शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

सत्तांतरानंतरही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा, महापालिका कारभाराची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:00 IST

महापालिकेची निवडणूक होऊन वर्ष झाले. राष्टÑवादी काँग्रेसला नाकारून नागरिकांनी सत्तेची सूत्रे भाजपाच्या हातात दिली. वर्षभराच्या काळात विकास झाल्याचा दावा भाजपाने केला आहे

पिंपरी : महापालिकेची निवडणूक होऊन वर्ष झाले. राष्टÑवादी काँग्रेसला नाकारून नागरिकांनी सत्तेची सूत्रे भाजपाच्या हातात दिली. वर्षभराच्या काळात विकास झाल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर जाहीरनाम्यातील ‘अच्छे दिन येणार कधी?’ याची प्रतिक्षा कायम असल्याचा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.महापालिकेची निवडणूक होऊन निकाल लागला. पंधरा वर्षे असणारी राष्टÑवादीची एकमुखी सत्ता नाकारून नागरिकांनी भाजपाला कौल दिला. त्यास वर्ष होत आहे. वर्षभराच्या कारभाराविषयी भाजपा समाधानी असून, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. विकास झाला असून, पारदर्शक कारभार व महापालिकेचे उत्पन्न वाढविणे, नागरिकांना सक्षमपणे सुविधांसह उपाययोजना करीत असल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर सत्ताधारी नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी दिशाभूल केली. शास्तीकरात माफी, भ्रष्टाचार व भयमुक्त कारभाराचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.भाजपाने एका वर्षात शहरातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. समाविष्ट गावांना निधी दिला आहे. वीस वर्षांत समाविष्ट गावांत जेवढी कामे झाली नव्हती, तेवढी आम्ही वर्षात केली आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. मेट्रोचे काम वेगात सुरू असून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला चालना दिली.स्मार्ट सिटीच्या कामांनाही गती आली आहे.- नितीन काळजे, महापौरविकासाची वचनपूर्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पारदर्शक कारभार आणि चुकीची कामे, प्रथांना आळा घातला. आर्थिक शिस्त लावली. तसेच पालिकेचे उत्पन्न वाढविणे, नागरिकांना सक्षमपणे नागरी सुविधा देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळणार आहे. समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास करण्यास प्राधान्य दिले आहे. कोणत्याही विकासकामांना विरोध म्हणून काही लोक टीका करतात. ही भूमिका योग्य नाही.- लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजपासत्ताधारी भाजपची एक वर्षाची कारकीर्द भ्रमनिरास करणारी ठरली आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड त्यांनी तोडले आहेत. सत्ताधाºयांना नागरिकांचा विसर पडला आहे. ते मूलभूत सुविधा पुरवू शकले नाहीत. विकासकामे करण्यापेक्षा केवळ निविदा काढण्यावरच भर आहे. पारदर्शकतेचे आश्वासन हवेत विरले आहे. जुन्याच प्रकल्पाचे नारळ फोडण्यात धन्यता मानत आहेत. मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहेत.- योगेश बाबर, शहरप्रमुख, शिवसेनाभाजपा केवळ घोषणा देणारा पक्ष ठरला आहे. वर्षभरात ते केवळ राष्ट्रवादीच्या प्रकल्पांचेच भूमिपूजन करीत आहेत. निवडणुकीत भाजपने केवळ घोषणा दिल्या. कृती मात्र शून्य आहे. भाजप एक वर्षात संपूर्णपणे अपयशी ठरला आहे. जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. सत्ताधाºयांचे भ्रष्टाचाराचे धोरण कायम आहे. भाजप केवळ मार्केटिंग करण्यात पटाईत आहे. वर्षभरात त्यांनी एकही काम पूर्ण केले नाही.- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्टÑवादीमहापालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. वर्षभरात नागरिकांची दिशाभूल करण्यात धन्यता मानली आहे. विकासाचे स्वप्न दाखविले ते पूर्ण करण्याऐवजी पाणी महाग करण्याचा घाट घातला जात आहे. ४७ कोटी वाचविल्याचा दावा सत्ताधारी करतात. मग तेच वळवा पाणी पुरवठ्यावरील खर्चात. नागरिकांवर भार कशासाठी दिला जातो? हेच का अच्छे दिन? - सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :BJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड