शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातून श्रमिकांच्या साहित्यास दिशा

By admin | Updated: December 28, 2015 01:17 IST

श्रमसंस्कृती असणाऱ्या शहरात साहित्य संस्कृती चांगल्या पद्धतीने रुजत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने पिंपरी-चिंचवडमधील श्रमिकांच्या साहित्यास दिशा मिळेल

पिंपरी : श्रमसंस्कृती असणाऱ्या शहरात साहित्य संस्कृती चांगल्या पद्धतीने रुजत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने पिंपरी-चिंचवडमधील श्रमिकांच्या साहित्यास दिशा मिळेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे संमेलनपूर्व संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित संमेलनात डॉ. मोरे बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर, मसापचे शाखाध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष तुकाराम पाटील आदी उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनाची वातावरणनिर्मिती सुरू आहे. मॉन्सूनपूर्व मॉन्सून येत असतो, तसे हे संमेलन आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर रुजू झाल्यानंतर मी वर्षभर २९० कार्यक्रम केले. संमेलनाध्यक्ष एक वर्ष स्थापित केलेल्या गणपतीसारखा असतो, अशी टीका काही लोक करतात. मात्र, संमेलनाध्यक्ष कोणत्या उंचीचा आहे, हे त्याच्या कार्यकर्तृत्वातून दिसते.’’डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘माणसाने निर्माण केलेले स्वप्न म्हणजे देवत्व होय. संगीत, नाट्य या कलांच्या अभिव्यक्तीचे पूर्णत्व म्हणजे देवत्व होय. भाषांपलीकडे जाऊन विधायक उपक्रम राबविण्याचे काम साहित्य संमेलनाची मंडळी करीत आहेत.’’वैद्य म्हणाल्या, ‘‘भाषेसाठी होणाऱ्या जगभरातील सोहळ्यांपैकी सर्वांत मोठा सोहळा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. मराठी माणसांना वाद घालण्याची सवय आहे. चांगले होण्यासाठी वादही आवश्यक असतात. वाद असेल, तर संवाद प्रबळ होतो. त्यामुळे वाद होण्यात काही गैर नाही. मराठीपुढील काळ अवघड आहे, तरुणांना मराठी साहित्याकडे वळविण्याची गरज आहे.’’ डॉ देखणे म्हणाले, ‘‘माझीया जातीचे भेटो कुणी...’ या संतवचनाचा अनुभव आज येत आहे. कारण १९८४ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची पहिली शाखा शहरात स्थापन झाली. देहू-आळंदीतून संतांच्या पालख्या ज्या गावातून निघतात, तिथेच त्यांचा पहिला मुक्काम असतो. त्यापूर्वी प्रस्थान सोहळा असतो. १५ जानेवारीला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पालखीचे प्रस्थान करण्याचा आज सोहळा आहे. या शहरात श्रमसंस्कृती उजळली, शब्द संस्कृती तेजाळली आहे. कामगाराचे साहित्य निर्मितीचे हात असतात, तसेच साहित्यिकांचे हातही साहित्य निर्मितीचे असतात. शब्द सृजनाचा सांगाता साहित्य आहे, तर वस्तुसृजनाचा प्रजापती कामगार आहे. जाणीव जेव्हा लौकिक अर्थाला प्राप्त होते त्यास अनुभव म्हणतात, तीच जाणीव अलौकिक असते, तिला अनुभूती म्हणतात. जाणिवेचे सहजसुंदर दर्शन साहित्य आहे.’’या वेळी ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. गिरीश प्रभुणे, अरुण शेवते, बशीर मुजावर, मधू जोशी, प्रकाश रोकडे, डॉ. वंदना घांगुर्डे, अरुण बोऱ्हाडे, अमृत पऱ्हाड, रमेश डोळस, अशोक त्रिभुवन, अशोक कोठारी, निशिकांत गोडबोले, मकरंद आंबेकर, विष्णू जोशी, सुभाष सरीन, मुरलीधर जावडेकर, चित्रकार मनोहर, शांताराम हिवराळे, संजय पवार यांचा गौरव करण्यात आला.(प्रतिनिधी)