शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी शहरातील रुग्णालयांचे म्हणजे 'नाव मोठे अन् लक्षण खोटे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 12:44 IST

जेवढे पैसे घेता तेवढी तरी सुविधा द्या, रुग्णांच्या नातेवाईकांची माफक अपेक्षा

ठळक मुद्देकोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची भावना

युगंधर ताजणे

पिंपरी :  कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने  ‘त्या’ रुग्णालयातील जनरल वॉर्डात भरती झालो. डिपॉझिट म्हणून 30 हजार रुपये देखील घेतले गेले. पुढे महिनाभर रुग्णालयात उपचार घेत होतो. मात्र या काळात त्यांच्याकडून मिळालेली सेवा अतिशय मानसिक त्रास देणारी होती. प्यायला पाणी हवे असल्यास देखील तीन ते चार वेळा नर्सेसला विनवणी करावी लागत होती. जनरल वॉर्डमध्ये तर डॉक्टर फिरकत सुध्दा नव्हते. उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांचे महिनाभर नाव ऐकले परंतु रुग्णालयातून डिस्जार्ज मिळेपर्यंत ते काही दिसले नाहीत. यासंबंधी विचारणा केली असता ते सुट्टीवर आहेत, एका महत्वाच्या मिटींगमध्ये आहेत असे सांगितले जायचे. साडेतीन लाख रुपयांचे बील भरुन रुग्णालयातून बाहेर पडलो. किमान जेवढे पैसे घेता त्या प्रमाणात उपचार देखील करा. अशी व्यथा होनाजी अहिनवे (रुग्णाचे नाव बदलले आहे) यांनी व्यक्त केली आहे.  

होनाजी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांना सांगण्यात आल्यानंतर ते तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार देखील सुरु करण्यात आले. काही दिवसानंतर त्यांना तेथील ढिसाळ नियोजन व कार्यशैलीचा प्रत्यय येऊ लागला. उपचारापूर्वी पैशांची मागणी, ती पूर्ण केल्यानंतर उपचार केव्हा केले, कसे केले याची रुग्णाला देखील माहिती नसते अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या बाजुच्या कॉटवर असणा-या एका रुग्णाला पाणी हवे असताना त्यासाठी त्याला अनेक तास प्रतिक्षा करावी लागली. एकदा पाणी दिल्यानंतर दोन ते तीन दिवस कुणी पाहत नव्हते. नर्सेस सोडल्यास कुणीही रुग्णाकडे फिरकत देखील नाही.  जे बेड होते त्यांचा दर्जा अतिशय नित्कृष्ठ होता. दहा ते बारा दिवस आयसीयुमध्ये असताना तेवढ्या कालावधीत कुठला डॉक्टर  तिथे आल्याचे आठवत नाही.  

‘त्या’ रुग्णालयाचा अनुभव अतिशय क्लेशकारक होता. बाथरुम मध्ये साबण नाही. सँनिटायझरची व्यवस्था नाही. अशी परिस्थिती होती. नर्सेस औषधे देण्यासाठी, आॅक्सिजन देण्यासाठी यायच्या. इतर डॉक्टर बाहेरुन रुग्णांशी संवाद साधत होते. विशेष म्हणजे घरातील इतर नातेवाईक आकुर्डीतील आणि बालेवाडीतील एका पालिका प्रशासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या दवाखान्यात दाखल होते. मात्र त्यांना तिथे सर्वसोयीसुविधा चांगल्या मिळाल्या. रुग्णांची काळजी घेतली जात होती. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. 

 पॅकेज घ्या, घरी ‘क्वारंटाईंन’ व्हा आम्ही उपचार करु कोरोनाचा वाढणारा संसर्ग यामुळे आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये पुरेशा संख्येने बेड उपलब्ध नाहीत. अशावेळी रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी काही खासगी रुग्णालयांनी नवा  ‘फंडा’ शोधून काढला आहे. यात रुग्णाने आपली चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच क्वॉराईनटाईन होण्याचा पर्याय रुग्णांसमोर ठेवल आहे. यासाठी दहा ते वीस हजारांपर्यंतचे पँकेज रुग्णालय देणार असून यामध्ये रुग्णाला टेलिमेडिसनच्या साह्याने समुपदेशन, थर्मामीटर, हायड्रोक्लोरोक्वीनच्या गोळया, आॅक्सीमीटर, मास्क, ग्लोव्हज आदी सुविधा देण्यात येणार आहेत. एकीकडे प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल असताना रुग्णांना पुरेसे उपचार मिळत नाहीत. अशावेळी घरी क्वारंटाईन झाल्यानंतर रुग्ण बरा होईल का? असा प्रश्न रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर