शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
4
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
5
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
6
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
7
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
8
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
9
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
11
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
12
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
13
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
14
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
15
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
16
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
17
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
18
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
19
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
20
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...

केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा - पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 2:05 AM

अन्न धान्य वितरण केंद्रांवर आधार क्रमांक जोडणी आणि एईपीडीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यापूर्वी अनेक केशरी कार्डधारकांची नावे वगळली गेली.

पुणे : अन्न धान्य वितरण केंद्रांवर आधार क्रमांक जोडणी आणि एईपीडीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यापूर्वी अनेक केशरी कार्डधारकांची नावे वगळली गेली. त्यामुळे त्यांना अन्न सुरक्षा योजनेच्या फायद्यापासून वंचित राहावे लागत आहे. अशा जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख केशरी कार्डधारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे पुन्हा शिधापत्रिका मिळवून स्वस्त दरातील धान्य घेता येईल.अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आमदार आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत याची घोषणा केली. आठवडाभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वस्त धान्याचा अपहार, बोगस शिधापत्रिकाधारक अशा समस्येमुळे गरजू व्यक्तीला शासनाच्या योजनांचा लाभ होत नव्हता. त्यामुळे शासनाने संपूर्ण शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडणी अनिवार्य केली. तसेच स्वस्त अन्न धान्य वितरण केंद्रावर ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या. परंतु, यातूनही पळवाट काढत धान्याचा अपहार करत असल्याचे समजल्याने शासनाने ई पॉस यंत्रणेबरोबरच एईपीडीएस यंत्रणा कार्यान्वित केली. दोन महिन्यांपासून ही यंत्रणा कार्यान्वित करताच योग्य व्यक्तीला योजनेचा लाभ मिळत असून, धान्य बचत होत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.केशरी कार्डधारकांच्या संख्येपैकी ग्रामीण भागात ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपये असेल अशा ७५ टक्के नागरिकांना आणि शहरी भागात ज्यांचे उत्पन्न ५९ हजार रुपये असेल अशा ४५ टक्के नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळेल. त्यांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ मिळेल.प्रतिज्ञापत्राद्वारे मिळणार शिधापत्रिकानावे वगळल्या गेलेल्या शिधापत्रिकाधारकांना पुन्हाशिधापत्रिका मिळविण्यासाठी संबंधित परिमंडळ कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. त्यात, माझे उत्पन्न अन्नसुरक्षा योजनेनुसार असल्याचे नोंदवावे लागले. त्यासोबत संबंधित अर्जदाराची आधारकार्डची छायांकित प्रत आणि रहिवासी पुरावा घेतलाजाईल. त्याची पडताळणी केल्यानंतर संबंधिताला पुन्हा शिधापत्रिका वितरित करण्यात येईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या