शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

केंद्राच्या योजनांच्या लाभासाठी समिती - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 03:10 IST

केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला व्हावा यासाठी पाच सादस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे राज्याच्या हिस्स्या व्यतिरिक्त केंद्र्राच्या एकूण उपलब्ध निधीमध्ये राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी विशिष्ट वेळेत प्रभावी प्रस्ताव वेळेत तयार करावा याची यंत्रणा उभी केली जाईल

पुणे : केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला व्हावा यासाठी पाच सादस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे राज्याच्या हिस्स्या व्यतिरिक्त केंद्र्राच्या एकूण उपलब्ध निधीमध्ये राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी विशिष्ट वेळेत प्रभावी प्रस्ताव वेळेत तयार करावा याची यंत्रणा उभी केली जाईल, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी पुण्यात सांगितले.राज्याच्या नियोजन विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखाडा बैठकी दरम्यान पत्रकारांशी बोलतानात्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली.तसेचराज्याच्या अर्थसंकल्पाची दिशाही रोजगार आरोग्य,शिक्षण, पाणी,शेती, पायाभूत सुविधा निर्माण करणारी असेल,असेही त्यांनी नमूद केले.मुनगंटीवार म्हणाले, ‘गरिबो के सन्मानमे भारत सरकार मैदान मे ’ या घोष वाक्यानुसार अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. गरीबातील गरीब व्यक्तीक्तींपर्यंत आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.साधारणपणे ५० कोटी लोकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. १० कोटी कुटुंबाला वर्षाला पाच लक्ष रुपये आरोग्यावर खर्च होतील. तब्बल ७० लाख नवीन नोक-या तयार होतील,अशी व्यवस्था देशात तयार केली जाणार आहे.तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून नोक-या निर्माण करण्याचा आणि शेवटच्या कुटुंबापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न अर्थंकल्पात झाला आहे.बांबू मिशनसाठी मिळणार निधीमहाराष्ट्राला बचतगटातून मोठा हिस्सा मिळणार आहे. महाराष्ट्रात बांबू मिशन स्थापन करण्यात आले असून त्यासाठीही निधी मिळणार आहे. तीन लोकसभा विभागात एक मेडिकल कॉलेज सुरू केले जाणार त्यात राज्याला कॉलेज मिळतील. रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार असून मुंबईच्या लोकलसाठी मोठी रक्कम उपलब्ध करून दिली आहे. फुड प्रोसेसिंग युनिटमध्ये महाराष्ट्राला वाटा मिळेल, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.कृषी क्षेत्रासाठी ११ लाख कोटी पतपुरवठा करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच ‘पीक क्लस्टर’ ही संकल्पना राज्याच्या कृषी व्यवस्थेला दिशा देणारी ठरणार आहे. ४२ हजार कोटी बचत गटांना असणारा निधी७५ हजार कोटी रुपयांपर्यंत घेवून जाण्यात आला आहे.त्यामुळे रोजगार मागणाºया हातापेक्षा रोजगार देणाºया हात निर्माण करण्याचा दृष्टीकोन अर्थसंकल्पातून दिसून येतो. अर्थसंकल्पात पर्यावरण विषयक लक्ष दिले आहे. १२९० कोटी बांबू मिशनसाठी ५०० कोटी ग्रीन भारतासाठी, निधीची तरतुद केली आहे.‘भारतमाता माझी आई पण डोके ठेवायला घर नाही’ अशी आजची आवस्था आहे.अनेक नागरिकांना स्वत:चे हक्काचे घर नाही. त्यामुळे प्रत्येकाला २०२२ पर्यंत बेघर असणाºयांना घर देण्याचा संकल्प जेटली यांनी केला आहे.आदिवासी बांधवांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी एकलविद्यालयाची कल्पना मांडण्यात आली आहे. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने मुद्रा बँकेच्या माध्यमातून ३ लाख कोटी रुपये देण्याचा मोठा निर्णय झाला आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्र