शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रोजचा खर्च भागवायचा कसा?

By admin | Updated: December 22, 2016 02:05 IST

नोटाबंदी करून ४२ दिवस उलटून गेले, तरी बँका व एटीएमसमोरील नागरिकांच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. भोसरी औद्योगिक

भोसरी : नोटाबंदी करून ४२ दिवस उलटून गेले, तरी बँका व एटीएमसमोरील नागरिकांच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. भोसरी औद्योगिक भागात हजारो कामगार देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन उदरनिर्वाहासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करीत असतो. पगार मिळतो, पण बँकेत जमा झालेला पगार कित्येक दिवस हातात पडत नाही. आठवड्यातून सुटीचा पूर्ण दिवसही रांगेत जातो व फक्त २००० रुपये हातात मिळतात. या रकमेतून खोलीभाडे देणेही अशक्य आहे. त्यामुळे रोजचे इतर खर्च कसे भागवावेत, असा प्रश्न चाकरमान्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान एमआयडीसीतील कंपन्यांत मासिक पगार होतात. ८ नोव्हेंबरला नोटबंदीचा झाल्यानंतर कारखानदारांनी कामगारांना जुन्याच नोटा पगारात दिल्या. त्या नोटा बाजारात चालत नसल्याने नाईलाजाने त्या बँकेत भरण्यासाठी दिवस-दिवस बँकांच्या रांगेसमोर नोटा भरण्यासाठी थांबावे लागते. कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. नोटाबंदीनंतर दुसरा पगार हातात घेतानाही बऱ्याच कामगारांना जुन्याच ५०० व १०००च्या नोटा देण्याचा काही कारखानदारांनी प्रयत्न केला. बहुतांश परप्रांतीय कामगारांचे बँकांमध्ये खाते नसल्याने त्यांना जुन्या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न पडला असून, चलनबंदीच्या निर्णयाचा मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. भोसरी परिसरात ठिकठिकाणी नाक्यावर थांबून मोलमजुरीची कामे करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. असे कामगार बहुतांश असंघटित क्षेत्रातील आहेत. या कामगारांना काम मिळणे बंद झाले आहे. एखाद-दुसरे काम मिळाले, तरी जुन्या नोटा स्वीकाराव्या लागत आहेत. हातावर पोट असलेले हे कामगार सकाळी मेहनत करतात आणि सायंकाळी खातात. हातात आलेली जुनी नोट अर्ध्या किमतीत विकून रेशन खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे कामगार सांगतात. बरेचसे परप्रांतीय कामगार कुटुंबाला महिन्याकाठी काही पैसे पाठवत असतात. (वार्ताहर)