शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत विजेचा लपंडावाचा खेळ ; लूट व मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 20:26 IST

अंधाराचा फायदा घेत कर्मचाऱ्यांना लुटणे, मारहाण करणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे....

पिंपरी : उद्योगनगरीत वारंवार होणारा विजेचा लंपडाव...पदपथावरील नादुरुस्त दिव्यांअभावी होणारा अंधार...फिडर पिलरच्या झाकणांची होणारी चोरी...उघड्या यंत्रणेमध्ये उंदीर, पाली यामुळे जाणारी वीज..अशा प्रकारामुळे सायंकाळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत कर्मचाऱ्यांना लुटणे, मारहाण करणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.              भोसरी एमआयडीसी परिसरात पाच ते सहा हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. जिल्ह्यातून दररोज लाखो कामगार पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत येत असतात. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वारंवार जाणाऱ्या विजेमुळे काम बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यातच आता पदपथावरील दिवे नादुरुस्त होणे आणि देखभाल दुरुस्तीअभावी ते बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांचा उद्योग सुरू आहे. कामावर जाण्याच्या वेळेत अथवा सुटण्याच्या वेळेत कामगारांना अडवून त्यांना लुटण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे. कामगारांना मारहाण करणे, त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढणे, मोबाइल हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा तर मोबाइलवर बोलत असताना गाडीवरून वेगात आलेले चोरटे हातातील मोबाइल हिसकावून नेत आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्येही अशा घटनांची सातत्याने नोंद होत आहे.            फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर म्हणाले, ‘‘ एमआयडीसी परिसरातील नवीन पदपथ दिवे देखील लवकर खराब होत आहेत. एलईडी दिवे दुरुस्तीला दिल्याचे सांगण्यात येते. स्थानिक पातळीवर त्याची दुरुस्ती करता येत नाही. कंपनीमध्ये पाठविल्यास त्यासाठी दहा-दहा दिवस लागतात. तोपर्यंत परिसरात अंधाराचे साम्राज्य होते. ’’        भोसरी एमआयडीसीमधील उद्योजक वैभव जगताप म्हणाले, पदपथावरील दिवे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेऊन कामगारांना लुटण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. काही कामगार यात जखमी देखील झाले आहेत. रात्री घरी जाताना कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असते. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी काढून नेलेले दिवे दहा-दहा दिवस बसविले जात नाहीत. तोपर्यंत तेथे अंधार पसरतो. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत झाली पाहिजेत. त्याचबरोबर औद्योगिकनगरीत पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे.--------------------एमआयडीसी परिसरातील विजेचे अनेक खांब जुनाट झाल्याने वारंवार अपघात होत असतात. फिडर पिलरचे दरवाजे नाहीसे झाले आहेत. त्यात उंदीर, घुशी शिरल्याने अपघात होतात. विशेषत: पदपथावरील दिवे नसल्याने परिसरात अंधार होतो. त्यामुळे लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. महानगरपालिकेने यावर उपाययोजना करून उत्कृष्ट दर्जाचे दिवे लावावेत.अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन

---------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीmahavitaranमहावितरणThiefचोरPoliceपोलिस