शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांचे स्वरूप बदलले तरी पत्रकारितेची भूमिका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 16:45 IST

माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला.

पिंपरी  - माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला. भोसरी येथील रामस्मृती कार्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 12 वे अधिवेशन घेण्यात आले, अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या परिसंवादात मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंढे, ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे, तुळशीदास भोईटे, अशोक सोनवणे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने तसेच चंद्रकांत झुरंगे आदी उपस्थित होते.जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशिदास भोईटे  म्हणाले, आर्थिक उद्देश ठेऊन काम करणारे २ टक्के  पत्रकार असतील, पण ९८ टक्के पत्रकार संवेदनशील आहेत.पत्रकारांनी नकारात्मक राहू नये.समाजमाध्यमामुळे बातमी लपून राहत नाही इतराकडून ती व्हायरल झल्यावर त्याची दखल घ्यावी लागते.त्यामुळे समाजमाध्यमे महत्वाची ठरू लागली आहेत. दै.जनशक्तीचे कार्यकारी संपादक पुरुषत्तोम सांगळे म्हणाले, वृत्तपत्र हे पुर्वी संपादकाच्या नावाने ओळखले जायचे पण आता मालकाच्या नावाने  ओळखली जातात. हा बदल दिसून येतो. आजची पत्रकारिता भरकटलेली आहे. असे बोलले जाते, पण पत्रकारांनी सकारात्मक रहावे.वंसत मुंढे म्हणाले,सोशल मिडीयामुळे प्रत्येक माणूस पत्रकार झालेला आहे. माध्यमाच स्वरुप बदलेले असले तरी पत्रकारितेची भुमिका तिच आहे. प्रबोधन,समाजशिक्षण हीच पत्रकारितेची भूमिका कायम आहे. पत्रकारितेचा चौथा स्तंभ हा वर्तमानपत्राच्या मालिकाता स्तंभ होतोय का अशी परिस्थिती निर्माण होतय.माध्यामांच स्वरुप जरी बदलल असले तरी माध्यमांची भुमिका मात्र तीच आहे. पत्रकार संरक्षण कायद्यात अनेक त्रुटी आहेत,पत्रकारांना सेवा निवृत्ती दिली पाहिजे समाजातीलदोन वर्ग अपेक्षित आहेत, त्यामध्ये शेतकरी आणि पत्रकार यांचा समावेश आहे. त्यांचेच प्रश्न सरकारकडून सोडविले जात नाहीत.पत्रकार आर्थिकदृष्या सक्षम असला पाहिजे. तरच तो पत्रकारिता करु शकतो. याचाही विचार झाला पाहिजे, शासनाने त्यांना पेन्शन दिली पाहिजे, स्वरुप बदलल तरी पत्रकारितेच भुमिका तिच राहणार फक्त सरकारने पत्रकारांच्या प्रश्नाकडे  लक्ष दिले पाहिजे.माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले, पत्रकारिता वेगवान झाली आहे. पत्रकाराच्या संरक्षणाबदल कडक कायदा व्हायला व्हावा. पत्रकारांना मुक्तपणे लिहिता यावे. त्यांच्यासाठी शासनाने संदर्भ  ग्रंथालय उपलब्ध करून द्यावेत.

टॅग्स :Mediaमाध्यमेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र