शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जमिनीच्या भावामुळे बहिणीचा भाऊ दुरावला, सिमेंटच्या जंगलामुळे नात्यामध्ये निर्माण होतोय दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:10 IST

भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचे पवित्र नाते घट्ट करणारा सण पूर्वीपासून शहरात व ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. परंतु...

वडगाव मावळ - भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचे पवित्र नाते घट्ट करणारा सण पूर्वीपासून शहरात व ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. पंरतु या सणाचे स्वरूप काही वर्षापासून बदलत चालले आहे. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने बहिणीला जमिनीचा व संपत्तीचा हिस्सा नाकारणाऱ्या काही नगरगठ्ठ भावांमुळे या पवित्र सणात दुरावा आल्याचे दिसून येत आहे.भाऊबीज सणाला भाऊ बहिणीला तिच्या सासरी जाऊन बहिणीकडून ओवाळून घेतो. आपल्या शक्तीनुसार तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून साडी,  मुलांना कपडे, म्हणून भेटवस्तू देतो, असे चित्र पूर्वीपासून दिसत आहे. परंतु अलीकडे काही वर्षापासून काही निगरगठ्ठ भावांनी या पवित्र सणाला बहिणींकडे जाण्याचे टाळले आहे. शहर असो किंवा ग्रामीण भाग असो या ठिकाणी जमिनीला सोन्यापेक्षा अधिक भाव मिळत आहे. जिकडे तिकडे बांधकामे जोमात सुरू आहेत. काही जमीन मालकांनी स्वत:च्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकणे, अथवा ४० ते ६० टक्क्यांनी त्यांच्याशी भागीदारीत सदनिका, बंगले, रो-हाऊस बांधणे याकडे कल वाढला आहे. या जमिनींच्या व्यवहारासाठी वारस हक्काने बहिणीचे नाव लागल्याने तिच्या सहीला किंवा अंगठ्याला फार महत्त्व आले आहे. बहिणीला हिश्श्याचे पैसे न देणयासाठी काही निगरगठ्ठ भावांनी बहिणीचा तसेच तिच्या पतीला दमदाटी करून वारसा हक्काने उता-यावरील नावे कमी करण्यासाठी प्रयत्नही केला आहे. गेल्या काही वर्षात भाऊबीज सणाचे स्वरूप बदलले आहे.पूर्वी खेड्यापाड्यात जायला वाहणांची सोय नव्हती. बहिणीकडे जाण्यासाठी बैलगाडीतून किंवा पायी जात असत. आता चालकाची व इतर वाहनांची सोय झाली आहे. जमिनींचे व्यवहार झालेल्या काही कुटुंबात बहिणीला कायदेशीररित्या तिचा समान हिस्सा असल्याने तसेच जमिनीची विक्री करताना काहीही न मागता सही केल्याने समजूतदार भावांकडून भाऊबीजेनिमित्त पुढे करून किमती साडीसह, सोन्याचे दागिने, चारचाकी किंवा दुचाकी वाहणे दिल्याची उदाहरणे आहेत.

काही बहिणींची संपत्ती हिस्सा न घेताच त्यांचे कायद्यानुसार जमिनीच्या उताºयावर नाव लागल्याने हिस्सा मागितल्याने काही स्वार्थ भावांनी भाऊबीजीला बहिणीकडे जाणे बंद केले आहे. त्यामुळे अनेक बहिणींना भाऊबीजीसाठी दिवसभर भावाची वाट पाहून भाऊ न आल्याने अखेर रात्री चंद्रालाच ओवाळणे भाग पडल्याची उदाहरणे घडली आहेत.काही बहिणींची संपत्ती हिस्सा न घेताच त्यांचे कायद्यानुसार जमिनीच्या उताºयावर नाव लागल्याने हिस्सा मागितल्याने काही स्वार्थी भावांनी भाऊबीजीला बहिणीकडे जाणे बंद केले आहे. त्यामुळे अनेक बहिणींना भाऊबीजीसाठी दिवसभर भावाची वाट पाहून भाऊ न आल्याने अखेर रात्री चंद्रालाच ओवाळणे भाग पडल्याची उदाहरणे घडली आहेत. तर काही भाऊ पत्नीच्या माहेरकडील शेतीत हिस्सा मिळण्यासाठी कोर्ट कचेरी करून हिस्सा मिळविताना दिसत आहेत. मात्र हेच भाऊ बहिणीला हिस्सा नाकारत आहेत.

टॅग्स :DiwaliदिवाळीFamilyपरिवार