शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काटकसरीने पाणी वापरासाठी कपात, कालवा समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 00:30 IST

कालवा समितीचा निर्णय : महापालिकेने दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडी पाणी उचलावे

पिंपरी : पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे असून, त्यासाठी महापालिकेने दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे, असा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरावे, असे पत्र पाठबंधारे विभागाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले आहे.

शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेला पवना धरणातून वार्षिक ४.८४ टीएमसी पाणी वापरास सरकारने मंजुरी दिली आहे. पवना धरणातून महापालिका दररोज ४८० एमएलडी पाण्याचा उपसा करते. रावते बंधाºयातून पाणीउपसा करून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधारा गाळाने भरला आहे. त्यामुळे बंधाºयाची पातळी थोडी जरी कमी झाली तरी महापालिकेचे पंप बंद पडतात. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. पवना धरणातून रावेत बंधाºयापर्यंत पवना नदीची लांबी ३८ किलोमीटर असून, पाणी सोडल्यानंतर बंधाºयापर्यंत पोहोचण्यास चौदा तासाचा वेळ लागतो. महापालिका मंजुरीपेक्षा जास्त पाणी उचलत आहे. रावेत बंधाºयातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून जास्त विसर्ग केल्यामुळे जास्तीचे पाणी वाया जात आहे. पावसाळ्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस बंद पडला. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. परिणामी, धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पवना धरणामध्ये पाणीसाठा तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहराचा पाणीवापर ४४० एमएलडीच ठेवावा, असे कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे.आंद्रा धरणातून दोन टक्के पाणीकपातपिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून ४८.५७६ दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर अशा एकूण १४८.२३६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मुदतवाढ देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने दोन आठवड्यापूर्वी घेतला होता. मात्र, आंद्रा धरणातील पाण्यात दोन टक्के कपात केली असून, ३६.८७ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार असल्याचे शुद्धीपत्रक मंगळवारी जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केले आहे.

शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होत आहे. दररोज ४८० एमएलडी पाणी शहरासाठी उचलण्यात येते. शहराची लोकसंख्या २२ लाख झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे अन्य मार्गाने पाणी आणण्याची मागणी होत आहे. भामा-आसखेड धरणातील १६७ एमएलडी आणि आंद्रा धरणातील १०० एमएलडी पाणी आरक्षित ठेवले होते. मात्र, पुनर्स्थापना खर्चापोटी २३८.५३ कोटी रुपये न भरल्याने आरक्षण रद्द झाले होते.दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेतली. त्यानंतर भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून शहरासाठी आरक्षित पाणी करारास मुदतवाढ देण्याची मागणी शासनाच्या जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानुसार २४ आॅक्टोबरला आरक्षण मंजूर झाले होते. आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर करण्यात आले होते. मात्र, दोन आठवड्यांनंतर या पाण्यात दोन टक्क्यांनी कपात केली आहे. या संदर्भातील शुद्धिपत्रक जलसंपदा विभागाचे उपसचिव अ. अ. कपोले यांनी मंगळवारी प्रसिद्ध केले. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड