शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

‘डीवाय’ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, विद्यापीठाकडून गौरव, विविध उपक्रमांच्या आयोजनाची घेतली दखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:26 IST

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

पिंपरी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.विविध योजनांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग घेतल्याबद्दल सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट उपक्रम राबवणाºया महाविद्यालयांना पारितोषिके दिली जातात. कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते पुणे येथील समारंभात महाविद्यालयास गौरविण्यात आले.महाविद्यालयात एन. सी. एल. चे शास्त्रज्ञ डॉ. अशोक गिरी, विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागप्रमुख डॉ. राम गंभीर, डॉ. संजय कप्तान, डॉ. रवींद्र जायभाये, वन विभागप्रमुख शिवाजीराव फंटागरे आदींनी महाविद्यालयास भेट देऊन मार्गदर्शन केले. महाविद्यालयाला डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे डॉ. पी. डी. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त भाग्यश्री पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांचे उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन लाभले.योजना राबविताना विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, डॉ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे, स्टाफ सेक्रटरी प्रा. शरद बोडखे, प्रा. अंजली आकिवाटे, प्रा. मिनल भोसले, प्रा. अर्चना ठुबे, अमित साळुंखे तसेच इतर प्राध्यापकांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच हे शक्य झाले असे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी सांगितले. या यशात प्राचार्य डॉ. वामन, प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले.महाविद्यालयाने गतवर्षी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी या साठी अविष्कार उपक्रम राबविला. राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर कळसुबाई, हरिश्चंद्र गड अभयारण्य या ठिकाणी आयोजित केले होते. शिबिराला तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी भेट दिली. स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी विद्यापीठस्तरीय स्वच्छ भारत अभियान शिबिर रतनवाडी, हरिश्चंद्रगड या ठिकाणी आयोजित केले. विद्यापीठस्तरीय जैवविविधता शिबिर भीमाशंकर येथे आयोजित करण्यात आले. वन विभाग दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला प्राणीगणना उपक्रम राबवितो. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.