शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय मार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:23 IST

अपघातांच्या प्रमाणात वाढ : दीड वर्षात ५० जणांचा गेला बळी

राजुरी : अहमदनगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे.

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या दीड वर्षात महिन्यात जवळपास ४० ते ५० जणांनी आपला जीव या महामार्गावर गमावला आहे. पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याचे काम झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे.कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत (पेमदरा ते दांगटवाडी) तीस किलोमीटरच्या अंतरात १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ४० अपघात झाले आहेत. यामध्ये दहा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. दुखापतीशिवाय पाच अपघात झाले आहेत. यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २२ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी २५ झाले आहेत.

यात २0 पुरुष व पाच स्रियांचा समावेश आहे. चार ते पाच किरकोळ अपघात झाले असून, यात पाच पुरुष, तीन महिला जखमी झाले आहेत. अणे घाट उतरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. गुळंवाडीजवळ रस्त्याला खड्डे पडल्याने ४४ अपघात झाले होते. खड्डे बुजले असले तरी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. वाहनांच्या प्रचंड वेगामुळे समर्थ कॉलेजजवळ (बांगरवाडी) अपघात जास्त होतात. कॉलेजजवळ गतिरोधक नाही, त्यामुळे वाहनांचा वेग कमी होत नाही. येथेही अपघात मोठ्या प्रमाणात होतात. बेल्हे बायपासजवळ धोकादायक वळण आहे. येथे शाळा जवळच असल्याने विद्यार्थ्यांची येथे वर्दळ असते.

गतिरोधक असल्याने वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. अणे येथील सरदार पटेल हायस्कूलजवळ शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच राजुरी येथील गणेश सहकारी दूध संस्थेच्या गेटपाशी, तर राजुरी गावची स्मशानभूमी ही महामार्गाच्या कडेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होतात.अपघातांसाठी चालकच जबाबदारमहामार्ग वा रस्त्यांवर होणाºया अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसºया गाडीचा असो वा कुणीही. तांत्रिक बिघाडामुळे अपघात होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे कोणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे; परंतु फारच थोड्या कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. ९० टक्के चालक हे प्रशिक्षणाविनाच गाडी महामार्गावर आणतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. यामध्ये चारचाकी वाहनधारकांचे प्रमाण जास्त आहे. 

वाहनचालकांनी धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नये. रस्त्यात कुठेही वाहने उभी करू नयेत. गाडीच्या वेगावर नियंत्रण असावे, चारचाकी वाहनचालकाने व प्रवाशाने सीटबेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. रस्त्याच्या नियमांचे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मत व्यक्त केले.टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :kalyanकल्याण