शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी
2
"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
4
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
5
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
6
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
7
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
8
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
9
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
10
Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार
11
जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!
12
बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं
13
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
14
एका चुकीच्या क्लिकने 'आयुष्यभराची कमाई' साफ; सायबर भामट्यांनी चलानच्या नावाखाली लुटले ३.६ लाख
15
देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू 
16
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
17
Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
बजाज-अलायन्झचा २४ वर्षांचा प्रवास संपला! संजीव बजाज यांची 'मास्टरस्ट्रोक' डील; आता पूर्ण मालकी भारतीयांकडे
19
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
20
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
Daily Top 2Weekly Top 5

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १ जुलैला प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 17:09 IST

संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली माहिती

ठळक मुद्देमागच्या वर्षी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून २० भाविकांच्या उपस्थितीत पार पडला पालखी सोहळा

देहूगाव- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे १ जुलैला प्रस्थान होणार आहे. भजनी मंडपातून  दुपारी २ वाजता पालखी पंढरपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोव्हीड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या आषाढवारी पायी पालखी सोहळ्याला सुरवात होणार असून या पालखी सोहळ्याच्या तयारीला संस्थानच्या वतीने सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणजे पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुखांची निवड व पालखी प्रस्थानाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यासाठी संस्थानच्या कार्यालयात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालखी सोहळा प्रमुख म्हणून अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यांची निवड करण्यात आली आहे. या पालखी सोहळा प्रमुखांच्या नियंत्रणात श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या पालखी सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. यावेळी संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते. 

पालखी सोहळा हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव समजले जाते. यासोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहू ते पंढरपूर पायी वारी करत असतात. गतवर्षी पालखी प्रस्तान सोहळ्याच्या आगोदर काही दिवस व प्रस्थानच्या वेळी श्री क्षेत्र देहूगावसह, पुणे जिल्ह्यात व राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत होता. वारीची परंपरा खंडीत होऊ नये. ही भाविकांची व वारकऱ्यांची मागणी याचा विचार करून या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने हा पालखी सोहळा मोजक्याच लोकांच्या म्हणजे अवघ्या २० भाविकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे आदेश दिले होते. पालखी प्रस्थानापासून सर्व कार्यक्रम मंदिराच्या आवारातील भजनी मंडपात पालखी सोहळ्यातील सर्वच सोपस्कार पार पाडले जात होते.

आषाढ महिन्यातील दशमीच्या दिवशी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी ऐवजी केवळ पादुकाच पंढरपूरला बसमध्ये नेण्याची शासनाने परवानगी दिली होती. या काळात ही बस कोठेही न थांबविता थेट पंढरपूर येथे पालखी मुक्कामाच्या दिवशी नेण्यास परवानगी दिली होती. व बारशीच्या दिवशी नगरप्रदक्षिणा घालुन पालखी पालखी परतीच्या मार्गाने देहूत मुक्कामी आली होती. येथेच उर्वरीत पालखी सोहळा देखील भजनी मंडपात पार पडला होता व पालखी सोहळ्याची सांगता देखील मंदिरात केवळ २० लोकांच्या उपस्थितीत झाली होती.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीGovernmentसरकार