शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक इंदोरी पूल मोजतोय शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 03:54 IST

तळेगाव दाभाडे -चाकण रस्त्यावरील इंदोरी येथे इंग्रजांनी बांधलेल्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक चिरेबंदी पुलाकडे पुरातत्त्व आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे -चाकण रस्त्यावरील इंदोरी येथे इंग्रजांनी बांधलेल्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक चिरेबंदी पुलाकडे पुरातत्त्व आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. दगडी चिरे गायब होणे, वृक्षतोड आदी कारणांमुळे या ऐतिहासिक ठेव्याची ऱ्हासाकडे वाटचाल सुरू आहे.तळेगाव-चाकण राज्य मार्ग ५५ वर इंद्रायणी नदीवर इंग्रजांनी दीडशे वर्षांपूर्वी सुमारे तीनशे मीटर लांबीचा पूल उभारला. हा मावळ तालुक्यातील एक महत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. कोकण आणि मुंबई बंदरातून वर देशाकडे होणाऱ्या वाहतुकीला सोयीचा म्हणून बैलगाड्यांसाठी इंग्रजांनी बांधलेल्या या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिश शासनाने थेट इंग्लंडहून पुणे जिल्हा प्रशासनाला त्या आशयाचे पत्र देखील पाठविले होते. तळेगाव स्टेशनचा जुना रेल्वे पूल आणि इंदोरीचा हा ऐतिहासिक पूल एकाच कालखंडात बांधले गेल्याचे जाणकार सांगतात. पुलाच्या मजबुतीकरणासाठी दोन्ही बाजूने रस्त्याकडेला नदीतीरावर वृक्षलागवड देखील ब्रिटिश शासनाने केली होती. इंदोरी बाह्यवळण रस्ता झाल्यानंतर नवीन पूल बांधल्यावर शासनाने या जुन्या पुलाकडे दुर्लक्ष केले आहे. पुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे १९९८ मध्ये ‘आ अब लौट चले’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण या पुलावर करण्यात आले होते. गाडी पुलावरून नदीत कोसळतानाचे चित्रीकरण करताना कठड्याची झालेली पडझड दुरुस्तीसाठी निर्मात्याने भरपाई दिली होती.भारदस्तपणा, बांधकाम कालावधी लक्षात घेता ऐतिहासिक ठेवा म्हणून पुरातत्त्व खात्याने पूल ताब्यात घेऊन जतन करावा, असे मत इतिहासप्रेमी, अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)सध्या पुलाची ऱ्हासाकडे वाटचाल सुरु असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इंदोरी ग्रामपंचायतीला मात्र याचे क ोणतेही सोयरसुतक दिसत नाही. सध्या फक्त इंदोरीकर आणि स्थानिक रहिवाशांकडून हलकी प्रवासी वाहने नेण्यासाठीच पुलाचा वापर होत आहे. रात्री दहानंतर पुलावरील वर्दळ जवळपास बंद होते. याचाच फायदा घेत चोर, भामटे पुलाच्या कडेची झाडे तोडत आहेत किंवा दगडी चिरे गायब करीत आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या बाहेरगावच्या पोल्ट्री फार्मच्या गाड्या मेलेल्या कोंबड्या व पिसे आणि घाण गुपचूप पुलाच्या बाजूला टाकत आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक पुलाच्या बांधकामाबरोबरच पाणी व नदीपात्र प्रदूषित होऊन इंद्रायणी नदीच्या पावित्र्यालाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. चोरांनी पुलाकडेची बहुतांश झाडे तोडून नेल्यामुळे आणि बांधकाम विभागाने कठडे न बांधल्याने ये-जा करणारी दुचाकी वा चारचाकी वाहने थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका आहे. ब्रिटिशकाळात हा पूल बांधण्यासाठी अवघे ३१ हजार ४३४ रुपये खर्च झाला होता. तशी कोनशिलाही पुलाच्या बांधकामावर आहे.