शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

कोेरोनाची भीती अन् रोजगार जाण्याची चिंता; पिंपरीतील कामगारांची दैनावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 17:10 IST

पिंपरी-चिंचवड एमआयडीसीत पाच लाखावर कामगार

ठळक मुद्देसोयीसुविधा नाकारून गावी जाण्यासाठी केले जातेय आर्जव घरमालकांकडून कामगारांकडे घरभाड्याच्या रकमेसाठी तगादा सामाजिक संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींकडून कामगारांच्या कुटुंबांना किराणा व धान्य वाटप

नारायण बडगुजर-पिंपरी : लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने शहरात लाखांवर कामगार अडकून पडले आहेत. त्यांची दैनावस्था आहे. निवारा केंद्रांतील कामगारांची अवस्था न घरका, ना घाटका...अशी झाली आहे. रोजगार गेल्याने ते चिंतेत आहेत. मात्र त्याहीपेक्षा त्यांच्यात कोरोनाची दहशत आहे. निवारा केंद्रांत शेकडो कामगारांना एकत्र रहावे लागत आहे. तसेच छोट्याश्या भाड्याच्या खोल्यांमध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या भितीने त्यांना ग्रासले आहे. मदत किंवा सोयीसुविधा नको, आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, असे आर्जव त्यांच्याकडून करण्यात येत आहे.   पिंपरी-चिंचवडएमआयडीसीत पाच लाखावर कामगार आहेत. यात पुणे जिल्ह्यासह परजिल्हा व परराज्यातील लाखो कामगारांचा समावेश आहे. यातील ८५ टक्के कामगार हंगामी तसेच ठेकेदार तत्वावर काम करतात. या कामगारांचा थेट कंपनीशी संबंध नसतो. ठेकेदाराच्या माध्यमातून ते संबंधित कंपनीत काम करतात. त्यामुळे अनेक कंपन्यांनी या कामगारांची जबाबदारी घेण्याचे टाळले आहे. तर काही ठेकेदारांनी देखील त्यांच्या कामगारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या जेवण व राहण्याचा खर्च करावा लागेल, असा विचार करून काही ठेकेदारांनी पळ काढला आहे. कामगारांनी त्यांना फोन केल्यानंतरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. हंगामी तत्वावरील कामगार एका कंपनीत १० ते ११ महिने काम करतात. त्यानंतर गावी निघून जातात. पुन्हा काही दिवसांनी शहरात येऊन नव्याने हंगामी पद्धतीने काम करतात. अशा कामगारांचा शहरातील रहिवास पुरावा नसतो. कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात. तसेच काही कुटुंबे सतत स्थलांतर करीत असतात. अशा कुटुंबांकडे देखील शहरातील रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा इतर रहिवास पुरावा नसतो. अशा कुटुंबांना व कामगारांना सध्या शासनाकडून मदत मिळविण्यात अडचणी येत आहेत. शहरातील सामाजिक संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींकडून कामगारांच्या कुटुंबांना किराणा व धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळत आहे. मात्र ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. काही कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी दीड ते दोन किलोमीटर चालत जावे लागते. यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याचे प्रकार समोर येत आहेत. 

घरमालकांकडून घरभाड्यासाठी तगादालाखो कामगार भाडे तत्वावर कुटुंबासह शहरात राहतात. तसेच हजारो कामगार कुटुंबाविना येथे वास्तव्य करतात. छोट्याश्या एकाच खोलीत १० ते १२ जण एकत्र राहत असल्याने त्यांचा कोंडमारा होत आहे. बाहेर पडता येत नसल्याने कोंबल्यासारखे त्यांना रहावे लागत आहे. असे असतानाही घरमालकांकडून कामगारांकडे घरभाड्याच्या रकमेसाठी तगादा लावण्यात येत आहे. उद्योग बंद असल्याने रोजगार गेला आहे. त्यामुळे घरभाडे द्यायचे कसे, असा प्रश्न या कामगारांना सतावत आहे.    

..........

अचानक लॉकडाऊन केल्याने कामगारांना गावी जाता आले नाही. दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत. एक लाख कामगार बेरोजगार झाले आहेत. कंपनीच्या मालकांनी व शासनाने त्यांना जगण्यापुरते वेतन दिले पाहिजे. तसेच आणखी शेल्टर सुरू केले पाहिजेत. त्यासाठी आपत्कालीन सेवा सुविधा कायदा लागू करण्यात यावा.- अनिल रोहम, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य, ग्रीव्हज कॉटन एम्ल्पॉइज युनियन (आयटक)

....................

लॉकडाऊनमुळे कंपनी व्यवस्थापनाने ठेकेदारांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे ठेकेदार कामगारांना पगार देत नाहीत. यातील हजारो कामगारांकडे शहरातील रेशनकार्ड नाहीत. त्यामुळे त्यांना मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. तहसीलदार व तलाठी यांच्या माध्यमातून काही भागात मदत पुरविली जात आहे. मात्र ती मदत पुरेशी नाही. एकाच निवारा केंद्रात शेकडो कामगार आहेत. त्यामुळे तेथील सुविधांवर मयार्दा येत आहेत.- यशवंत भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी

  ...............शहरात लाखो कष्टकरी व कामगार ठेकेदारी पद्धतीने काम करतात. मात्र त्यांच्या ठेकेदारांनी या कामगारांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. कामगारांची ही फसवणूक असून, अशा ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे. कामगार स्वाभीमानी असतात. त्यामुळे मदत घेताना देखील त्यांना संकोच वाटतो. मदत नको आम्हाला काम द्या, अशी त्यांची मागणी आहे. - काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEmployeeकर्मचारीMIDCएमआयडीसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस