शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

वर्चस्ववादातून भडकले टोळीयुद्ध, उद्योगनगरीत अशांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:26 IST

वेगवेगळ्या नावांनी स्थापन झालेल्या स्थानिक गुंडांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकत आहे. त्यांच्यात वारंवार अंतर्गत धुसफूस सुरू असते. विशिष्ट परिसरात आपली दहशत निर्माण करून ती टिकविण्यासाठी ते एकमेकांवर चाल करून जातात.

पिंपरी : वेगवेगळ्या नावांनी स्थापन झालेल्या स्थानिक गुंडांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकत आहे. त्यांच्यात वारंवार अंतर्गत धुसफूस सुरू असते. विशिष्ट परिसरात आपली दहशत निर्माण करून ती टिकविण्यासाठी ते एकमेकांवर चाल करून जातात. वर्चस्व सिद्ध करण्याच्या मोहापायी एकमेकांच्या जिवावर उठण्यापर्यंत त्यांनी मजलमारली आहे.रावण टोळी आणि महाकाली टोळीच्या गुंडांमध्ये घडलेल्या चकमकीतून टोळीयुद्ध भडकल्याचे जाणवू लागले आहे. महाकाली टोळीतून बाहेर पडलेल्यांनी स्थापन केलेली रावण टोळी, या दोन टोळ्यांमधील वर्चस्ववादातून नुकताच आकुर्डीत खून झाला. या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न अनिकेतच्या टोळीतील गुंडांकडून होत आहे. त्यातून टोळीयुद्ध भडकल्याचे निदर्शनास येत आहे. चिंचवड (वेताळनगर), आनंदनगर, पिंपरी कॅम्प, भाटनगर, पिंपरीगाव, नेहरुनगर, गांधीनगर, विठ्ठलनगर, भोसरीतील बालाजीनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, दिघी, चºहोली, चिखली, रावेत, कासारवाडी, वाकड, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी आदी ठिकाणचे गुंड स्थानिक टोळ्यांमध्ये सक्रिय आहेत. या टोळ्या स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये तरुणांचे ग्रुप तयार होतात. तेच पुढे टोळ्यांशी संलग्न होत आहेत. त्या त्या परिसरातील गुंडांच्या टोळ्या तेथील नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम करतात. अनेकदा त्यांच्यातील अंतर्गत वादातून परिसरातील मोटारींची तोडफोड, जाळपोळ केली जाते. काही वेळा घरांवर दगडफेक करण्याचे प्रकार घडवून आणले जातात. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. त्याचा या टोळ्यांमधील गुंड फायदा उठवितात.बेकायदा पिस्तूल बाळगणारे वेळोवेळी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर शहरात पिस्तूल आणले जात आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील तरुणांकडे सहज पिस्तूल येत आहेत.विविध परिसरातील सुमारे ९० गुंडांवर तडीपारीची कारवाई झालेली आहे. पोलिसांकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जातात. मात्र, तरीही गुंडगिरीला आळा घालणे शक्य झालेले नाही. कामगार नेते प्रकाश चव्हाण, नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खुनी हल्ल्यांसाठी अशाच स्थानिक गुंडांच्या टोळ्यांचा वापर करण्यात आल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आलेले आहे. मोठ्या स्वरूपाच्या गुन्हेगारी कृत्यात या टोळ्यांचा सहभाग घेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. माजी नगरसेवक कैलास कदम यांना मारण्याची सुपारी देण्यात आली. त्यातही अशाच गुंडांचा सहभाग घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड