शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक काेंडीच्या धास्तीने तळवडेतील अायटी पार्क वापराविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:17 IST

हिंजवडीत हाेणाऱ्या वाहतूक काेंडीमुळे येथील कंपन्या काढतापाय घेण्याच्या विचारात असताना अाता तळवडे येथील कंपन्यांनाही वाहतूक काेंडीचा फटका बसत अाहे.

तळवडे : हिंजवडीतील वाहतूककोंडीमुळे येथील कंपन्या स्थलांतराचा विचार करत असताना अाता तळवडे येथील कंपन्यांनाही अशाच पद्धतीने वाहतूककोंडीच्या समस्यांचा सामना करावा लागत अाहे. त्यामुळे तळवडे आयटी पार्कमध्ये नवीन कंपन्या येण्यास धजावत नाहीत. परिणामी येथील एमआयडीसीची इमारत पडून आहे. औद्योगिक आणि आयटी पार्कसाठी उभारण्यात आलेल्या खासगी इमारतीही अशाच वापराविना आहेत. 

 पिंपरी-चिंचवड परिसरात तळवडे येथे आयटी पार्क आहे. या ठिकाणी अनेक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. सध्या वीस हजार सॉफ्टवेअर अभियंते काम करीत आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातून या ठिकाणी कामासाठी येणारे कर्मचारी निगडीमार्गे  येत असतात. निगडी ते तळवडे मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झालेली असते. आॅटो रिक्षा, बस यांनी संपूर्ण रस्ता व्यापलेला असतो. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसतो. पादचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.

   सॉफ्टवेअर चौकात येथील सॉफ्टवेअर कंपन्यांच्या वतीने वाहतूक नियमन करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत, परंतु त्यांनाही वाहनचालक सहकार्य करीत नाहीत. यामुळे वाहतुकीचा गोंधळ होत असतो. यामुळे येथील संगणक अभियंत्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत आहेत. वाहतूककोंडीत अडकलेले अभियंते कित्येकदा एक एक किलोमीटर पायी प्रवास करत कामावर जातात. एमआयडीसीच्या वतीनेही त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तळवडे वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ वेळोवेळी पोलीस कर्मचारी नेमणूक करण्याची मागणी करीत आहेत. 

    याविषयी बाेलताना सिंटेल साॅफ्टेवेअरचे प्रशासकीय व्यवस्थापक जयंत काेंडे म्हणाले, तळवडे येथील सॉफ्टवेअर परिसरात असलेल्या कंपन्यांमधील कर्मचारी वाहतूक कोंडीबाबत वारंवार तक्रार करीत असतात. मात्र त्यामध्ये शासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करुन सुधारणा होईल अशी अपेक्षा असल्याने या कंपन्या येथून बाहेर पडण्याचा विचार करत नाहीत. परंतु वाहतूक कोंडीची समस्या असल्यामुळे या परिसरात कोणतीही नवीन कंपनी स्थापन करण्याचे धाडस करत नाही. या ठिकाणी बालन व पेश ग्रुपचे टॉवर, तसेच एमआयडीसीची आयटी टॉवर इमारत सुसज्ज असूनही वापराविना पडून आहेत. त्यामुळे येथील समस्या सोडविल्यास आणखी कंपन्या येऊन विकास होऊ शकतो.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtalawadeतळवडेITमाहिती तंत्रज्ञानTrafficवाहतूक कोंडी