शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

Indrayani Polluted: बापरे केवढं हे प्रदूषण! इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली, चक्क बर्फवृष्टी झाल्याचा भास

By विश्वास मोरे | Updated: May 29, 2024 11:16 IST

लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीपात्र दूषित

पिंपरी: अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या देहू- आळंदीकरांची जीवनदायी असणाऱ्या इंद्रायणीनदीचे  पात्र फेसाळली आहे.  त्यामुळे बर्फवृष्टी झाल्याचा भास होता होत आहे. नदीप्रदूषणाकडे जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि पीएमआरडीचे दुर्लक्ष होते.

पुणे जिल्हयातील खेड आणि मावळ  तालुक्यातून इंद्रायणी नदी वाहते. लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीचे पात्र दूषित झाला आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण, नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे राज्य सरकारचे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होते.

सहा महिने झाले तरी...

गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मात्र नदी फेसाळण्याचं कारण अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. डिटर्जंटमुळे नदी फेसाळत आहे,  असा अजब अंदाज प्रदूषण नियंत्रण महामंडळ लावत आहे. 

चाकण परिसरातील सांडपाणी थेटपणे!

पीएमआरडीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण झालं आहे. तसेच चाकण परिसरातील निघोजे, मोई आणि चिंबळी या भागातील सांडपाणी थेटपणे नदीत सोडले जात आहे. त्याकडे पीएमआरडीएचे लक्ष नाही.

कालपासून पुन्हा नदी फेसाळली

इंद्रायणी नदीवर देहू आणि आळंदी ही प्रमुख तीर्थक्षेत्र येतात. आळंदी पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. कालपासून नदी फेसाळलेली आहे. बुधवारी सकाळी ही नदीची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले. सर्वत्र बर्फवृष्टी झाल्याचा भास होतो होता. 

सामाजिक आणि पर्यावरणवादी संघटनांनी केल्या तक्रारी!

आळंदीतील नदी प्रदूषणाबाबत जलदिंडी प्रतिष्ठान, इंद्रायणी सेवा संघ आदी संस्थांच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केलेल्या आहेत. नदी प्रदूषण रोखावे, तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीindrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणriverनदी