शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 01:19 IST

अमृता फडणवीस : महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य हवे

पुणे : समाजात लहान मुला-मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना संतापजनक असून, पुरूषांमधील ही दानवी वृत्ती मारायला पाहिजे. बालकांवर अत्याचार करणाºया आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी लहान मुलांवरील गंभीर घटनांवर बोट ठेवले. खास महिलांसाठी दागिने व कपड्यांच्या ‘कुटॉर’ या प्रदर्शनाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महिला सक्षमीकरणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, की आज समाजातच नव्हे, तर कुटुंबांमध्येही महिलांवर अत्याचार होत आहेत. आपले मूल्य आपल्यालाच समजायला हवे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधी महिलांनी महिलांच्या पाठीशी उभे राहणे फार महत्त्वाचे आहे. एकीकडे महिला प्रगतिपथावर जात आहेत तर दुसरीकडे त्या अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. महिलांवरील अत्याचारासंदर्भात एकत्रित आवाज उठविण्याची गरज आहे. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा होण्याचा दर वाढला असून हे सुचिन्ह आहे. मुलगी झाल्यानंतर कन्या भाग्यश्री योजना वगैरे राबविल्या जात आहेत मात्र त्या वरवरच्या आहेत. मुलगी झाल्यानंतर काय, असा प्रश्न पडतो तेव्हा विविध क्षेत्रांतील महिलांचे आदर्श पालकांच्या डोळ्यासमोर ठेवायला हवेत.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग केले जाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका होते. या ट्रोलिंगकडे कशा पद्धतीने पाहता, या विषयी विचारले असता त्या म्हणाल्या, की लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठीच आपण समाजमाध्यमांवर व्यक्त होत असतो आणि या माध्यमांवर ‘ट्रोलिंग’पासून कोणीही सुटत नाही. हे ट्रोलिंग आपण कसे घेतो ते महत्त्वाचे आहे. विचारांचे खंडन हे योग्य भाषेतच व्हायला हवे. परंतु ट्रोलिंगमधील महिलांसाठी अवमानकारक आणि दहशत पसरवू पाहणाºया पोस्ट मात्र निश्चित निंदनीय असून त्या थांबायला हव्यात. याबाबतीत गरज पडल्यास सायबर कायद्यांची मदत घ्यावी. मुख्यमंत्रीदेखील होणारी टीका सकारात्मक घेऊन त्याची दखल घेत सर्वसमावेशक चचेर्तून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.

आज ‘फॅशन आयकॉन’ अशी तुमची एक प्रतिमा निर्माण झाली आहे, या विषयी सांगताना त्या म्हणाल्या, मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही. परंतु ुमाझ्याकडून लोकांना प्रेरणा मिळावी असे मला वाटते. व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी कपडे आणि फॅशन मदत करत असली, तरी आत्मविश्वास ही व्यक्तिमत्त्वातील सर्वांत आवश्यक गोष्ट आहे. माझे अनेक कपडे ‘एनआयएफटी’ संस्थेच्या फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते याचा आनंद आहे.सध्याचे सरकार खºया अर्थाने ‘सक्षम’गेल्या पाच वर्षांत महिला सबलीकरण, जलयुक्त शिवारसारख्या अनेक चांगल्या योजनांची अंमलबजावणी झाली आहे. जे ५० वर्षांत झाले नाही ते पाच वर्षांत झाले आहे. सध्याचे सरकार हे खºया अर्थाने ‘सक्षम’ असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAmruta Fadnavisअमृता फडणवीस