शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय मार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:23 IST

अपघातांच्या प्रमाणात वाढ : दीड वर्षात ५० जणांचा गेला बळी

राजुरी : अहमदनगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे.

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या दीड वर्षात महिन्यात जवळपास ४० ते ५० जणांनी आपला जीव या महामार्गावर गमावला आहे. पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याचे काम झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे.कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत (पेमदरा ते दांगटवाडी) तीस किलोमीटरच्या अंतरात १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ४० अपघात झाले आहेत. यामध्ये दहा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. दुखापतीशिवाय पाच अपघात झाले आहेत. यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २२ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी २५ झाले आहेत.

यात २0 पुरुष व पाच स्रियांचा समावेश आहे. चार ते पाच किरकोळ अपघात झाले असून, यात पाच पुरुष, तीन महिला जखमी झाले आहेत. अणे घाट उतरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. गुळंवाडीजवळ रस्त्याला खड्डे पडल्याने ४४ अपघात झाले होते. खड्डे बुजले असले तरी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. वाहनांच्या प्रचंड वेगामुळे समर्थ कॉलेजजवळ (बांगरवाडी) अपघात जास्त होतात. कॉलेजजवळ गतिरोधक नाही, त्यामुळे वाहनांचा वेग कमी होत नाही. येथेही अपघात मोठ्या प्रमाणात होतात. बेल्हे बायपासजवळ धोकादायक वळण आहे. येथे शाळा जवळच असल्याने विद्यार्थ्यांची येथे वर्दळ असते.

गतिरोधक असल्याने वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. अणे येथील सरदार पटेल हायस्कूलजवळ शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच राजुरी येथील गणेश सहकारी दूध संस्थेच्या गेटपाशी, तर राजुरी गावची स्मशानभूमी ही महामार्गाच्या कडेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होतात.अपघातांसाठी चालकच जबाबदारमहामार्ग वा रस्त्यांवर होणाºया अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसºया गाडीचा असो वा कुणीही. तांत्रिक बिघाडामुळे अपघात होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे कोणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे; परंतु फारच थोड्या कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. ९० टक्के चालक हे प्रशिक्षणाविनाच गाडी महामार्गावर आणतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. यामध्ये चारचाकी वाहनधारकांचे प्रमाण जास्त आहे. 

वाहनचालकांनी धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नये. रस्त्यात कुठेही वाहने उभी करू नयेत. गाडीच्या वेगावर नियंत्रण असावे, चारचाकी वाहनचालकाने व प्रवाशाने सीटबेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. रस्त्याच्या नियमांचे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मत व्यक्त केले.टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :kalyanकल्याण