शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

वाहतूक काेंडीच्या धास्तीने तळवडेतील अायटी पार्क वापराविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:17 IST

हिंजवडीत हाेणाऱ्या वाहतूक काेंडीमुळे येथील कंपन्या काढतापाय घेण्याच्या विचारात असताना अाता तळवडे येथील कंपन्यांनाही वाहतूक काेंडीचा फटका बसत अाहे.

तळवडे : हिंजवडीतील वाहतूककोंडीमुळे येथील कंपन्या स्थलांतराचा विचार करत असताना अाता तळवडे येथील कंपन्यांनाही अशाच पद्धतीने वाहतूककोंडीच्या समस्यांचा सामना करावा लागत अाहे. त्यामुळे तळवडे आयटी पार्कमध्ये नवीन कंपन्या येण्यास धजावत नाहीत. परिणामी येथील एमआयडीसीची इमारत पडून आहे. औद्योगिक आणि आयटी पार्कसाठी उभारण्यात आलेल्या खासगी इमारतीही अशाच वापराविना आहेत. 

 पिंपरी-चिंचवड परिसरात तळवडे येथे आयटी पार्क आहे. या ठिकाणी अनेक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. सध्या वीस हजार सॉफ्टवेअर अभियंते काम करीत आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातून या ठिकाणी कामासाठी येणारे कर्मचारी निगडीमार्गे  येत असतात. निगडी ते तळवडे मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झालेली असते. आॅटो रिक्षा, बस यांनी संपूर्ण रस्ता व्यापलेला असतो. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसतो. पादचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.

   सॉफ्टवेअर चौकात येथील सॉफ्टवेअर कंपन्यांच्या वतीने वाहतूक नियमन करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत, परंतु त्यांनाही वाहनचालक सहकार्य करीत नाहीत. यामुळे वाहतुकीचा गोंधळ होत असतो. यामुळे येथील संगणक अभियंत्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत आहेत. वाहतूककोंडीत अडकलेले अभियंते कित्येकदा एक एक किलोमीटर पायी प्रवास करत कामावर जातात. एमआयडीसीच्या वतीनेही त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तळवडे वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ वेळोवेळी पोलीस कर्मचारी नेमणूक करण्याची मागणी करीत आहेत. 

    याविषयी बाेलताना सिंटेल साॅफ्टेवेअरचे प्रशासकीय व्यवस्थापक जयंत काेंडे म्हणाले, तळवडे येथील सॉफ्टवेअर परिसरात असलेल्या कंपन्यांमधील कर्मचारी वाहतूक कोंडीबाबत वारंवार तक्रार करीत असतात. मात्र त्यामध्ये शासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करुन सुधारणा होईल अशी अपेक्षा असल्याने या कंपन्या येथून बाहेर पडण्याचा विचार करत नाहीत. परंतु वाहतूक कोंडीची समस्या असल्यामुळे या परिसरात कोणतीही नवीन कंपनी स्थापन करण्याचे धाडस करत नाही. या ठिकाणी बालन व पेश ग्रुपचे टॉवर, तसेच एमआयडीसीची आयटी टॉवर इमारत सुसज्ज असूनही वापराविना पडून आहेत. त्यामुळे येथील समस्या सोडविल्यास आणखी कंपन्या येऊन विकास होऊ शकतो.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtalawadeतळवडेITमाहिती तंत्रज्ञानTrafficवाहतूक कोंडी