शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

PCMC | २०३१ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या होणार ४० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 11:41 IST

आरक्षणे विकसित करण्याची गती कमी....

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका विकास आराखड्याची मुदत २०१७ संपली असून सुधारित आराखडा अंतिम करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. आजपर्यंत विकास आराखड्यानुसार आरक्षणांचा केवळ १८ टक्के विकास झालेला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. भविष्यकालीन शहरातील सन २०३१ मध्ये ४० लाख आणि सन २०४१ मध्ये ६० लाख लोकसंख्या अपेक्षित धरून विकास आराखडा सुधारित करण्याचे काम सुरू आहे. दिनांक ५ मेपर्यंत अंतिम करून शासनास सादर करायचा आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिनगरीचा विकास होत असताना दिनांक ४ मार्च १९७० मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर दिनांक ७ जानेवारी १९७५ मध्ये अ वर्ग नगरपालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर दिनांक ११ ऑक्टोबर १९८२ मध्ये नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिला विकास आराखडा सन १९८६ ला करण्यात आला. त्यानंतर १९९७ ला सुधारित आराखडा तयार करण्यात आला. विकास आराखड्यातील आरक्षणांची अंमलबजावणी करण्यासाठी २० वर्षांचा कालखंड अपेक्षित असतो. मात्र, ३५ वर्षांनंतरही आराखड्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

आरक्षणे विकसित करण्याची गती कमी

महापालिका विकास आराखड्याची मुदत सन २०१७ ला पूर्ण झाली. त्यानंतर विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामास मे महिन्यापर्यंत मुदत आहे. शहरात एकूण १२०० हेक्टरवर आरक्षणे टाकण्यात आली. त्यापैकी केवळ २५३ हेक्टरवरील म्हणजेच १८ टक्के आरक्षणे विकसित झाली आहेत. हे प्रमाण कमी असले तरी महाराष्ट्रातील अन्य महापालिकेच्या तुलनेत ही टक्केवारी अधिक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. आरक्षणे विकसित करण्याची गती वाढवायला हवी, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे