शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा : आकुर्डीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 20:49 IST

शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा आहे.  

ठळक मुद्देपुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आंदोलन

पिंपरी : संविधानाची पायमल्ली करून केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे या सरकारने आणले आहेत. याविरोधात शेतकरी व कामगारांची एकजूट झाली आहे. सरकारला हे कायदे मागे घ्यावेच लागतील. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी देशभरातील जनता मंगळवारी भारत बंद आंदोलनात सहभागी होईल, असा विश्वास पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी व्यक्त केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत या मागणीसाठी शनिवारी आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शेतकरी व कामगार कायदे मागे घ्यावेत या मागणीचे फलक गळ्यात घालून आंदोलकांनी या वेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, कामगार संघटना प्रतिनिधी वसंत पवार, मनोहर गडेकर, दिलीप पवार, अनिल रोहम, मनोज कांबळे, नरेंद्र बनसोडे, युवराज दाखले, काशिनाथ नखाते, वसीम इनामदार आदी आंदोलनात सहभागी झाले होते. 

डॉ. कैलास कदम म्हणाले, दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र नवीन कायद्यामुळे कायम असलेले कामगार देखील बेरोजगारीच्या खाईत लोटले जाणार आहेत. शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा आहे.  

मानव कांबळे म्हणाले, शेतमजूर, शेतकरी आणि कामगार यांना न्याय देण्याऐवजी सरकार त्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे. उद्योगपतींच्या पैशावर हे सरकार स्थापन झालेले आहे. त्यांच्या विरोधात ‘जनशक्ती’ आता एकजूटीने लढणार आहे.

टॅग्स :akurdiआकुर्डीagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारFarmer strikeशेतकरी संप