शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

ऐतिहासिक इंदोरी पूल मोजतोय शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 03:54 IST

तळेगाव दाभाडे -चाकण रस्त्यावरील इंदोरी येथे इंग्रजांनी बांधलेल्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक चिरेबंदी पुलाकडे पुरातत्त्व आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे -चाकण रस्त्यावरील इंदोरी येथे इंग्रजांनी बांधलेल्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक चिरेबंदी पुलाकडे पुरातत्त्व आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. दगडी चिरे गायब होणे, वृक्षतोड आदी कारणांमुळे या ऐतिहासिक ठेव्याची ऱ्हासाकडे वाटचाल सुरू आहे.तळेगाव-चाकण राज्य मार्ग ५५ वर इंद्रायणी नदीवर इंग्रजांनी दीडशे वर्षांपूर्वी सुमारे तीनशे मीटर लांबीचा पूल उभारला. हा मावळ तालुक्यातील एक महत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. कोकण आणि मुंबई बंदरातून वर देशाकडे होणाऱ्या वाहतुकीला सोयीचा म्हणून बैलगाड्यांसाठी इंग्रजांनी बांधलेल्या या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिश शासनाने थेट इंग्लंडहून पुणे जिल्हा प्रशासनाला त्या आशयाचे पत्र देखील पाठविले होते. तळेगाव स्टेशनचा जुना रेल्वे पूल आणि इंदोरीचा हा ऐतिहासिक पूल एकाच कालखंडात बांधले गेल्याचे जाणकार सांगतात. पुलाच्या मजबुतीकरणासाठी दोन्ही बाजूने रस्त्याकडेला नदीतीरावर वृक्षलागवड देखील ब्रिटिश शासनाने केली होती. इंदोरी बाह्यवळण रस्ता झाल्यानंतर नवीन पूल बांधल्यावर शासनाने या जुन्या पुलाकडे दुर्लक्ष केले आहे. पुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे १९९८ मध्ये ‘आ अब लौट चले’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण या पुलावर करण्यात आले होते. गाडी पुलावरून नदीत कोसळतानाचे चित्रीकरण करताना कठड्याची झालेली पडझड दुरुस्तीसाठी निर्मात्याने भरपाई दिली होती.भारदस्तपणा, बांधकाम कालावधी लक्षात घेता ऐतिहासिक ठेवा म्हणून पुरातत्त्व खात्याने पूल ताब्यात घेऊन जतन करावा, असे मत इतिहासप्रेमी, अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)सध्या पुलाची ऱ्हासाकडे वाटचाल सुरु असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इंदोरी ग्रामपंचायतीला मात्र याचे क ोणतेही सोयरसुतक दिसत नाही. सध्या फक्त इंदोरीकर आणि स्थानिक रहिवाशांकडून हलकी प्रवासी वाहने नेण्यासाठीच पुलाचा वापर होत आहे. रात्री दहानंतर पुलावरील वर्दळ जवळपास बंद होते. याचाच फायदा घेत चोर, भामटे पुलाच्या कडेची झाडे तोडत आहेत किंवा दगडी चिरे गायब करीत आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या बाहेरगावच्या पोल्ट्री फार्मच्या गाड्या मेलेल्या कोंबड्या व पिसे आणि घाण गुपचूप पुलाच्या बाजूला टाकत आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक पुलाच्या बांधकामाबरोबरच पाणी व नदीपात्र प्रदूषित होऊन इंद्रायणी नदीच्या पावित्र्यालाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. चोरांनी पुलाकडेची बहुतांश झाडे तोडून नेल्यामुळे आणि बांधकाम विभागाने कठडे न बांधल्याने ये-जा करणारी दुचाकी वा चारचाकी वाहने थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका आहे. ब्रिटिशकाळात हा पूल बांधण्यासाठी अवघे ३१ हजार ४३४ रुपये खर्च झाला होता. तशी कोनशिलाही पुलाच्या बांधकामावर आहे.