शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

‘रिंगरोड’साठी सर्वपक्षीय समिती स्थापन;  राष्ट्रवादी, शिवसेनेची ठराव रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 04:17 IST

रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून रस्ता करू नये. रिंगरोड रद्द करावा किंवा पर्यायी मार्गाने वळवावा, असा ठराव करून सरकारकडे पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली.

पिंपरी : रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून रस्ता करू नये. रिंगरोड रद्द करावा किंवा पर्यायी मार्गाने वळवावा, असा ठराव करून सरकारकडे पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली.या मुद्यांवर सभागृहात तीन तास चर्चाही झाली. अखेर महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले मुद्दे मांडणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. या वेळी रिंगरोडच्या मुद्यावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव येथील रिंगरोडमध्ये बाधित होणारे नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. या प्रश्नावर महासभेतही चर्चा करण्यात आली.आयुष्याची पुंजी जमा करून उभे केलेल्या घरावर बुलडोजर फिरू नये. या घरांविषयी सामान्यांच्या मनात मोठ्या भावना आहेत. या प्रकल्पाला आमचा विरोध असून आम्ही सामान्य नागरिकांच्या सोबतच आहोत, असे राहुल कलाटे यांनी नमूद केले.हा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या मुद्द्यावर तोडगा निघायला हवा. या रस्त्याऐवजी पर्यायी रस्ता करावा.- अभिषेक बारणेया विषयाचे राजकीय भांडवल न करता गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा. यामध्ये कसलेही राजकारण न आणता प्रश्न मार्गी लागायला हवा. रिंगरोड शहरावर आलेले संकट आहे. मानवतेच्या नात्याने सर्वांनी एकत्र यावे. रिंगरोडमध्ये बदल होऊ शकतो. त्यासाठी मानसिकता हवी. रिंगरोड रद्द करण्याचा एक ठराव करून राज्य सरकारकडे पाठवावा. येथे इतक्या वर्षापासून घरे असताना या घरांना लाईट बिले, पाणी बिले येत होती. त्या वेळी प्रशासन झोपले होते का? - भाऊसाहेब भोईरसामान्य नागरिकांची घरे पडणार असतील तर असा रिंगरोडच नको. ज्या रस्त्यामुळे नागरिक बेघर होणार असतील अशा रस्त्याला आमचा विरोध आहे. - मंगला कदमभोसरीतील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना रस्ता बदलून जावे लागले ही दुर्दैवी बाब आहे. नागरिकांची दिशाभूल न करता नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा. दिलेले शब्द पाळणे आवश्यक आहे. - सचिन भोसले