शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकारविरोधात हल्लाबोल, भाजपा सरकार फेकू असल्याची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:11 IST

भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पिंपरी : भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आकुर्डी गावठाण ते प्राधिकरण तहसील कार्यालयापर्यंत ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या समारोपावेळी घेण्यात आलेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी हल्लाबोल आंदोलनामागील भूमिका विशद केली.ते म्हणाले, की सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे अशी हल्लाबोल आंदोलने राज्यात सर्वत्र होणार आहेत. २९ नोव्हेंबरला पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन होईल. १ ते १२ डिसेंबर या कालावधीत यवतमाळ ते नागपूर असे आंदोलन करण्यात येणार आहे.ज्या पिंपरी-चिंचवडला स्वच्छतेचा मान मिळवून दिला, त्या शहरात कचºयाचे ढीग दिसून येतात. अनधिकृत बांधकामे नियमित करू, शास्ती माफ करू ही त्यांची आश्वासने हवेत विरली आहेत.भाजपा सरकार अपयशी पडू लागल्याचे निवेदन अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे यांच्याबरोबर जाऊन अप्पर तहसीलदार संजय भोसले यांना दिले.महापालिकेत, राज्यात, देशात त्यांची सत्ता असताना प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागते. सांगली प्रकरणात एका निष्पाप तरुणाला केवळ संशयावरुन पकडून पोलिसांनी जिवंत मारले. एवढेच नव्हे, तर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. भाजपा सरकारच्या काळात माणसे जिवंत जाळली जात आहेत, ही शोकांतिका आहे. भाजपा नेत्यांना बोलताना तारतम्य नसल्याचे पवार यांनी नमूद केले. पालकमंत्रीच सभेत दारूला महिलेचे नाव द्या, जास्त विक्री होईल असा सल्ला देतात. राज्याचे प्रमुख दस्तुरखुद्द मुख्यमंत्री भर सभेत नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढतात. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून काय आभाळ फाटलं का?

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड