शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Indrayani Polluted: बापरे केवढं हे प्रदूषण! इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली, चक्क बर्फवृष्टी झाल्याचा भास

By विश्वास मोरे | Updated: May 29, 2024 11:16 IST

लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीपात्र दूषित

पिंपरी: अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या देहू- आळंदीकरांची जीवनदायी असणाऱ्या इंद्रायणीनदीचे  पात्र फेसाळली आहे.  त्यामुळे बर्फवृष्टी झाल्याचा भास होता होत आहे. नदीप्रदूषणाकडे जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि पीएमआरडीचे दुर्लक्ष होते.

पुणे जिल्हयातील खेड आणि मावळ  तालुक्यातून इंद्रायणी नदी वाहते. लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीचे पात्र दूषित झाला आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण, नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे राज्य सरकारचे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होते.

सहा महिने झाले तरी...

गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मात्र नदी फेसाळण्याचं कारण अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. डिटर्जंटमुळे नदी फेसाळत आहे,  असा अजब अंदाज प्रदूषण नियंत्रण महामंडळ लावत आहे. 

चाकण परिसरातील सांडपाणी थेटपणे!

पीएमआरडीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण झालं आहे. तसेच चाकण परिसरातील निघोजे, मोई आणि चिंबळी या भागातील सांडपाणी थेटपणे नदीत सोडले जात आहे. त्याकडे पीएमआरडीएचे लक्ष नाही.

कालपासून पुन्हा नदी फेसाळली

इंद्रायणी नदीवर देहू आणि आळंदी ही प्रमुख तीर्थक्षेत्र येतात. आळंदी पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. कालपासून नदी फेसाळलेली आहे. बुधवारी सकाळी ही नदीची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले. सर्वत्र बर्फवृष्टी झाल्याचा भास होतो होता. 

सामाजिक आणि पर्यावरणवादी संघटनांनी केल्या तक्रारी!

आळंदीतील नदी प्रदूषणाबाबत जलदिंडी प्रतिष्ठान, इंद्रायणी सेवा संघ आदी संस्थांच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केलेल्या आहेत. नदी प्रदूषण रोखावे, तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीindrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणriverनदी