शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

निकामी झालेल्या होडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:22 IST

वराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ५० केली होती. परंतू अद्याप पूल झाला नाही.

ठळक मुद्देमुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर नाणोली गावची लोकसंख्या तेराशेवर

पिंपरी: इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या तेराशेवर आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मागॅ म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर करतात. सध्या येण्याजाण्यासाठी असलेल्या होडीची अवस्था मात्र अतिशय बिकट झाली असून होडीच्या तळाला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे होडीत पाणीसुध्दा येते. अशा धोकादायक होडीतून हे चिमुकले शाळेला गेले. हे भीषण वास्तव आहे वडगाव मावळ तालुक्यातील नाणोली आणि वराळे गावच्या ग्रामस्थांची....  गेल्या तीन पिढ्यांपासून शेतकरी,महिला,विद्यार्थी यांना नदीवर पूल नसल्याने इंद्रायणीच्या नदीपात्रातून निकामी झालेल्या होडीतने प्रवास करावा लागतो. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी होडीतून प्रवास करून शाळा गाठली. इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या तेराशेवर आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे इतर गावांतील शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर करतात. सध्या असलेली होडीची अवस्था बिकट झाली असून तळाला छिद्रे पडली आहेत.त्यामुळे होडीत पाणी येते. .......................   होडी चालविणा-यांची तिसरी पिढी गावक-यांनी दिलेल्या बलुत्यावर तीन पिढ्यांपासून नावाड्यांचे कुटूंबीय उदरनिर्वाह करीत आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा बांधल्या आहेत. त्या तारेच्या आधारे होडी ओढून नाव पुढे नेली जाते. सुरवातील दत्तोबा गऱ्हाणे यांनी होडी चालवली. यानंतर मुलगा बळीराम आणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करत आहे. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतात. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांची सेवा आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे. परंतु, सध्या महागाईचे दिवस आहेत. नुसत्या धान्यावर घर चालत नाही. शासनाने अथवा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन दिले पाहिजे असे बिबाबाई गºहाणे यांनी सांगितले. ...................                    शासनाला जाग कधी येणारवराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ५० वर्षांपूर्वी केली होती. १९८५ मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी भूमिपूजन केले होते.परंतू अद्याप पूल झाला नाही. सध्याची होडी निकामी झाली असून नवीन होडी द्यावी तसेच या पूलाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी माजी सभापती धोंडीबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे,अरूण लोंढे,संतोष लोंढे,मल्हारी कोंडे यांनी केली आहे.जिल्हापरिषद सदस्य नितीन मराठे म्हणाले जिल्हापरिषेकडून नवीन नाव लवकर आणण्यात येईल. 

टॅग्स :mavalमावळSchoolशाळाStudentविद्यार्थीindrayaniइंद्रायणी