शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"द्राक्ष पीकांसाठी चीन महत्त्वाची बाजारपेठ, पण स्थानिक बाजारपेठा मजबूत कराव्यात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 21:34 IST

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ मेळावा

पुणे/पिंपरी :  द्राक्ष पीकांसाठी चीन ही महत्वाची बाजारपेठ आहे. मात्र, कोरानामुळे आलेल्या निर्बंधामुळे निर्यात झाली नाही. युक्रेन आणि  रशियाच्या युद्धाचा परिणाम पीकावर झालेला आहे. द्राक्ष पीकात महाराष्ट्र देशात अग्रणी असून २ टक्के निर्यात केली जाते. तसेच ९८ टक्के  स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे विकली जातात. स्थानिक बाजारपेठ मजबूत करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा खासदार शरद पवार यांनी वाकड येथे रविवारी व्यक्त केली .

बंगळूर- पुणे-मुंबई महामार्गावरील वाकड येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेचा मेळावा झाला, उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, कृषी आयुक्त धीरज कुमार, डॉ. आर. जी सोमकुअर, डॉ. एस जैन, डॉ.अनुपम कश्यपी, सोपान कांचन, संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, चेअरमन चंद्रकांत लांडगे, डॉ. जी. एस प्रकाश, भारत शिंदे, कैलास मोते, मगर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘शेती व्यवसायात भविष्यात आधुनिकता कशी आणता येईल. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ही जबाबदारी सरकारची आहे. विज्ञान आणि शेतीचा समन्वय साधण्याची गरज आहे. तसेच द्राक्ष बागायतदारांप्रमणेच आंबा, केळी अशा पीकांच्या संघटना निर्माण होण्याची गरज आहे. द्राक्ष निर्यात, वाईन, बेदाणा यांचबरोबर ज्यूस आणि कोल्ड स्टोरेज आणि टेक्नॉलॉजी यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.’’

तर शेतकरी आत्महत्येकडे वळतो

पवार म्हणाले, ‘‘शेती अर्थशास्त्र, अर्थकारण, अर्थव्यवस्था हे जर व्यवस्थित राहिले नाही. तर कर्जाच्या बोजाखाली  निराश झालेला माणुस आत्महत्येच्या विचाराकडे जात असतो. हे चित्र शेतीच्या, देशाच्या दृष्टीने चांगले नाही. शेतीवरील खर्च कमी करणे, मर्यादित मनुष्य बळात उत्तम शेती करणे त्याचबरोबर जोड व्यवसायांचा विचार करण्याची गरज आहे.  

धीरज कुमार म्हणाले, ‘‘दोन वर्षात अडीच हजार कोटींचा एक्स्पोर्ट झाला आहे. देशात ४४ हजार शेतकरी एक्सपोर्ट केला आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र आणि एक्सपोर्ट महाराष्ट्रातून केला जात आहे.  ते प्रमाण ९८ टक्के आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला तारण्याचे काम शेतकºयांना केले आहे. ३८ लाख हेक्टर वर फळलागवड झाली. आता रोजगार हमी योजनेअंतर्गत द्राक्ष लागवडीसाठीही अनुदान दिले जात आहे.’’  

शिवाजी पवार प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘बारामतीमधून १९६० पासून संघाची सुरुवात झाली. संघाचे ३२ हजार सभासद आहे. देशात एकूण निर्यात होणाºया द्राक्ष पिकात ९८ टक्के पीक हे महाराष्टÑातील आहे. जागतिक पातळीवर गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिला जातो. यापुढे गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे.’’ दरम्यान, पंकज महाराज गावडे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीchinaचीन