शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

नदीला प्रदूषणाचे ग्रहण; इंद्रायणीचे झाले गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:27 IST

पिंपरी-चिंचवडसह तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने व प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे.

दिघी : पिंपरी-चिंचवडसह तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणीनदीला वाढत्या अस्वच्छतेने व प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे. यातून आळंदी येथील नदीवरील पाणीसाठवण के. टी. वेअर बंधाऱ्याची गळती व साठवण बंधारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी पाणी साठवण क्षमतेवर मर्यादा आल्याने आळंदीत इंद्रायणी नदी कोरडी पडली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत असलेले आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक श्रींच्या मंदिरात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास येतात. पिंपरी-चिंचवड शहर आणि आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते. मात्र नदीत थेट सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतूनदेखील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सांडपाणी व रसायन, मैलामिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. यामुळेदेखील नदीचे प्रदूषण वाढले आहे. वाढत्या जलप्रदूषणाने नाराजी व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षाने इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणाºया घटकांवर कारवाईच्याअभावी नदी प्रदूषण आळंदीसह नदीच्या परिसरात वाढले आहे. आळंदीला पाणीपुरवठा केंद्रात येणारे पाणीदेखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगर परिषदेस पाणी शुद्धीकरणावर प्रचंड खर्च सहन करावा लागत आहे. आरोग्याची काळजी घेत नागरिकही स्वच्छ पिण्याचे पाण्यास प्राधान्य देत भुर्दंड सोसत आहेत.आळंदीत येणारे भाविक आणि वारकरी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मुक्काम करतात. अशा भाविकांनीही नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. आळंदीत पिण्याच्या पाण्याचे वितरण नलिकांसह पाण्याच्या टाक्यांची कामे देखील झाली आहे. उर्वरित कामे लवकरच होतील. याशिवाय सांडपाणी नलिकांची कामे सुरु आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेतर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. काही कालावधीत तीर्थक्षेत्र आळंदीच्या चेहरामोहरा बदललेला भाविक, नागरिकांना पाहण्यास मिळेल.इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने डी.पी.आर.देखील तयार केला आहे. राज्य शासनस्तरावरदेखील यासाठी काम सुरु आहे. या कामाला गती देऊन महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वारकºयांसाठी पवित्र असलेल्या या नदीचे रुपडे पालटण्यास मदत होईल.आरोग्य धोक्यात : पाणीही प्रदूषितपाणीदेखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगर परिषदेस पाणी शुद्धीकरणावर प्रचंड खर्च करावा लागत आहे. भाविक नागरिकांना नाहक जास्त खर्च करून पिण्याचे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. आरोग्याची काळजी घेत नागरिकही स्वच्छ पिण्याचे पाण्यास प्राधान्य देत भुर्दंड सोसत आहेत.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीriverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण