शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

Delhi violence : पिंपरी-चिंचवड शहरातील शांततेसाठी पाेलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 16:42 IST

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांतता ठेवण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पाेलिसांकडून करण्यात आले आहे.

पिंपरी : आपल्या शहरातील शांतता भंग होणार नाही, याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून करण्यात आले आहे.  

सीएए, एनआरसी या कायद्यांच्या विरोधात तसेच समर्थनार्थ देशात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यातील दिल्ली येथील आंदोलन चिघळले असून, त्यात काही जणांचा बळी गेला. त्यामुळे सोशल मीडियावरून अफवांचे पेव फुटले आहे. या आंदोलनाला वेगळे वळण देऊन देशातील इतर भागात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मीडियातील संदेशांतून होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड सायबर सेलचा सोशल मीडियावर ‘वॉच’ आहे.

सध्याच्या परिस्थितीत आपल्या शहरातील शांतता भंग होणार नाही, याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घ्यावी. सोशल मीडियावर आमचे लक्ष आहे. जबाबदारीने सोशल मीडियावरील संदेशांची देवाण-घेवाण करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याला काही आक्षेपार्ह आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर कॉल करा, असे आवाहन या ‘ट्वीट’मधून करण्यात आले आहे. 

सीएए, एनआरसी या कायद्यांच्या विरोधात तसेच समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड शहरात देखील यापूर्वी विविध संघटनांकडून शांततेत आंदोलन करण्यात आले आहे. त्यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. असे असले तरी दिल्लीतील आंदोलन चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अधिक खबरदारी घेण्यात येत असून, शहरात शांतता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाdelhi violenceदिल्ली