शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देहूनगरीमध्ये हरिनामाचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 01:33 IST

जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज ‘तुकाराम बीज’ वैकुंठगमन सोहळा २२ मार्चला आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण देहूनगरी हरिनामाच्या गजरात न्हाली आहे.

देहूगाव - जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज ‘तुकाराम बीज’ वैकुंठगमन सोहळा २२ मार्चला आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण देहूनगरी हरिनामाच्या गजरात न्हाली आहे.श्रीसंत तुकाराममहाराज संस्थान, पोलीस यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणा भाविकांच्या सेवेसाठी आपआपल्या परीने कामाला लागली आहे. सध्या गावात धुराची फवारणी करण्यात येत आहे. आरोग्य पथकानेही त्यांचे काम सुरू केले आहे.पोलीस यंत्रणा कार्यान्वित झाली असून, उद्यापर्यंत पुरेसा बंदोबस्त दाखल होईल. वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पंचवीस ते तीस फूट उंचीचा मनोराही उभारण्यात आला आहे. संस्थानच्या वतीने वैकुंठगमण मंदिराच्या समोर १०० फूट लांब व ७० फूट रुंद असा मंडप घालण्याचे काम सुरू आहे. ही धामधूम व सोहळ्याची तयारी सुरू असतानाच भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पाटबंधारे विभागाने इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडले असून, आज ते देहू येथे दाखल झाले आहे. बुधवारपर्यंत इंद्रायणी नदीच्या डोहात पुरेसा पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.येथील जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिंडी समाज धर्मशाळेत तुकाराम बीजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह १७ मार्चपासून सुरू झाला आहे. या निमित्ताने नितीनमहाराज काकडे, उमेशमहाराज दशरथे, कान्होबामहाराज देहूकर यांची कीर्तन सेवा झाली आहे. तर अ‍ॅड. जयवंतमहाराज बोधले, महादेवमहाराज राऊत, संजयमहाराज पाचपोर, अनिलमहाराज पाटील, पंढरीनाथमहाराज तावरे व सुरेशमहाराज साठे यांची कीर्तन सेवा होणार आहे. २५ मार्चला रामरावमहाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.शिवाय परिसरात इंद्रायणीकाठी, गाथामंदिर परिसर, विविध धर्मशाळांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सोहळ्याची सांगता बीजेच्या दिवशी काल्याच्या कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे. गावात सध्या सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे. ठिकठिकाणी टाळमृदंगाच्या आवाजासह सूर ऐकू येत असल्याने सारा परिसर भक्तिमय झाला आहे.गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी मनोरावैकुंठगमन मंदिराच्या परिसरात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पंचवीस ते तीस फूट उंचीचा मनोराही उभारण्यात आला आहे. संस्थानच्या वतीने वैकुंठगमन मंदिराच्या समोर १०० फूट लांब व ७० फूट रुंद असा मंडप घालण्याचे काम सुरू आहे. बीज सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रदिवस काम करत आहे. तसेच देहूमध्ये हरिनामाचा जप सुरू आहे. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे.नामसाधनेने अहंकार नष्ट होतो : नितीनमहाराज काकडेदेहूगाव : गाथा ही तुकोबारायांची मूर्ती आहे. संत तुकोबांच्या गाथेतील प्रत्येक अभंग मार्गदर्शक आहे. गाथेतील अनेक अभंगातून त्यांनी स्वत:चे गुण कमी मात्र दोष अधिक विशद केले आहेत. व्यवहार व परमार्थ वेगळा आहे, नामस्मरणाने काम, क्रोध दूर जातात. नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, नामस्मरणावर दृढविश्वास ठेवल्याशिवाय फळ मिळत नाही. नामसाधनेने अंहकार नष्ट होतो, असे प्रतिपादन कीर्तनकार हभप नितीनमहाराज काकडे यांनी श्रीक्षेत्र देहू येथे केले.संत तुकाराममहाराज बीजोत्सवानिमित्त जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्या वतीने आनंदडोह रस्ता (श्रीक्षेत्र देहू) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशीच्या कीर्तनात काकडेमहाराज बोलत होते.‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ या संत तुकाराममहाराजांच्या अभंगावर निरूपण केले. गायनसाथ लक्ष्मणमहाराज चाळक, बंडोपत खामकर, खडूंमहाराज मोरे, मृदंग साथ रवींद्रमहाराज चव्हाण यांनी केली.दरम्यान रविवारी सकाळी वीणा, टाळ, कलश व मृदंग पूजन करून सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. या वेळी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, हभप पंढरीनाथ तावरे, रवींद्रमहाराज ढोरे, हभप विठ्ठल भालेकर, चिंतामण भालेकर, दत्तात्रय तरस, मधुकर बोडके आदी उपस्थित होते.सकाळी संतसेवा संघाचे अध्यक्ष हभप पंढरीनाथमहाराज तावरे यांच्या नेतृत्वाखाली गाथा पारायण सुरू झाले. हरिपाठ व कीर्तनसाथ पंचम वेद वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, हभप भगवानमहाराज जाधव व हभप सुखदेवमहाराज तांबे यांचे शिष्यगण यांनी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड