शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पावसाळ्यात ओढावू शकते संकट; आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क, सज्ज ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 16:59 IST

अल्प पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ तर अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढावू शकते.

ठळक मुद्देराज्य कृषी पदवीधर संघटनेची मागणी

पिंपरी : गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे पावसाची अनिश्चितता आहे. त्यामुळे  अल्प पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ तर अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढावू शकते. कोरोनापाठोपाठ या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडील आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. . कोरोनापाठोपाठ या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडील आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्य कृषी पदवीधर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष गणेश बाबर, सचिव प्रकाश यादव, सातारा जिल्हाध्यक्ष नितीन निंबाळकर, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद यादव, जावळी तालुकाध्यक्ष विठ्ठल रांजणे,पाटण तालुकाध्यक्ष कृष्णा जाधव, वाई तालुकाध्यक्ष धनसिंग कदम, उपाध्यक्ष प्रवीण बाबर, खटाव तालुकाध्यक्ष किरण इंगळे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा पुरेसा जलसाठा आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना धरणांतील जास्तीचा जलसाठा, पूर व अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. वित्त व जीवितहानी देखील झाली. पाळीव प्राणी, घर, शेतीचे नुकसान होऊन सर्व जीवनमान विस्कळीत झाले होते. राज्यातील काही भागांत अशाच पद्धतीने कमी अधिक फरकाने परिस्थिती असल्याचे दिसून येते. त्यामुळे यंत्रणेचे व्यवस्थापन आवश्यक आहे. परिणामी अशा संकटसमयी आवश्यक घटकाला पुरेशी मदत पोहच करणे शक्य होईल. तसेच सावधानता बाळगून संकटाची पूर्वकल्पना देता येईल. जेणेकरून नुकसान कमी होईल. त्यासाठी आपत्कालीन, मदत व पुनर्वसन विभाग, पोलीस, टास्क फोर्स ही सर्व यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटाशी लढताना या यंत्रणांवर ताण येत आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी आणखी उपाययोजना करून यंत्रणेवरील ताण कमी करावा. जेणे करून यापुढे ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत या यंत्रणा सक्षमतेने कार्यान्वित होऊ शकतील, असे पत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfloodपूरdroughtदुष्काळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस