर्दळ जवळपास बंद होते. याचाच फायदा घेत चोर, भामटे पुलाच्या कडेची झाडे तोडत आहेत किंवा दगडी चिरे गायब करीत आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या बाहेरगावच्या पोल्ट्री फार्मच्या गाड्या मेलेल्या कोंबड्या व पिसे आणि घाण गुपचूप पुलाच्या बाजूला टाकत आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक पुलाच्या बांधकामाबरोबरच पाणी व नदीपात्र प्रदूषित होऊन इंद्रायणी नदीच्या पावित्र्यालाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. चोरांनी पुलाकडेची बहुतांश झाडे तोडून नेल्यामुळे आणि बांधकाम विभागाने कठडे न बांधल्याने ये-जा करणारी दुचाकी वा चारचाकी वाहने थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका आहे. ब्रिटिशकाळात हा पूल बांधण्यासाठी अवघे ३१ हजार ४३४ रुपये खर्च झाला होता. तशी कोनशिलाही पुलाच्या बांधकामावर आहे.