शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:31 IST

परतीच्या पावसाची हुलकावणी; दुष्काळ जाहीर करण्याची नागरिकांची मागणी, उत्पादन घटणार

वडगाव मावळ : मावळ तालुक्याची ओळख असलेल्या आणि आंब्याच्या मोहराप्रमाणे सुगंध असणारे भात हे मुख्य पीक आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादन २५ ते ३० टक्क्यापर्यंत घटले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. दुष्काळ जाहीर करावा, यासाठी सर्वच पक्षांनी मागणी केली आहे. मात्र अद्याप दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.भातपिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी मावळ तालुका हा अग्रेसर आहे. सुमारे १२ हजार हेक्टरवर भातपीक लागवडीचे क्षेत्र आहे. त्यामध्ये ७० ते ८० टक्के इंद्रायणी, २० ते २५ टक्के फुले समृद्धी, आंबेमोहरचे प्रमाण खूपच कमी झाले असून, ते एक टक्क्यावर गेले आहे. या वर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे भातपीक जोमात येईल, या आशेने शेतकरी आनंदीत होते. परंतु परतीच्या पावसाने धोका दिल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या वर्षी अधिक पाऊस झाल्याचे शासकीय यंत्रणेकडे नोंद असली तरी भातपिकासाठी जो नंतर पडणारा पाऊस आवश्यक होता. तो न पडल्याने पिकाला मोठा फटका बसला आहे. डोंगर पठारावरील भातपीक सुकून गेले आहे. तर काही भागात खडकाळ शेती आहे. त्या भागातही मोठा फटका बसला आहे. हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतकरी दरवर्षी काहीशा प्रमाणात तांदूळ विकून घरातील वर्षभराचा खर्च भागवतात मात्र यावर्षी भातपिकातच निम्म्याने घट झाल्याने विकले तर घरी खायचे काय आणि नाही विकले तर वर्षाचा खर्च कसा भागवायचा या दुहेरी कात्रीत सापडले आहेत. मावळातील, कुसगाव, पुसाणे, चांदखेड, आढले बुद्रुक, जवण, दिवड, ओव्हाळे, जांभवली, थोराण, मोरमारवाडी, उकसान, पालेनामा, कोंडीवडे, ताजे, सदापूर या शिवाय तिन्ही मावळातील काही गावे दुष्काळसदृश्य स्थितीत आहेत.तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे म्हणाले, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादनास फटका बसला आहे. मावळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या साठी सत्ताधारी भाजपा यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली तर बाळासाहेब नेवाळे यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढून मागणी केली.कधी दुष्काळ जाहीर करतंय याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.भात काढणीला आला वेगकार्ला : कार्ला परिसरात कार्ला, वेहेरगाव, भाजे, पाटण आदी परिसरात भात काढणीला चांगला वेग आला आहे. भात झोडणीही उरकून घेण्याची मानसिकता अलीकडच्या काळात शेतकºयांची दिसत आहे़ त्यात पावसानेही लवकर ओढ दिली आहे. भात काढून झाले की प्रत्येक शेतकरी शेतात कडधान्ये पेरीत असतो. पण त्याकरिता शेतात काहीशी ओल असण्याची आवश्यकता आहे. पावसाने लवकर ओढ दिल्याने शेतीची ओल वाढण्याची शक्यता कमी आहे़ लवकर भातकाढणी करून शेत लवकर पेरण्यासाठी शेतकºयांची धावपळ चालू आहे. पण यावर्षी पावसाने ओढ दिल्याने कडधान्ये पेरायला शेतात ओल येते की नाही, याबद्दल शेतकºयांच्या मनात संभ्रम आहे आणि म्हणून लवकर भात काढणी करून जमले तर भातझोडणी करून शेत मोकळे करून पेरणी करण्यासाठी मोठी लगबग चालू आहे.

टॅग्स :droughtदुष्काळmavalमावळ