शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

माध्यमांचे स्वरूप बदलले तरी पत्रकारितेची भूमिका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 16:45 IST

माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला.

पिंपरी  - माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला. भोसरी येथील रामस्मृती कार्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 12 वे अधिवेशन घेण्यात आले, अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या परिसंवादात मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंढे, ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे, तुळशीदास भोईटे, अशोक सोनवणे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने तसेच चंद्रकांत झुरंगे आदी उपस्थित होते.जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशिदास भोईटे  म्हणाले, आर्थिक उद्देश ठेऊन काम करणारे २ टक्के  पत्रकार असतील, पण ९८ टक्के पत्रकार संवेदनशील आहेत.पत्रकारांनी नकारात्मक राहू नये.समाजमाध्यमामुळे बातमी लपून राहत नाही इतराकडून ती व्हायरल झल्यावर त्याची दखल घ्यावी लागते.त्यामुळे समाजमाध्यमे महत्वाची ठरू लागली आहेत. दै.जनशक्तीचे कार्यकारी संपादक पुरुषत्तोम सांगळे म्हणाले, वृत्तपत्र हे पुर्वी संपादकाच्या नावाने ओळखले जायचे पण आता मालकाच्या नावाने  ओळखली जातात. हा बदल दिसून येतो. आजची पत्रकारिता भरकटलेली आहे. असे बोलले जाते, पण पत्रकारांनी सकारात्मक रहावे.वंसत मुंढे म्हणाले,सोशल मिडीयामुळे प्रत्येक माणूस पत्रकार झालेला आहे. माध्यमाच स्वरुप बदलेले असले तरी पत्रकारितेची भुमिका तिच आहे. प्रबोधन,समाजशिक्षण हीच पत्रकारितेची भूमिका कायम आहे. पत्रकारितेचा चौथा स्तंभ हा वर्तमानपत्राच्या मालिकाता स्तंभ होतोय का अशी परिस्थिती निर्माण होतय.माध्यामांच स्वरुप जरी बदलल असले तरी माध्यमांची भुमिका मात्र तीच आहे. पत्रकार संरक्षण कायद्यात अनेक त्रुटी आहेत,पत्रकारांना सेवा निवृत्ती दिली पाहिजे समाजातीलदोन वर्ग अपेक्षित आहेत, त्यामध्ये शेतकरी आणि पत्रकार यांचा समावेश आहे. त्यांचेच प्रश्न सरकारकडून सोडविले जात नाहीत.पत्रकार आर्थिकदृष्या सक्षम असला पाहिजे. तरच तो पत्रकारिता करु शकतो. याचाही विचार झाला पाहिजे, शासनाने त्यांना पेन्शन दिली पाहिजे, स्वरुप बदलल तरी पत्रकारितेच भुमिका तिच राहणार फक्त सरकारने पत्रकारांच्या प्रश्नाकडे  लक्ष दिले पाहिजे.माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले, पत्रकारिता वेगवान झाली आहे. पत्रकाराच्या संरक्षणाबदल कडक कायदा व्हायला व्हावा. पत्रकारांना मुक्तपणे लिहिता यावे. त्यांच्यासाठी शासनाने संदर्भ  ग्रंथालय उपलब्ध करून द्यावेत.

टॅग्स :Mediaमाध्यमेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र