शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सरकारविरोधात हल्लाबोल, भाजपा सरकार फेकू असल्याची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:11 IST

भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पिंपरी : भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आकुर्डी गावठाण ते प्राधिकरण तहसील कार्यालयापर्यंत ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या समारोपावेळी घेण्यात आलेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी हल्लाबोल आंदोलनामागील भूमिका विशद केली.ते म्हणाले, की सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे अशी हल्लाबोल आंदोलने राज्यात सर्वत्र होणार आहेत. २९ नोव्हेंबरला पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन होईल. १ ते १२ डिसेंबर या कालावधीत यवतमाळ ते नागपूर असे आंदोलन करण्यात येणार आहे.ज्या पिंपरी-चिंचवडला स्वच्छतेचा मान मिळवून दिला, त्या शहरात कचºयाचे ढीग दिसून येतात. अनधिकृत बांधकामे नियमित करू, शास्ती माफ करू ही त्यांची आश्वासने हवेत विरली आहेत.भाजपा सरकार अपयशी पडू लागल्याचे निवेदन अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे यांच्याबरोबर जाऊन अप्पर तहसीलदार संजय भोसले यांना दिले.महापालिकेत, राज्यात, देशात त्यांची सत्ता असताना प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागते. सांगली प्रकरणात एका निष्पाप तरुणाला केवळ संशयावरुन पकडून पोलिसांनी जिवंत मारले. एवढेच नव्हे, तर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. भाजपा सरकारच्या काळात माणसे जिवंत जाळली जात आहेत, ही शोकांतिका आहे. भाजपा नेत्यांना बोलताना तारतम्य नसल्याचे पवार यांनी नमूद केले. पालकमंत्रीच सभेत दारूला महिलेचे नाव द्या, जास्त विक्री होईल असा सल्ला देतात. राज्याचे प्रमुख दस्तुरखुद्द मुख्यमंत्री भर सभेत नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढतात. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून काय आभाळ फाटलं का?

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड