शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

‘डीवाय’ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, विद्यापीठाकडून गौरव, विविध उपक्रमांच्या आयोजनाची घेतली दखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:26 IST

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

पिंपरी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.विविध योजनांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग घेतल्याबद्दल सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट उपक्रम राबवणाºया महाविद्यालयांना पारितोषिके दिली जातात. कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते पुणे येथील समारंभात महाविद्यालयास गौरविण्यात आले.महाविद्यालयात एन. सी. एल. चे शास्त्रज्ञ डॉ. अशोक गिरी, विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागप्रमुख डॉ. राम गंभीर, डॉ. संजय कप्तान, डॉ. रवींद्र जायभाये, वन विभागप्रमुख शिवाजीराव फंटागरे आदींनी महाविद्यालयास भेट देऊन मार्गदर्शन केले. महाविद्यालयाला डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे डॉ. पी. डी. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त भाग्यश्री पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांचे उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन लाभले.योजना राबविताना विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, डॉ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे, स्टाफ सेक्रटरी प्रा. शरद बोडखे, प्रा. अंजली आकिवाटे, प्रा. मिनल भोसले, प्रा. अर्चना ठुबे, अमित साळुंखे तसेच इतर प्राध्यापकांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच हे शक्य झाले असे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी सांगितले. या यशात प्राचार्य डॉ. वामन, प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले.महाविद्यालयाने गतवर्षी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी या साठी अविष्कार उपक्रम राबविला. राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर कळसुबाई, हरिश्चंद्र गड अभयारण्य या ठिकाणी आयोजित केले होते. शिबिराला तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी भेट दिली. स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी विद्यापीठस्तरीय स्वच्छ भारत अभियान शिबिर रतनवाडी, हरिश्चंद्रगड या ठिकाणी आयोजित केले. विद्यापीठस्तरीय जैवविविधता शिबिर भीमाशंकर येथे आयोजित करण्यात आले. वन विभाग दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला प्राणीगणना उपक्रम राबवितो. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.