शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काटकसरीने पाणी वापरासाठी कपात, कालवा समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 00:30 IST

कालवा समितीचा निर्णय : महापालिकेने दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडी पाणी उचलावे

पिंपरी : पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे असून, त्यासाठी महापालिकेने दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे, असा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरावे, असे पत्र पाठबंधारे विभागाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले आहे.

शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेला पवना धरणातून वार्षिक ४.८४ टीएमसी पाणी वापरास सरकारने मंजुरी दिली आहे. पवना धरणातून महापालिका दररोज ४८० एमएलडी पाण्याचा उपसा करते. रावते बंधाºयातून पाणीउपसा करून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधारा गाळाने भरला आहे. त्यामुळे बंधाºयाची पातळी थोडी जरी कमी झाली तरी महापालिकेचे पंप बंद पडतात. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. पवना धरणातून रावेत बंधाºयापर्यंत पवना नदीची लांबी ३८ किलोमीटर असून, पाणी सोडल्यानंतर बंधाºयापर्यंत पोहोचण्यास चौदा तासाचा वेळ लागतो. महापालिका मंजुरीपेक्षा जास्त पाणी उचलत आहे. रावेत बंधाºयातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून जास्त विसर्ग केल्यामुळे जास्तीचे पाणी वाया जात आहे. पावसाळ्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस बंद पडला. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. परिणामी, धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पवना धरणामध्ये पाणीसाठा तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहराचा पाणीवापर ४४० एमएलडीच ठेवावा, असे कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे.आंद्रा धरणातून दोन टक्के पाणीकपातपिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून ४८.५७६ दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर अशा एकूण १४८.२३६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मुदतवाढ देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने दोन आठवड्यापूर्वी घेतला होता. मात्र, आंद्रा धरणातील पाण्यात दोन टक्के कपात केली असून, ३६.८७ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार असल्याचे शुद्धीपत्रक मंगळवारी जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केले आहे.

शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होत आहे. दररोज ४८० एमएलडी पाणी शहरासाठी उचलण्यात येते. शहराची लोकसंख्या २२ लाख झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे अन्य मार्गाने पाणी आणण्याची मागणी होत आहे. भामा-आसखेड धरणातील १६७ एमएलडी आणि आंद्रा धरणातील १०० एमएलडी पाणी आरक्षित ठेवले होते. मात्र, पुनर्स्थापना खर्चापोटी २३८.५३ कोटी रुपये न भरल्याने आरक्षण रद्द झाले होते.दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेतली. त्यानंतर भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून शहरासाठी आरक्षित पाणी करारास मुदतवाढ देण्याची मागणी शासनाच्या जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानुसार २४ आॅक्टोबरला आरक्षण मंजूर झाले होते. आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर करण्यात आले होते. मात्र, दोन आठवड्यांनंतर या पाण्यात दोन टक्क्यांनी कपात केली आहे. या संदर्भातील शुद्धिपत्रक जलसंपदा विभागाचे उपसचिव अ. अ. कपोले यांनी मंगळवारी प्रसिद्ध केले. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड