शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची एकसंधता विखुरण्यासाठी जातीच राजकारण चालवलं जातंय; राज ठाकरेंची टीका

By विश्वास मोरे | Updated: January 7, 2024 17:24 IST

वीज, पाणी, रस्ते तीच आश्वासने दिली जात आहेत. आम्ही पुढे कधी जाणार, मला निवडणुका लढवताना आता लाज वाटते.

चिंचवड : आज जाती-पातीच राजकारण जे चालत आहे, ते स्वतःहून चालत नाही आहे. ते चालवले जात आहे, महाराष्ट्र एक संघ राहू नये, याच्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत आणि आपणं गाफील आहोत. काही नेते सगळं घडवून आणत आहे,  एकत्रीकरण विसरून टाकण्याचे काम केले जात आहे, अशी टीका मनसेचे राज ठाकरे यांनी चिंचवड येथे केली. 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. प्रसिद्ध नाटककार आणि अर्थतज्ञ डॉ. दीपक करंजकर यांनी नाटक आणि मी या विषयावर ठाकरे यांची मुलाखत घेतली. नाट्य संस्कृती, सध्या सुरू असणाऱ्या जातीपातीचे राजकारण, कलावंतांचा सन्मान, आवडणार नाटक, कलाभान जपण्याची गरज आहे, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.

एकेमकाना आद्या पाद्या अंड्या अशा हाका मारू नका!

नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर राज ठाकरे काही कलावंतांचे कान टोचले. ठाकरे म्हणाले, बाहेरच्या राज्यातील कलावंत पाहतो आणि आपल्या कलावंता मध्ये काही फरक आहेत. एकमेकांना मान दिला नाही , एकेमकाना आद्या पाद्या अंड्या अशा हाका मारू नका. रजनीकांत आणि इलाही राजा एकत्र बसून दारू पीत असतील, पण सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना खूप सन्मान देतात.''

ठाकरे म्हणाले, शरद पवार आता समोर आले, तर मी त्यांना वाकून नमस्कार करीन, कारण ते एक बुजुर्ग नेता आहेत  व्यासपिठावर काय बोलेन!  हा भाग वेगळा सन्मान द्यावा लागतो.''

आपण पुढे कधी जाणार

राज ठाकरे म्हणाले, गेली ७० वर्ष माझा आजोबा, काका हेच म्हणायचे. मी तेच म्हणतोय.  विज पाणी रस्ते तीच आश्वासने दिली जात आहेत. आम्ही पुढे कधी जाणार. मला निवडणुका लढवताना आता लाज वाटते. 

जमीन चलाखीने विकत घेतली जातीय!

ठाकरे म्हणाले, मी बोलत राहणार, सतत बोलत राहणार मराठी माणसाला जागं करत राहणार आहे. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे , जमीन चलाखीने विकत घेतली जातीय. शिवडी-न्हावा -शेवा रस्ता होईल तर रायगड जिल्हा बरबाद होईल.'

सुशिक्षितांनी राजकारणात यायला हवे! 

ठाकरे म्हणाले, मध्यमवर्गीयांना राजकरणात आणि समाजकारनात यावं लागेल. केवळ सुशिक्षत होऊन चालणार नाहीत तर सुज्ञ असावे लागेल. बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या मात्र त्या सुज्ञ होत्या  तुमची जमीन म्हणजे तुमचं अस्तित्व ,जमीन गेली भाषा गेली तर कोण तुम्ही ?''

मतदारांनी चुकाना चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला हव,  जे चुकले ते त्यांना घरी बसवा!

नाट्य क्षेत्र समृध्द करण्यासाठी मी पुढाकार घेईल राजकरण्याना सांगेन तुम्ही एकत्र तर या. आपल्या बलस्थानामध्ये नाट्य क्षेत्र प्रथम हे समजून घ्या हे वाढवायला हवं , हे नाही करणार तर उपयोग काय ? महाराष्ट्राने पुन्हा एकदा मोठा विचार केला पाहिजे. शिक्षा देत नाही तोपर्यंत सुधारणा होत नाही, मतदारांनी चुकाना चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला हव, जे चुकले ते त्यांना घरी बसवा.''

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेartकलाMaharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिकPoliticsराजकारण