शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा : आकुर्डीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 20:49 IST

शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा आहे.  

ठळक मुद्देपुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आंदोलन

पिंपरी : संविधानाची पायमल्ली करून केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे या सरकारने आणले आहेत. याविरोधात शेतकरी व कामगारांची एकजूट झाली आहे. सरकारला हे कायदे मागे घ्यावेच लागतील. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी देशभरातील जनता मंगळवारी भारत बंद आंदोलनात सहभागी होईल, असा विश्वास पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी व्यक्त केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत या मागणीसाठी शनिवारी आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शेतकरी व कामगार कायदे मागे घ्यावेत या मागणीचे फलक गळ्यात घालून आंदोलकांनी या वेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, कामगार संघटना प्रतिनिधी वसंत पवार, मनोहर गडेकर, दिलीप पवार, अनिल रोहम, मनोज कांबळे, नरेंद्र बनसोडे, युवराज दाखले, काशिनाथ नखाते, वसीम इनामदार आदी आंदोलनात सहभागी झाले होते. 

डॉ. कैलास कदम म्हणाले, दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र नवीन कायद्यामुळे कायम असलेले कामगार देखील बेरोजगारीच्या खाईत लोटले जाणार आहेत. शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा आहे.  

मानव कांबळे म्हणाले, शेतमजूर, शेतकरी आणि कामगार यांना न्याय देण्याऐवजी सरकार त्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे. उद्योगपतींच्या पैशावर हे सरकार स्थापन झालेले आहे. त्यांच्या विरोधात ‘जनशक्ती’ आता एकजूटीने लढणार आहे.

टॅग्स :akurdiआकुर्डीagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारFarmer strikeशेतकरी संप