शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

काटकसरीने पाणी वापरासाठी कपात, कालवा समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 00:30 IST

कालवा समितीचा निर्णय : महापालिकेने दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडी पाणी उचलावे

पिंपरी : पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे असून, त्यासाठी महापालिकेने दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे, असा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरावे, असे पत्र पाठबंधारे विभागाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले आहे.

शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेला पवना धरणातून वार्षिक ४.८४ टीएमसी पाणी वापरास सरकारने मंजुरी दिली आहे. पवना धरणातून महापालिका दररोज ४८० एमएलडी पाण्याचा उपसा करते. रावते बंधाºयातून पाणीउपसा करून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधारा गाळाने भरला आहे. त्यामुळे बंधाºयाची पातळी थोडी जरी कमी झाली तरी महापालिकेचे पंप बंद पडतात. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. पवना धरणातून रावेत बंधाºयापर्यंत पवना नदीची लांबी ३८ किलोमीटर असून, पाणी सोडल्यानंतर बंधाºयापर्यंत पोहोचण्यास चौदा तासाचा वेळ लागतो. महापालिका मंजुरीपेक्षा जास्त पाणी उचलत आहे. रावेत बंधाºयातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून जास्त विसर्ग केल्यामुळे जास्तीचे पाणी वाया जात आहे. पावसाळ्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस बंद पडला. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. परिणामी, धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पवना धरणामध्ये पाणीसाठा तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहराचा पाणीवापर ४४० एमएलडीच ठेवावा, असे कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे.आंद्रा धरणातून दोन टक्के पाणीकपातपिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून ४८.५७६ दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर अशा एकूण १४८.२३६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मुदतवाढ देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने दोन आठवड्यापूर्वी घेतला होता. मात्र, आंद्रा धरणातील पाण्यात दोन टक्के कपात केली असून, ३६.८७ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार असल्याचे शुद्धीपत्रक मंगळवारी जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केले आहे.

शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होत आहे. दररोज ४८० एमएलडी पाणी शहरासाठी उचलण्यात येते. शहराची लोकसंख्या २२ लाख झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे अन्य मार्गाने पाणी आणण्याची मागणी होत आहे. भामा-आसखेड धरणातील १६७ एमएलडी आणि आंद्रा धरणातील १०० एमएलडी पाणी आरक्षित ठेवले होते. मात्र, पुनर्स्थापना खर्चापोटी २३८.५३ कोटी रुपये न भरल्याने आरक्षण रद्द झाले होते.दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेतली. त्यानंतर भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून शहरासाठी आरक्षित पाणी करारास मुदतवाढ देण्याची मागणी शासनाच्या जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानुसार २४ आॅक्टोबरला आरक्षण मंजूर झाले होते. आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर करण्यात आले होते. मात्र, दोन आठवड्यांनंतर या पाण्यात दोन टक्क्यांनी कपात केली आहे. या संदर्भातील शुद्धिपत्रक जलसंपदा विभागाचे उपसचिव अ. अ. कपोले यांनी मंगळवारी प्रसिद्ध केले. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड