गुंजवणीचे काम बंद पाडण्याचा इशारा

By Admin | Updated: March 7, 2016 01:15 IST2016-03-07T01:15:23+5:302016-03-07T01:15:23+5:30

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय झाला असून, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.

Hinting | गुंजवणीचे काम बंद पाडण्याचा इशारा

गुंजवणीचे काम बंद पाडण्याचा इशारा

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय झाला असून, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे. आठ दिवसांच्या आत बैठकीचे आयोजन नाही झाले, तर तालुक्यातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते व धरणग्रस्त शुक्रवार, दि. ११ रोजी धरणाचे काम बंद पाडणार, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.
याबाबत शुक्रवारी बैठक शिवगोरक्ष मंगल सभागृहात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि धरणग्रस्त यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत. गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय होत असल्याचा सुर या बैठकीत निघाला असून, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबाबत धरणग्रस्त नाराजी व्यक्त करीत आहेत. पुरंदरला पाणी नेता, तर पुरंदरला धरणग्रस्तांसाठी जमिनी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
अगोदर गुंजवणी धरणाचे पाणी वेल्हे तालुक्यात फिरवा, मगच इतरांना दिले जाईल. वेल्हे तालुक्यातील वाजेघर, वांगणी, सोंडे, निगडे, बोरावळे आदी भागांत सर्वत्र गुंजवणी धरणाचे पाणी फिरले पाहिजे. मगच इतरांना पाणी द्या. गुंजवणी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सांडव्याचे कामसुद्धा अंतिम टप्प्यातच आहे. या वर्षी गुंजवणी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की जर वेल्ह्यात जोरदार पाऊस झाला, तर गुंजवणी धरण क्षेत्रात भोसलेवाडी,कोदापूर व परिसरातील गावे पाण्यात जाणार आहेत.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येत्या आठ दिवसांत महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे आणि संबंधित खात्याचे सर्व अधिकारी यांच्यासोबत बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली.
आठ दिवसांच्या आत बैठकीचे आयोजन नाही झाले, तर तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते
व धरणग्रस्त शुक्रवार, दि. ११
रोजी धरणाचे काम बंद पाडणार,
असा इशारा धरणग्रस्तांनी दिला
आहे. याबाबतचे निवेदन धरणग्रस्तांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण
यांना दिले आहे. या वेळी तालुक्यातील जनता व सर्व
पक्षातील कार्यकर्ते-लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन धरणग्रस्तांनी केले आहे.
या वेळी सभापती सविता वाडघरे, जिल्हा परिषद सदस्या वसुधा
नलावडे, शंकर भुरुक, संदीप नगिने, गणपत देवगिरीकर, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक भगवान पासलकर, शिवाजी कडू, नवनाथ राऊत, सचिन कोकाटे, सुनील कोकाटे, रघुनाथ राऊत, दत्तात्रय गेठले, प्रमोद कोकाटे,
चंद्रकांत देशपांडे, दीपक देवगिरीकर, संपत मरळ, भिकाजी देवगिरीकर, सखाराम कातुर्डे आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.

Web Title: Hinting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.