शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पिंपरी शहरातील पूरपरिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:19 IST

पाऊस थांबल्यानंतर तातडीने मुळानदीच्या काठी सीमाभिंत बांधण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

ठळक मुद्देभाजपाच्या नगरसेवकांच्या परिसराला पालकमंत्र्यांची भेट

पिंपरी :  शहरातील पूरपरिस्थितीचा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  मंगळवारी धावता आढावा घेतला. पिंपळेनिलख येथील शाळेत स्थलांतरित केलेल्या नागरिकांची भेट घेतली. वाकड, कस्पटेवस्ती, पिंपळेनिलख परिसराची पाहणी केली. पाऊस थांबल्यानंतर तातडीने मुळानदीच्या काठी सीमाभिंत बांधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक तुषार कामठे, संदिप कस्पटे, आरती चौंधे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड उपस्थित होते.  यावेळी तुषार कामठे आणि कस्पटे यांनी पुर परिस्थितीची व मदतकार्याची माहिती दिली. तसेच मुळा नदीचे खोलीकरण करुन सिमाभिंत बांधण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी मुळानदीच्या बाजूला सीमा भिंत बांधणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यानंतर तातडीने सीमाभिंत बांधण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.  पावसाचा जोर ओसरला.  गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धैमान घातल्याने नदीला महापूर आला होता. नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रुग्णालयामध्ये देखील पाणी शिरले आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले होते. महापालिकेने दोन दिवसांत बोपखेल, दापोडी, पवारवस्ती, चिंचवड, पिंपळेगुरव या परिसरातील सात हजार लोकांचे महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरण केले आहे. आज पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी आली आहे.

भाजपाच्या नगरसेवकांच्या परिसराला पालकमंत्र्यांची भेटपालकमंत्री पाटील यांच्या दौऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले,  भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असणाऱ्या भागातच पालकमंत्री पाहणीसाठी गेले होते. वाकड परिसरातील पूरग्रस्तांना त्यांनी भेट देणे अपेक्षित होते. मात्र, पूरग्रस्तांचे प्रश्न जाणून घेण्यातही पालकमंत्र्यांनी राजकारण केले. वाकड परिसरातीही पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrakant patilचंद्रकांत पाटीलRainपाऊसfloodपूर