शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

माहेरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सुटलं, सासरच्यांनी पूर्ण केलं, बारावीत उत्तीर्ण

By प्रकाश गायकर | Updated: May 22, 2024 18:47 IST

सासरच्यांनी व खासकरून माझ्या पतीने मला शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिल्याने मी बारावीची परीक्षा देऊ शकले

पिंपरी : नांदेड जिल्ह्यातील छाया पवार यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांना बारावीचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. परिस्थितीने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या छाया यांचा २०१६ ला विवाह झाला. पती राजू कांबळे यांनी छाया यांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. छाया यांनीही पतीला साथ देत बारावीमध्ये ६०.८३ टक्के गुण घेत यश मिळवले.

छाया पवार यांना स्पर्धा परीक्षा करण्याचे स्वप्न आहे. मात्र, माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी २०१६ मध्ये त्यांचा विवाह नांदेड येथील चिखली गावातील राजू माणिकराव कांबळे यांच्यासोबत २०१६ मध्ये लावून दिला. राजू पिंपरी चिंचवड शहरातील निगडीमध्ये बांधकाम साईटवर काम करतात. आपल्या पत्नीला आर्थिक परिस्थितीमुळे शिकता आले नाही, याची जाणिव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी पत्नीला शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चिंचवड येथील गेंदीबाई चाराचंद चोपडा महाविद्यालयात त्यांना प्रवेश घेऊन दिला. छाया आणि राजू यांना एक सहा वर्षांची मुलगी आहे. ती पहिलीमध्ये शिक्षण घेते.

दररोज सकाळी लवकर उठून छाया घरातील कामे आवरायच्या. त्यानंतर मुलीला शाळेत सोडून स्वत: महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायच्या. परिस्थितीने शिक्षण हिरावलेल्या छाया यांनी बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी मेहनत घेऊन अभ्यास केला. गावाकडे असलेल्या सासू-सासऱ्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला. त्या जोरावर त्यांनी बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. छाया यांना ६०.८३ टक्के गुण मिळाले आहे. घरातील कामे, मुलीचे शिक्षण सांभाळून त्यांनी हे यश मिळवल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पुढे पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी करण्याचे छाया यांचे स्वप्न आहे.

मला माझ्या माहेरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. मात्र, सासरच्यांनी व खासकरून माझ्या पतीने मला शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे मी बारावीची परीक्षा देऊ शकले. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मला चांगले गुण मिळवता आले. - छाया पवार-कांबळे.

टॅग्स :PuneपुणेHSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षणWomenमहिलाexamपरीक्षा