शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या : पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 16:39 IST

रामजन्मभूमिच्या वादावर 9 नाेव्हेंबरला निर्णय येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमिवर लाेणावळा शहरात धार्मिक तेढ निर्माण हाेणार नाही याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पाेलीस निरीक्षकांनी केले.

लोणावळा : राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्ष, 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिद व श्रीराम जन्मभूमी यावर होणारा निर्णय तसेच 10 नोव्हेंबर रोजी होणारी ईद ए मिलाफ ची मिरवणुक या कोणत्याही घटनेमुळे लोणावळा शहरात धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता समाजातील प्रत्येक घटकांने घ्यावी असे आवाहन लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी आज पार पडलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केले.  

पाटील म्हणाले 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिद व श्रीराम जन्मभूमी याबाबतचा निर्णय होणार आहे. जो काही निर्णय लागेल तो न्यायालयीन निर्णय असून सर्वांवर बंधनकारक असणार आहे. या निर्णयाचे स्वागत अथवा त्याविरोधात कोणीही प्रतिक्रिया देऊन आपल्या शहरातील वातावरण खराब करु नये. काही समाजकंटक मंडळी या घटनांचा फायदा घेत समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न करतात. अशा मंडळींना जागीच आळा घालण्याकरिता प्रत्येकाने जागृती राहणे गरजेचे आहे. लोणावळा शहर पर्यटनस्थळ असल्याने याठिकाणी घडणार्‍या घटनांचा परिणाम दुरगामीपणे या शहराच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. लोणावळा शहरात पुर्वीपासून सर्व जाती धर्माची लोकं सर्वधर्म समभावाने एकत्र राहतात, सर्व सण उत्सव साजरे करतात. असेच खेळीमेळीचे वातावरण शहरात राहणे अपेक्षित आहे. 

शहराबाहेरुन कोणी तरी येऊन येथिल शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याला तात्काळ रोखायला हवे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कोणत्याही राजकिय पक्षाचा किंवा संघटनेचा निर्णय नसून तो घटनेच्या आधारावर सर्व साक्षी पुरावे याचा अभ्यास करुन विधीगत निर्णय आहे. याचा कोणीही फायदा घेण्याची आवश्यकता नाही. निर्णय कोणताही असला तरी तो कायदेशिरपणे स्विकारणे बंधनकारक असल्याने त्यांचा परिणाम येथे होता कामा नये, अशा घटनांमध्ये दाखल झालेले गुन्हे हे आपल्या मुलांचे आयुष्य खराब करु शकतात याकरिता पालकांनी मुलांना सक्त ताकिद द्यावी अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. उपस्थित शांतत‍ कमिटी सदस्यांनी देखिल याकाळात पोलीसांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत मते व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlonavalaलोणावळाPoliceपोलिसRam Mandirराम मंदिर