शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

सरकारविरोधात हल्लाबोल, भाजपा सरकार फेकू असल्याची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:11 IST

भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पिंपरी : भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आकुर्डी गावठाण ते प्राधिकरण तहसील कार्यालयापर्यंत ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या समारोपावेळी घेण्यात आलेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी हल्लाबोल आंदोलनामागील भूमिका विशद केली.ते म्हणाले, की सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे अशी हल्लाबोल आंदोलने राज्यात सर्वत्र होणार आहेत. २९ नोव्हेंबरला पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन होईल. १ ते १२ डिसेंबर या कालावधीत यवतमाळ ते नागपूर असे आंदोलन करण्यात येणार आहे.ज्या पिंपरी-चिंचवडला स्वच्छतेचा मान मिळवून दिला, त्या शहरात कचºयाचे ढीग दिसून येतात. अनधिकृत बांधकामे नियमित करू, शास्ती माफ करू ही त्यांची आश्वासने हवेत विरली आहेत.भाजपा सरकार अपयशी पडू लागल्याचे निवेदन अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे यांच्याबरोबर जाऊन अप्पर तहसीलदार संजय भोसले यांना दिले.महापालिकेत, राज्यात, देशात त्यांची सत्ता असताना प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागते. सांगली प्रकरणात एका निष्पाप तरुणाला केवळ संशयावरुन पकडून पोलिसांनी जिवंत मारले. एवढेच नव्हे, तर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. भाजपा सरकारच्या काळात माणसे जिवंत जाळली जात आहेत, ही शोकांतिका आहे. भाजपा नेत्यांना बोलताना तारतम्य नसल्याचे पवार यांनी नमूद केले. पालकमंत्रीच सभेत दारूला महिलेचे नाव द्या, जास्त विक्री होईल असा सल्ला देतात. राज्याचे प्रमुख दस्तुरखुद्द मुख्यमंत्री भर सभेत नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढतात. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून काय आभाळ फाटलं का?

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड