शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

‘वायसीएम’मध्ये अजब कारभार

By admin | Updated: January 11, 2016 01:13 IST

जखमी झालेल्या एका बालकाला वायसीएममध्ये नेण्यात आले. डोक्याला मार लागला असल्याने सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्याला तातडीक विभागात नेले.

पिंपरी : जखमी झालेल्या एका बालकाला वायसीएममध्ये नेण्यात आले. डोक्याला मार लागला असल्याने सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्याला तातडीक विभागात नेले. डॉक्टरांनी पाहिले. टाके घालावे लागतील, असे सांगून बाहेरील औषध दुकानातून त्यांना रुग्णालयीन साहित्य आणण्यास सांगितले. टाके घालण्याच्या दोऱ्यापासून ते केस काढण्यासाठी लागणारे ब्लेड अशा विविध वस्तू बाहेरून विकत आणण्याची सक्ती करण्यात आली. वायसीएममध्ये मिळालेल्या कटू अनुभवामुळे उपचार अर्धवट सोडून ती महिला मुलाला घेऊन गावी निघून गेली. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र सर्व साहित्य रुग्णालयात उपलब्ध होते. कोणालाही सक्ती केली जात नाही, असे स्पष्टीकरण दिले. घराच्या जिन्यातून पडून काळेवाडी, रहाटणीत एक मुलगा गंभीर जखमी झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या आईने त्याला वायसीएम रुग्णालयात नेले. या शहरात नातेवाइकांकडे आलेली महिला रुग्णालयातील तातडीक विभागात गेल्यानंतर बाहेरच्या औषध दुकानातून वस्तू आणण्याची यादी त्यांना डॉक्टरांनी दिली. मुलाला तेथेच सोडून एका कार्यकर्त्याबरोबर धावपळ करण्याची वेळ त्या महिलेवर आली. त्या महिलेला सर्व काही नवीन होते. रुग्णालयीन साहित्य रुग्णालयातच मिळते की, बाहेरून आणावे लागते याबद्दल काहीच माहिती नव्हते. परंतु डॉक्टरांनी यादी दिल्यानंतर त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या कार्यकर्त्याच्या लक्षात ही बाब आली. वाद घालण्यापेक्षा मुलावर उपचार होणे महत्त्वाचे असल्याने त्या कार्यकर्त्यानेच पदरमोड करून साहित्य आणून दिले. ते आणून दिल्यानंतर डॉक्टरांना या मुलाकडे पाहण्यास, त्याच्यावर उपचार करण्यास सवड मिळत नव्हती. महिलेची खर्च करण्याची ऐपत नव्हती. जवळ होती ती रक्कम बाहेरून औषध आणण्यासाठी खर्च झाली होती. अशातच डॉक्टरांनी मुलाचे सिटी स्कॅन करून घेण्याचा सल्ला दिला. महापालिकेचे रुग्णालय तरीही खर्च परवडणारा नाही, हे लक्षात येताच सिटी स्कॅनसाठी न थांबता तेथून निघून जाण्याचा निर्णय त्या महिलेने घेतला. वायसीएममध्ये आलेले कटू अनुभव महिलेला मदत करणाऱ्या कार्यकर्त्याने ‘लोकमत’कडे कथन केले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, तसेच डॉ. पवन साळवे यांच्याकडे याबाबत संपर्क साधण्यात आला. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयातच रुग्णालयीन साहित्य उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषध आणण्याची कधी सक्ती केली जात नाही. (वार्ताहर)