शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

देहूगावात विद्युतवाहक तार तुटल्याने दोन एकरावरील ऊस जळून खाक; ४ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:55 IST

सांगुर्डी (ता. खेड) येथील तोडणीसाठी तयार असलेला दोन एकर ऊस उच्च विद्युतवाहक तार तुटल्याने जळून खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअशा घटना येथे वारंवार घडत असून याची माहिती विद्यूत विभागाला देऊनही दखल नाहीमहापारेषण कंपनीकडे नुकसान भरपाई मागणार : शेतकरी

देहूगाव : सांगुर्डी (ता. खेड) येथील तोडणीसाठी तयार असलेला दोन एकर ऊस उच्च विद्युतवाहक तार तुटल्याने जळून खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज (गुरूवार, दि. ७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सांगुर्डी गाव गेल्या काही वर्षांपासून ऊस पिकाचे आगार म्हणून ओळखले जात आहे. येथील महादू दामू भसे व धोंडीराम दामू भसे या शेतकऱ्यांचा हा ऊस होता. धोंडीराम भसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेल्या उच्च दाबाची विद्युतवाहक तार तुटली व त्यामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागली. या ऊसाला आगलेली आग एवढी भयानक होती की आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या. त्यातच विद्यूत वाहक तारेतून विद्यूत प्रवाह सुरू होता. त्यामुळे शेतात शिरून आग विझवणे धोक्याचे होते. डोळ्यासमोर ऊस जळत होता, मात्र हातावर हात ठेऊन पाहण्यापेक्षा काहीही करता येत नव्हते. हा ऊस सुरूचा ऊस असून कासारसाई येथील श्री संत तुकाराम कारखान्याला घातला जातो. ऊसाची वाढ पूर्ण झाली पासून टोळी मिळाल्यानंतर हा ऊस कारखान्यात पाठविण्यात येणार होता. त्याअधीच ही घटना घडल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही घटना विद्यूत विभागाला कळविली मात्र तोपर्यंत संपूर्ण दोन एकर ऊसाला आगीने वेढले होते. या आगीमुळे सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसाने झाल्याचे त्यांनी सांगितले. याच शेतकऱ्यांच्या शेतात विद्यूत रोहित्र असल्याने ही आग या रोहित्रापर्यंत आली असती तर मात्र मोठा धोका झाला असता. काही वेळानंतर वायरमन आले व त्यांनी विद्यूत पुरवठा खंडीत करून तुटलेली तार जोडून घेतली. ही आग साधारण दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विझली. त्यानंतर विद्यूत वाहक तारा तुटल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीची गेल्या महिना भरातील ही दुसरी असल्याचे येथील शेतकरी अर्जुन भसे यांनी सांगितले. या पूर्वी येथील शेतकरी हनुमंत गोविंद येळवंडे, शांताराम गणपत भसे, संजय बळीराम भसे, सुदाम भिकाजी भसे यांचा जवळपास वीस एकर ऊस असाच विद्यूत वाहत तार तुटल्याने झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागुन मोठे नुकसान झाले होते.अशा घटना येथे वारंवार घडत असून याची माहिती विद्यूत विभागाला देऊनही योग्य दखल घेतली जात नसल्याने येथील शेतकरी त्रस्त झाल्याचे भसे यांनी सांगितले. या भागातील तारा याा अत्यंत जुन्या झाल्याने अशा घटना वारंवार घडत आहे. घटना घडल्यानंतरही विद्यूत विभागाचे कर्मचारी तातडीने दखल घेत नसून काम करण्याची टाळाटाळ करीत असून आम्ही महापारेषण कंपनीकडे नुकसान भरपाई मागणार असल्याचे भसे यांनी सांगितले. या घटनेची कल्पना येथील तलाठी शिरीष आचारी यांनी कळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भ्रमणध्वनीला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे सांगत ते दुपारी चार वाजेपर्यंतही शेतावर पंचनामा करण्यासाठी आले नसल्याने येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. विद्यूत विभागाच्या कर्मचाऱ्यांना येथील विद्युतवाहक तारा वारंवार बदलण्यासंदर्भात मागणी केली असूनही ते दखल घेत नाहीत तर येथील तलाठी या अधिकाऱ्यांनी अशा गंभीर घटनेची दखल घेतली नसल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही येथील शेतकऱ्यांनी केली आहे.  

टॅग्स :fireआगdehuदेहूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड