शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

देहूगावात विद्युतवाहक तार तुटल्याने दोन एकरावरील ऊस जळून खाक; ४ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:55 IST

सांगुर्डी (ता. खेड) येथील तोडणीसाठी तयार असलेला दोन एकर ऊस उच्च विद्युतवाहक तार तुटल्याने जळून खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअशा घटना येथे वारंवार घडत असून याची माहिती विद्यूत विभागाला देऊनही दखल नाहीमहापारेषण कंपनीकडे नुकसान भरपाई मागणार : शेतकरी

देहूगाव : सांगुर्डी (ता. खेड) येथील तोडणीसाठी तयार असलेला दोन एकर ऊस उच्च विद्युतवाहक तार तुटल्याने जळून खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज (गुरूवार, दि. ७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सांगुर्डी गाव गेल्या काही वर्षांपासून ऊस पिकाचे आगार म्हणून ओळखले जात आहे. येथील महादू दामू भसे व धोंडीराम दामू भसे या शेतकऱ्यांचा हा ऊस होता. धोंडीराम भसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेल्या उच्च दाबाची विद्युतवाहक तार तुटली व त्यामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागली. या ऊसाला आगलेली आग एवढी भयानक होती की आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या. त्यातच विद्यूत वाहक तारेतून विद्यूत प्रवाह सुरू होता. त्यामुळे शेतात शिरून आग विझवणे धोक्याचे होते. डोळ्यासमोर ऊस जळत होता, मात्र हातावर हात ठेऊन पाहण्यापेक्षा काहीही करता येत नव्हते. हा ऊस सुरूचा ऊस असून कासारसाई येथील श्री संत तुकाराम कारखान्याला घातला जातो. ऊसाची वाढ पूर्ण झाली पासून टोळी मिळाल्यानंतर हा ऊस कारखान्यात पाठविण्यात येणार होता. त्याअधीच ही घटना घडल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही घटना विद्यूत विभागाला कळविली मात्र तोपर्यंत संपूर्ण दोन एकर ऊसाला आगीने वेढले होते. या आगीमुळे सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसाने झाल्याचे त्यांनी सांगितले. याच शेतकऱ्यांच्या शेतात विद्यूत रोहित्र असल्याने ही आग या रोहित्रापर्यंत आली असती तर मात्र मोठा धोका झाला असता. काही वेळानंतर वायरमन आले व त्यांनी विद्यूत पुरवठा खंडीत करून तुटलेली तार जोडून घेतली. ही आग साधारण दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विझली. त्यानंतर विद्यूत वाहक तारा तुटल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीची गेल्या महिना भरातील ही दुसरी असल्याचे येथील शेतकरी अर्जुन भसे यांनी सांगितले. या पूर्वी येथील शेतकरी हनुमंत गोविंद येळवंडे, शांताराम गणपत भसे, संजय बळीराम भसे, सुदाम भिकाजी भसे यांचा जवळपास वीस एकर ऊस असाच विद्यूत वाहत तार तुटल्याने झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागुन मोठे नुकसान झाले होते.अशा घटना येथे वारंवार घडत असून याची माहिती विद्यूत विभागाला देऊनही योग्य दखल घेतली जात नसल्याने येथील शेतकरी त्रस्त झाल्याचे भसे यांनी सांगितले. या भागातील तारा याा अत्यंत जुन्या झाल्याने अशा घटना वारंवार घडत आहे. घटना घडल्यानंतरही विद्यूत विभागाचे कर्मचारी तातडीने दखल घेत नसून काम करण्याची टाळाटाळ करीत असून आम्ही महापारेषण कंपनीकडे नुकसान भरपाई मागणार असल्याचे भसे यांनी सांगितले. या घटनेची कल्पना येथील तलाठी शिरीष आचारी यांनी कळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भ्रमणध्वनीला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे सांगत ते दुपारी चार वाजेपर्यंतही शेतावर पंचनामा करण्यासाठी आले नसल्याने येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. विद्यूत विभागाच्या कर्मचाऱ्यांना येथील विद्युतवाहक तारा वारंवार बदलण्यासंदर्भात मागणी केली असूनही ते दखल घेत नाहीत तर येथील तलाठी या अधिकाऱ्यांनी अशा गंभीर घटनेची दखल घेतली नसल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही येथील शेतकऱ्यांनी केली आहे.  

टॅग्स :fireआगdehuदेहूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड