शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

"द्राक्ष पीकांसाठी चीन महत्त्वाची बाजारपेठ, पण स्थानिक बाजारपेठा मजबूत कराव्यात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 21:34 IST

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ मेळावा

पुणे/पिंपरी :  द्राक्ष पीकांसाठी चीन ही महत्वाची बाजारपेठ आहे. मात्र, कोरानामुळे आलेल्या निर्बंधामुळे निर्यात झाली नाही. युक्रेन आणि  रशियाच्या युद्धाचा परिणाम पीकावर झालेला आहे. द्राक्ष पीकात महाराष्ट्र देशात अग्रणी असून २ टक्के निर्यात केली जाते. तसेच ९८ टक्के  स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे विकली जातात. स्थानिक बाजारपेठ मजबूत करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा खासदार शरद पवार यांनी वाकड येथे रविवारी व्यक्त केली .

बंगळूर- पुणे-मुंबई महामार्गावरील वाकड येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेचा मेळावा झाला, उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, कृषी आयुक्त धीरज कुमार, डॉ. आर. जी सोमकुअर, डॉ. एस जैन, डॉ.अनुपम कश्यपी, सोपान कांचन, संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, चेअरमन चंद्रकांत लांडगे, डॉ. जी. एस प्रकाश, भारत शिंदे, कैलास मोते, मगर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘शेती व्यवसायात भविष्यात आधुनिकता कशी आणता येईल. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ही जबाबदारी सरकारची आहे. विज्ञान आणि शेतीचा समन्वय साधण्याची गरज आहे. तसेच द्राक्ष बागायतदारांप्रमणेच आंबा, केळी अशा पीकांच्या संघटना निर्माण होण्याची गरज आहे. द्राक्ष निर्यात, वाईन, बेदाणा यांचबरोबर ज्यूस आणि कोल्ड स्टोरेज आणि टेक्नॉलॉजी यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.’’

तर शेतकरी आत्महत्येकडे वळतो

पवार म्हणाले, ‘‘शेती अर्थशास्त्र, अर्थकारण, अर्थव्यवस्था हे जर व्यवस्थित राहिले नाही. तर कर्जाच्या बोजाखाली  निराश झालेला माणुस आत्महत्येच्या विचाराकडे जात असतो. हे चित्र शेतीच्या, देशाच्या दृष्टीने चांगले नाही. शेतीवरील खर्च कमी करणे, मर्यादित मनुष्य बळात उत्तम शेती करणे त्याचबरोबर जोड व्यवसायांचा विचार करण्याची गरज आहे.  

धीरज कुमार म्हणाले, ‘‘दोन वर्षात अडीच हजार कोटींचा एक्स्पोर्ट झाला आहे. देशात ४४ हजार शेतकरी एक्सपोर्ट केला आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र आणि एक्सपोर्ट महाराष्ट्रातून केला जात आहे.  ते प्रमाण ९८ टक्के आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला तारण्याचे काम शेतकºयांना केले आहे. ३८ लाख हेक्टर वर फळलागवड झाली. आता रोजगार हमी योजनेअंतर्गत द्राक्ष लागवडीसाठीही अनुदान दिले जात आहे.’’  

शिवाजी पवार प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘बारामतीमधून १९६० पासून संघाची सुरुवात झाली. संघाचे ३२ हजार सभासद आहे. देशात एकूण निर्यात होणाºया द्राक्ष पिकात ९८ टक्के पीक हे महाराष्टÑातील आहे. जागतिक पातळीवर गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिला जातो. यापुढे गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे.’’ दरम्यान, पंकज महाराज गावडे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीchinaचीन