शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

वर्चस्ववादातून भडकले टोळीयुद्ध, उद्योगनगरीत अशांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:26 IST

वेगवेगळ्या नावांनी स्थापन झालेल्या स्थानिक गुंडांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकत आहे. त्यांच्यात वारंवार अंतर्गत धुसफूस सुरू असते. विशिष्ट परिसरात आपली दहशत निर्माण करून ती टिकविण्यासाठी ते एकमेकांवर चाल करून जातात.

पिंपरी : वेगवेगळ्या नावांनी स्थापन झालेल्या स्थानिक गुंडांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकत आहे. त्यांच्यात वारंवार अंतर्गत धुसफूस सुरू असते. विशिष्ट परिसरात आपली दहशत निर्माण करून ती टिकविण्यासाठी ते एकमेकांवर चाल करून जातात. वर्चस्व सिद्ध करण्याच्या मोहापायी एकमेकांच्या जिवावर उठण्यापर्यंत त्यांनी मजलमारली आहे.रावण टोळी आणि महाकाली टोळीच्या गुंडांमध्ये घडलेल्या चकमकीतून टोळीयुद्ध भडकल्याचे जाणवू लागले आहे. महाकाली टोळीतून बाहेर पडलेल्यांनी स्थापन केलेली रावण टोळी, या दोन टोळ्यांमधील वर्चस्ववादातून नुकताच आकुर्डीत खून झाला. या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न अनिकेतच्या टोळीतील गुंडांकडून होत आहे. त्यातून टोळीयुद्ध भडकल्याचे निदर्शनास येत आहे. चिंचवड (वेताळनगर), आनंदनगर, पिंपरी कॅम्प, भाटनगर, पिंपरीगाव, नेहरुनगर, गांधीनगर, विठ्ठलनगर, भोसरीतील बालाजीनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, दिघी, चºहोली, चिखली, रावेत, कासारवाडी, वाकड, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी आदी ठिकाणचे गुंड स्थानिक टोळ्यांमध्ये सक्रिय आहेत. या टोळ्या स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये तरुणांचे ग्रुप तयार होतात. तेच पुढे टोळ्यांशी संलग्न होत आहेत. त्या त्या परिसरातील गुंडांच्या टोळ्या तेथील नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम करतात. अनेकदा त्यांच्यातील अंतर्गत वादातून परिसरातील मोटारींची तोडफोड, जाळपोळ केली जाते. काही वेळा घरांवर दगडफेक करण्याचे प्रकार घडवून आणले जातात. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. त्याचा या टोळ्यांमधील गुंड फायदा उठवितात.बेकायदा पिस्तूल बाळगणारे वेळोवेळी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर शहरात पिस्तूल आणले जात आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील तरुणांकडे सहज पिस्तूल येत आहेत.विविध परिसरातील सुमारे ९० गुंडांवर तडीपारीची कारवाई झालेली आहे. पोलिसांकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जातात. मात्र, तरीही गुंडगिरीला आळा घालणे शक्य झालेले नाही. कामगार नेते प्रकाश चव्हाण, नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खुनी हल्ल्यांसाठी अशाच स्थानिक गुंडांच्या टोळ्यांचा वापर करण्यात आल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आलेले आहे. मोठ्या स्वरूपाच्या गुन्हेगारी कृत्यात या टोळ्यांचा सहभाग घेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. माजी नगरसेवक कैलास कदम यांना मारण्याची सुपारी देण्यात आली. त्यातही अशाच गुंडांचा सहभाग घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड