शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड ते कन्याकुमारी सात दिवसांत; पर्यावरण, शिक्षण, आरोग्य विषयक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 04:41 IST

साडे सात दिवसांत चिंचवड ते कन्याकुमारी (तामिळनाडू) सायकल प्रवास जलदगतीने पूर्ण करण्याचा पराक्रम इंडो सायकलिस्ट क्लबच्या तीन तरुणांनी केला. चार राज्य, २२ जिल्हे, ११ मोठे घाट तसेच महामार्ग, डोंगर रांगा, किनारपट्टीचा प्रदेश व दोन घनदाट जंगले पार करून

पिंपरी : साडे सात दिवसांत चिंचवड ते कन्याकुमारी (तामिळनाडू) सायकल प्रवास जलदगतीने पूर्ण करण्याचा पराक्रम इंडो सायकलिस्ट क्लबच्या तीन तरुणांनी केला. चार राज्य, २२ जिल्हे, ११ मोठे घाट तसेच महामार्ग, डोंगर रांगा, किनारपट्टीचा प्रदेश व दोन घनदाट जंगले पार करून क्लबचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे, सदस्य शंकर गाढवे व उद्योजक हाज्जी देवनीकर यांनी ही मोहीम पूर्ण केली. त्यांच्याकडून १६३८ किलोमीटरचा प्रवास व १२,२३६ मीटरचे एलेवेशन कव्हर झाले.८ डिसेंबर रोजी सकाळी चार वाजता मोरया गोसावी गणपती मंदिर चिंचवड या ठिकाणाहून प्रवास सुरू केला. क्लब कोअर कमिटीचे अजित पाटील, विश्वकांत उपाध्याय, गणेश भुजबळ, अमित खरोटे तसेच ज्ञानप्रबोधिनीचे २० ते २५ विद्यार्थी, पालक व शिक्षक, अवधूत गुरव, अनुराग हिंगे आदी उपस्थित होते. गणपती बाप्पाला नारळ चढवून सातारा-कोल्हापूरच्या दिशेने सुरू झाला. ५ ते ७ किलो वजन सोबत घेऊन पूर्ण प्रकारे सेल्फ सर्पोटेड प्रकारातील ही मोहीम होती.पहिल्या दिवशी चिंचवड ते नेर्ले (कोल्हापूर) असा २०६ किमीचा तर दुसºया दिवशी नेर्ले (कोल्हापूर) ते धारवाड हा २२९ किमीचा टप्पा पार केला. नंतर धारवाड ते चित्रदुर्ग (२३३ किमी), चित्रदुर्ग ते म्हैसूर (२१८ किमी), म्हैसूर ते कालिकत (२३६ किमी), कालिकत ते कोची (२०० किमी) कोची ते तिरुअनंतपुरम (२१४ किमी), तिरुअनंतपुरम ते कन्याकुमारी (१०० किमी) हे टप्पे पार केले.चिंचवड ते नेर्ले (कोल्हापूर) दरम्यान कात्रज व खंबाटकी हे तर नेर्ले ते धारवाडदरम्यान तवांडी व बेळगावच्या आधी वंतामुरे घाट होते. तेथे उलट दिशेने येणाºया वाहनांचा त्रास झाला. धारवाड ते चित्रदुर्गदरम्यान बागेवाडी घाट लागला तर विरुद्ध दिशेने येणाºया वाºयामुळे अंतर कापणे सोपे गेले नाही. चित्रदुर्ग ते म्हैसूर हा मार्ग मुद्दाम निवडला होता. आम्ही सरळ बंगळुरू व मदुराईमार्गे ६ दिवसांत कन्याकुमारीला पोहोचलो असतो. पण तीन राज्यांत पसरलेले बंडीपूर व वायनाडचे घनदाट जंगल खुणावत होते. किनारपट्टीचा प्रदेशही आकर्षित करत होता. ओखी वादळ पण दूर गेल्याने किनारपट्टी भागातून सायकल चालवण्याचा आनंद घेता आला. बंडीपूरचे जंगल चंदन व हस्तिदंत तस्करीसाठी प्रसिद्ध आहे. वायनाडचे जंगल हत्ती व इतर हिंस्र पशूंसाठी प्रसिद्ध आहे. या दोन जंगलांमधील ८० किमीचा प्रवास अतिशय रोमांचकारी होता. वाटेत हरीण, हत्ती, माकड तसेच इतर प्राणी दिसले. या दोन जंगलांमध्ये पूर्वी म्हैसूरचा राजा शिकार करत असे. चंदनतस्कर वीरप्पनची याच परिसरात दहशत होती, असे कर्नाटक वन विभागाच्या अधिकाºयाने सांगितले. त्यांनी एक कर्मचारी वाहनही मदतीसाठी आमच्या मागे दिले. दख्खनच्या पठारावरून आम्ही पाचव्या दिवशी किनारपट्टी भागात म्हणजेच कालिकतमध्ये प्रवेश केला.कालिकत येथील क्लबच्या सदस्यांनी स्वागत करून पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. कालिकत पेडलर्सचे सदस्य आमच्या सोबत २० किमीपर्यंत आले. कालिकत ते कोचीदरम्यानचा मार्ग सरळ होता. पण हवामानातील आद्रता जाणवत होती. कोची ते तिरुअनंतपुरम हा प्रदेश निसर्गाने मुक्त उधळण केल्याप्रमाणे सुंदर आहे. तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शन घेऊन तामिळनाडूमध्ये प्रवेश केला. दरम्यान मुरुगन उत्सव चालू असल्याने भाविकांची मिरवणूक चालू होती.पुढे पाऊस सुरू झाला आणिआम्ही नागरकॉईल मार्गे दुपारी१२ वाजता कन्याकुमारीमध्येप्रवेश केला.रोज २२० किलोमीटरचा पल्लामहाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या चार राज्यांमधून सायकल प्रवास केला. पर्यावरण, सायकल वापर व आरोग्य, बदलती शिक्षण पद्धती किंवा शिक्षणाचे झालेले बाजारीकरण थांबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळीच दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई व्हावी. शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. दररोज ८० ते १०० किलोमीटर सायकलिंगच्या सवयीमुळे प्रवास अवघड गेला नाही. रोज साधारण २२० किलोमीटर सायकल प्रवास केला गेला. साधारणत: पहाटे ५ ते दुपारी १२ पर्यंत सायकलिंग १२ ते ४ पर्यंत विश्रांती आणि ४ ते ८ पर्यंत सायकलिंग व पुन्हा ८ ते पहाटे ४ पर्यंत झोप अशा पद्धतीचा दिनक्रम होता.महाराष्ट्र, कर्नाटक , केरळ व तामिळनाडू या सर्व राज्यांतील लोकांचे प्रेम मिळाले. आपुलकीने सर्व चौकशी करत होते. त्यांना आमच्या मोहिमेबद्दल खूप उत्सुकता वाटत होती. अनेकदा लोकांनी घरी येण्याचा आग्रह केला. पण, प्रवासाच्या नियोजनामुळे जाता आले नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड