शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

मावळातील कळकराई गाव अर्धे अंधारात; ८ महिन्यांपासून वीज बंद, महावितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:08 PM

अंदर मावळातील अतिदुर्गम भागातील कळकराई (सावळा) या गावात मागील आठ महिन्यांपासून विजेची एक लाईन बंद आहे तर दुसरी लाईन वरील वीज ग्राहकांना कमी लाईट असल्याने अर्धे गाव अंधारात बुडाले आहे.

ठळक मुद्देमहावितरण व वायरमन यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही वीज वितरण मंडळाकडून दखल नाहीअंदाजे ४०० पासून ते १५०० रुपयांपर्यंत बिल येत असून ते घरपोचही पोहचवले जात नाही

कामशेत : अंदर मावळातील अतिदुर्गम भागातील कळकराई (सावळा) या गावात मागील आठ महिन्यांपासून विजेची एक लाईन बंद आहे तर दुसरी लाईन वरील वीज ग्राहकांना कमी लाईट असल्याने अर्धे गाव अंधारात बुडाले आहे. या भागात वीज रिडींग घेण्यासाठी वीज बिल देण्यासाठी कोणीही येत नसून बिल हे अंदाजे मिळत आहे. याविषयी महावितरण व वायरमन यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही वीज वितरण मंडळाकडून दखल घेतली जात नसल्याची ग्रामस्थ तक्रार करीत आहेत. कळकराई गावाकडे जाण्यासाठी अंदर मावळातील सावळा येथून मार्ग असून या दुर्लक्षित गावाला अजूनही रस्ता नाही. कळकराई मध्ये मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी वीज पोहचली आहे. गावात सुमारे पंचवीस वीज ग्राहक असून गावात आलेल्या दोन वीज लाईन वर हे कनेक्शन आहेत. मात्र या दोन लाईन पैकी एक लाईन अद्यापही बंद आहे. त्यामुळे कळकराई हा अर्धा गाव अंधारात आहे. या लाईन ला काय बिघाड आहे हे महावितरण कर्मचाऱ्यांच्या अजूनही लक्षात आले नाही. त्यामुळे दुरुस्ती रखडली आहे. तर दुसरी लाईन वरून होणारा वीज पुरवठा हा कमी दाबाचा होत असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावात पीठ गिरणी असूनही विजे अभावी महिलांना डोक्यावर दळणाचे ओझे घेऊन दोन तासांनी पायपीट करून चार किलोमीटर चा घाट चालून दळणा साठी वणवण करावी लागत आहे अशी माहिती चंद्रकांत कावळे यांनी दिली. या गावात सुमारे पंचवीस वीज ग्राहक असून आजपर्यंत वीज मीटर रिडींग नेण्यासाठी येथे कोणीच फिरकले नाही. येथील सवार्नाच महावितरण मंडळाकडून अंदाजे ४०० पासून ते १५०० रुपयांपर्यंत वीज बिल येत असून ते बिल घरपोच पोहचवले ही जात नाही. वीज सुरू नसतानाही आपली वीज कनेक्शन कट होऊ नये, शिवाय पुढील बिलात वाढीव बिल लागून येऊ नये आदी कारणांच्या भितीमुळे हे ग्राहक कुरबुर न करता लाईट बंद असतानाही वेळी अवेळी येणारी वीज बिल भरत आहेत. वीज वितरण कार्यालय व वायरमन याना वारंवार फोन करून भेटून समस्या मांडली तरी कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्या भागातील विजेची समस्या सुटावी म्हणून आग्रहास्तव आलेल्या एका वायरमनने प्रत्येका कडून पन्नास शंभर असे पैसे घेतले मात्र त्या नंतर तो या भागात परत फिरकलाच नसल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड