शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

खड्डे बुजविण्यास सुरुवात; वाहनचालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 03:45 IST

वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर या साधारणत: २ ते ३ किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

रावेत : वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर या साधारणत: २ ते ३ किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे. नुकत्याच दमदार सुरू झालेल्या पावसाने परिसरातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वाल्हेकरवाडी-रावेत रस्त्यांची चाळण झाली होती. या बाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची महापालिकेच्या ब प्रभाग प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन रस्त्यावरील काही खड्डे मुरूम टाकून बुजविण्यास सुरुवात केली आहे.या मुख्य रस्त्या लगत असणाऱ्या एकवीरा कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी आणि नंदनवन कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ निर्माण झालेले मोठे खड्डे खडी टाकून महापालिका प्रशासनाने बुजविल्याने येथील रहिवाशांना होणारा त्रास कमी झाला आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने येथे अपघात नित्याचे झाले आहेत. रस्त्यांवर खड्डे आणि त्यातून चिखल अंगावर उडवत वेगाने जाणारी वाहने यांमुळे चालायचे तर कुठून या प्रश्नाने नागरिक हैराण झाले होते. मागील काही दिवसांपासून खºया अर्थाने दमदार पावसास सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते खचण्यास सुरवात झाली आहे. या रस्त्यांवर तर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना, वाहनचालकांना खो खो खेळत या रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. त्यातच पावसाने जोर धरल्याने रस्त्यांची वाताहात झाली आहे. मात्र स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटत दर्जेदार पायाभूत सुविधांचा गवगवा करणाºया महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या दुरवस्थेकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. परिणामी रस्ते खड्ड्यांनी भरलेले दिसून येत आहेत. पावसात त्या खड्ड्यांमध्ये साचणाºया पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर वाहनधारकांना त्यातून जाताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी रस्ता उंच तर काही ठिकाणी सखल झाल्याने या भागात अपघात होत आहेत. या भागातील रस्त्यांची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावरून दररोज वाहनांवर जाणाºया वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.वाल्हेकरवाडी-रावेत रस्ता येथील शेतकºयांच्या शेतीतून जातो. त्यांना प्राधिकरण प्रशासनाकडून जागेचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयाने त्यांच्या जागेतून जाणाºया रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रशासनास विरोध केला आहे. त्यामुळे साधारण २५० मीटर अंतरावरील खड्डे बुजविता आले नाहीत. त्यामुळे खड्डे ‘जैसे थे’ आहेत.या रस्त्यासाठी शेतकºयांचा विरोध कायम असल्याने उर्वरित भागातील खड्डे बुजविण्यास अडचण निर्माण होत आहे़ आम्ही या बाबत सदर शेतकºयास भेटून खड्डे बुजविण्यासंबंधी आपण अडवणूक करू नये, अशी विनंती केली होती़ परंतु सदर शेतकरी आपल्या मतावर ठाम असल्याने उर्वरित रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत़ परंतु लवकरच संबंधित शेतकरी, प्रभागातील सर्व नगरसेवक आणि प्राधिकरण प्रशासन यांची बैठक आयोजित करू. - करुणा चिंचवडे, ‘ब’ प्रभाग अध्यक्षा

टॅग्स :ravetरावेतPotholeखड्डे