शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मिलिंद एकबोटेंच्या अटकेसाठी पोलीस आग्रही, विश्वास नांगरे पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 16:52 IST

कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी पोलिसांनी 14 फेब्रुवारीला न्यायालयाकडे केली होती. त्यांच्या अटकेसाठी पोलीस आग्रही आहेत, अशी भूमिका कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड : कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी पोलिसांनी 14 फेब्रुवारीला न्यायालयाकडे केली होती. त्यांच्या अटकेसाठी पोलीस आग्रही आहेत, असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पुणे ग्रामीण दौऱ्यावर आले असता, विश्वास नांगरे पाटील यांनी रावेत येथे माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली की मिलिंद एकबोटे यांना फक्त अटक नको तर कस्टोडियल इंटेरोगेशन अपेक्षित आहे. अशीच पोलिसांची भूमिका असल्याचे नांगरे पाटील यांनी यावेळी सांगितले. मंगळवारी चाकण इंडस्ट्रियल असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत सायबर गुन्हेगारीसंबंधी काय दक्षता घ्यावी, यासंदर्भात विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली. राज्य शासनाने सायबर क्राईमच्या प्रत्येक युनिटला 50 लाख रुपये निधी दिला आहे. पुणे ग्रामीणला 15 ऑगस्टला सायबर क्राईम हेड क्वार्टर सुरु झाले. अपेक्षित जनजागृती मात्र झालेली नाही. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सायबर गुन्हे दखल करणे बंधनकारक आहे. सायबर क्राईम व्यावसायिक सॉफ्टवेअर उपलब्ध झाले आहे, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसांना चार पत्रे पाठवून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते. परंतु, ग्रामीण पोलिसांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांना चौकशीलाही बोलविले नाही, असे मिलिंद एकबोटे यांचे वकील महिन प्रधान यांनी सांगितले आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही अर्ज फेटाळला गेल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीला त्यांना अंतरिम जामीन मंजूर करून त्याची सुनावणी २० फेब्रुवारी रोजी ठेवली होती.  मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतिम सुनावणी ४ मार्चला ठेवली असून तोपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलMilind Ekboteमिलिंद एकबोटे