शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पावसाळ्यात ओढावू शकते संकट; आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क, सज्ज ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 16:59 IST

अल्प पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ तर अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढावू शकते.

ठळक मुद्देराज्य कृषी पदवीधर संघटनेची मागणी

पिंपरी : गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे पावसाची अनिश्चितता आहे. त्यामुळे  अल्प पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ तर अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढावू शकते. कोरोनापाठोपाठ या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडील आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. . कोरोनापाठोपाठ या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडील आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्य कृषी पदवीधर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष गणेश बाबर, सचिव प्रकाश यादव, सातारा जिल्हाध्यक्ष नितीन निंबाळकर, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद यादव, जावळी तालुकाध्यक्ष विठ्ठल रांजणे,पाटण तालुकाध्यक्ष कृष्णा जाधव, वाई तालुकाध्यक्ष धनसिंग कदम, उपाध्यक्ष प्रवीण बाबर, खटाव तालुकाध्यक्ष किरण इंगळे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा पुरेसा जलसाठा आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना धरणांतील जास्तीचा जलसाठा, पूर व अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. वित्त व जीवितहानी देखील झाली. पाळीव प्राणी, घर, शेतीचे नुकसान होऊन सर्व जीवनमान विस्कळीत झाले होते. राज्यातील काही भागांत अशाच पद्धतीने कमी अधिक फरकाने परिस्थिती असल्याचे दिसून येते. त्यामुळे यंत्रणेचे व्यवस्थापन आवश्यक आहे. परिणामी अशा संकटसमयी आवश्यक घटकाला पुरेशी मदत पोहच करणे शक्य होईल. तसेच सावधानता बाळगून संकटाची पूर्वकल्पना देता येईल. जेणेकरून नुकसान कमी होईल. त्यासाठी आपत्कालीन, मदत व पुनर्वसन विभाग, पोलीस, टास्क फोर्स ही सर्व यंत्रणा अधिक सतर्क व सज्ज करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटाशी लढताना या यंत्रणांवर ताण येत आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी आणखी उपाययोजना करून यंत्रणेवरील ताण कमी करावा. जेणे करून यापुढे ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत या यंत्रणा सक्षमतेने कार्यान्वित होऊ शकतील, असे पत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfloodपूरdroughtदुष्काळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस