शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले

By विश्वास मोरे | Updated: June 17, 2025 19:02 IST

संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही. त्यादृष्टीकोनातून पाऊले टाकायची नाहीत, भाजपशी संबंध ठेवणारा काँग्रेसच्या विचाराचा असू शकत नाही, अशी परखड भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी मांडली. 

पिंपरी : ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, आपण पुन्हा नव्याने सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्त्यांच्या बळाने यश मिळवूयात. फुले-शाहू-आंबेडकर, गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन पुढे जायचे आहे, हा विचार जर सगळे म्हणत असतील तर मला मान्य आहे. सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचे ही भूमिका कोणी मांडत असेल तर, हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा. पण, भाजपशी संबंध ठेऊ नका. संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही. त्यादृष्टीकोनातून पाऊले टाकायची नाहीत, भाजपशी संबंध ठेवणारा काँग्रेसच्या विचाराचा असू शकत नाही, अशी परखड भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी मांडली. ताथवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)  पक्षाच्या संकल्प मेळाव्यात पवार बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, निरीक्षक प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, सुलक्षणा धर शिलवंत, अरुण बोऱ्हाडे, देवेंद्र तायडे, इम्रान शेख उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांनी शहराची विभागणी केली शरद पवार म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांनी  शहराची विभागणी केली आहे.  नदीच्या, रस्त्याच्या पलीकडे आणि अलीकडे अशी शहराची वाटणी झाली आहे. हा नवीन व्यवसाय राजकारणात सुरु झाला आहे. हे स्वच्छ करायचे आहे. नदीसह शहरातील नेतृत्वाबाबतचे चित्र स्वच्छ करायचे आहे. त्यासाठी शहरात मी अधिक लक्ष घालणार आहे.'  विकास आपण केला, त्यांची चिंता करू नका शरद पवार म्हणाले, 'जे पक्ष सोडून गेले, त्यांची चिंता करू नका, नवीन लोक आहेत. आयुष्यात अनेकदा मी अशा गोष्टी अनुभवल्या आहेत. मुख्यमंत्री असताना एकदा  सरकार बरखास्त झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ७० आमदार निवडून आले. दोन महिन्यांनी काही कामासाठी मी इंग्लंडला गेलो. तर, दहा दिवसात राज्यात चमत्कार झाला. ७० पैकी ६४ आमदार सोडून गेले. मला आश्चर्य वाटले. लोकांनी पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी चिंताग्रस्त झालो नाही. लोकांशी संपर्क वाढविला. पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत जे सोडून गेले, त्यातील ९० टक्के लोकांचा पराभव झाला.'   महिला, तरुणांना संधी दिली जाईलमहापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणाले, 'महापालिका निवडणुकीत महिला, तरुणांना संधी दिली जाईल. प्रत्येक प्रभागात नवीन नेतृत्व तयार केले जाईल.  पिंपरी-चिंचवड महापालिका अनेक वर्षे काँग्रेसच्या विचाराकडे होती. मध्यंतरी गडबड झाली आणि भाजपची सत्ता आली. हे चित्र बदलायचे आहे.;   डॉ.  अमोल कोल्हे म्हणाले, 'स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट वाहतूक, पदपथ यावर पंधराशे कोटी खर्च केले. सीसीटीव्ही कधी सुरु होणार, बांगलादेशी रोहिंगे म्हणून कुदळवाडीवर बुलडोजर फिरविला. किती रोहिंगे सापडले. चार हजार लघु उद्योग देशोधडीला लागले. प्रशासकीय राजवटीत आलेला विकास आराखडा एकतर्फी आहे. निळी रेषा बदलली आहे. कुणाच्या फायद्यासाठी? मुळा, पवना आणि इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यापेक्षा त्यावर ब्युटिफिकेशन सुरु आहे. चुकीच्या कारभाराला आला घालण्यासाठी सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरायला हवे.'

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड