शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १ जुलैला प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 17:09 IST

संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली माहिती

ठळक मुद्देमागच्या वर्षी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून २० भाविकांच्या उपस्थितीत पार पडला पालखी सोहळा

देहूगाव- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे १ जुलैला प्रस्थान होणार आहे. भजनी मंडपातून  दुपारी २ वाजता पालखी पंढरपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोव्हीड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या आषाढवारी पायी पालखी सोहळ्याला सुरवात होणार असून या पालखी सोहळ्याच्या तयारीला संस्थानच्या वतीने सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणजे पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुखांची निवड व पालखी प्रस्थानाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यासाठी संस्थानच्या कार्यालयात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालखी सोहळा प्रमुख म्हणून अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यांची निवड करण्यात आली आहे. या पालखी सोहळा प्रमुखांच्या नियंत्रणात श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या पालखी सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. यावेळी संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते. 

पालखी सोहळा हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव समजले जाते. यासोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहू ते पंढरपूर पायी वारी करत असतात. गतवर्षी पालखी प्रस्तान सोहळ्याच्या आगोदर काही दिवस व प्रस्थानच्या वेळी श्री क्षेत्र देहूगावसह, पुणे जिल्ह्यात व राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत होता. वारीची परंपरा खंडीत होऊ नये. ही भाविकांची व वारकऱ्यांची मागणी याचा विचार करून या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने हा पालखी सोहळा मोजक्याच लोकांच्या म्हणजे अवघ्या २० भाविकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे आदेश दिले होते. पालखी प्रस्थानापासून सर्व कार्यक्रम मंदिराच्या आवारातील भजनी मंडपात पालखी सोहळ्यातील सर्वच सोपस्कार पार पाडले जात होते.

आषाढ महिन्यातील दशमीच्या दिवशी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी ऐवजी केवळ पादुकाच पंढरपूरला बसमध्ये नेण्याची शासनाने परवानगी दिली होती. या काळात ही बस कोठेही न थांबविता थेट पंढरपूर येथे पालखी मुक्कामाच्या दिवशी नेण्यास परवानगी दिली होती. व बारशीच्या दिवशी नगरप्रदक्षिणा घालुन पालखी पालखी परतीच्या मार्गाने देहूत मुक्कामी आली होती. येथेच उर्वरीत पालखी सोहळा देखील भजनी मंडपात पार पडला होता व पालखी सोहळ्याची सांगता देखील मंदिरात केवळ २० लोकांच्या उपस्थितीत झाली होती.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीGovernmentसरकार