शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दुःखाचा डाेंगर काेसळलेला असताना कुटुंबियांनी दाखवले समाजभान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 16:32 IST

झाडावरुन पडून जखमी झाल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे डाेळे दान करण्याचा निर्णय पुण्यातील पिंपरी भागातील कुटुंबियांनी घेतला.

नारायण बडगुजर 

पिंपरी : झाडावरून पडून गंभीर जखमी झाल्याने तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूला मार लागल्याने शस्त्रक्रिया केली. मात्र, जगण्यासाठीचा हा लढा अपयशी ठरला. त्यामुळे तरुणाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र खचून न जाता त्यांनी समाजभान दाखवून तरुणाच्या अवयव दानाचा आदर्श निर्णय घेतला. त्यामुळे मरणानंतरही तो ‘नेत्र’रुपी जिवंत आहे.

प्रकाश दत्तात्रय बडगुजर (वय ४०, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ रा. साकळी, ता. यावल, जि. जळगाव) असे मरणोत्तर नेत्रदान केलेल्या तरुणाचे नाव आहे.  दरम्यान, रविवार, दि. २३ जून रोजी प्रकाश आकर्डी प्राधिकरणातील एका झाडावरून जांभळे काढत होता. त्या वेळी तोल जाऊन तो झाडावरून पडला. तेव्हा त्याच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्याला निगडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रक्तस्राव झाल्याने त्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तरीही त्यात यश आले नाही. ब्रेनडेड असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही २४ तास उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नसून, रुग्ण दगावणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबाने दु:खाचा डोंगर बाजूला ठेवून अवयवदानाचा निर्णय घेतला.

पोटासाठी मिळेल त्या कामाची तयारीप्रकाश दत्तात्रय बडगुजर (वय ४०, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ रा. साकळी, ता. यावल, जि. जळगाव) असे मरणोत्तर नेत्रदान केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील दत्तात्रय, लहान भाऊ अविनाश यांनी प्रकाश यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. अविनाश बडगुजर म्हणाले, प्रकाश हा चिंचवड येथे कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामास होता. त्या पगारात घर चालविणे कठीण होते म्हणून तो झाडावरून जांभळे उतरविण्याचे काम करीत होता. मिळणाऱ्या मोबदल्यामुळे त्याच्या संसाराला हातभार लागत होता. 

प्रकाश बडगुजर यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय इतरांसाठीही आदर्शवत आहे. अवयवदानासाठी प्रत्येकाने सकारात्मक राहिले पाहिजे. त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सध्या अनेक रुग्णालयात अवयवदानाची सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांनी मरणोत्तर अवयवदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे मत डाॅ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डाॅ. वैशाली भारंबे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल