शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘पीएमपी’कडून होतेय धूळफेक

By admin | Published: June 12, 2017 1:26 AM

पीएमपीने पिंपरी-चिंचवडमध्ये किती बस वाढविल्या आणि उत्पन्नात किती वाढ झाली, हे सांगणे म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पीएमपीने पिंपरी-चिंचवडमध्ये किती बस वाढविल्या आणि उत्पन्नात किती वाढ झाली, हे सांगणे म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. २००७ आणि २०१७ च्या लोकसंख्येत दुप्पट वाढ झाली असताना शहरांतर्गत बससेवा सक्षम नाही, हा खरा मुद्दा आहे. शहरांतर्गत बससेवेची काय स्थिती आहे, याबाबत पीएमपीचे अध्यक्षांनी जनतेला सांगावे. शहरात फेरफटका मारून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे. सावळे म्हणाल्या, ‘‘पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करावी आणि आसपासच्या गावांना शहराशी जोडण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. परंतु, पीएमपी प्रशासन २००७ आणि २०१७ मधील आकडेवारी प्रसिद्ध करून केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. २००७ मध्ये पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या दहा लाखांच्या घरात होती. २०१७ मध्ये ती २२ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या दहा वर्षांत पुण्याचीही लोकसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवासीही पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने येतात. लोकसंख्या दुप्पट झाली म्हणून पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होणे अपेक्षित आहे आणि तशी वाढ झाली आहे. पूर्व पीएमपी आणि पूर्व पीसीएमटी अस्तित्वात असताना शहरातून पुण्याच्या सर्व प्रमुख भागात बस धावत होत्या.