शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय मार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:23 IST

अपघातांच्या प्रमाणात वाढ : दीड वर्षात ५० जणांचा गेला बळी

राजुरी : अहमदनगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे.

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या दीड वर्षात महिन्यात जवळपास ४० ते ५० जणांनी आपला जीव या महामार्गावर गमावला आहे. पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याचे काम झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे.कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत (पेमदरा ते दांगटवाडी) तीस किलोमीटरच्या अंतरात १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ४० अपघात झाले आहेत. यामध्ये दहा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. दुखापतीशिवाय पाच अपघात झाले आहेत. यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २२ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी २५ झाले आहेत.

यात २0 पुरुष व पाच स्रियांचा समावेश आहे. चार ते पाच किरकोळ अपघात झाले असून, यात पाच पुरुष, तीन महिला जखमी झाले आहेत. अणे घाट उतरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. गुळंवाडीजवळ रस्त्याला खड्डे पडल्याने ४४ अपघात झाले होते. खड्डे बुजले असले तरी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. वाहनांच्या प्रचंड वेगामुळे समर्थ कॉलेजजवळ (बांगरवाडी) अपघात जास्त होतात. कॉलेजजवळ गतिरोधक नाही, त्यामुळे वाहनांचा वेग कमी होत नाही. येथेही अपघात मोठ्या प्रमाणात होतात. बेल्हे बायपासजवळ धोकादायक वळण आहे. येथे शाळा जवळच असल्याने विद्यार्थ्यांची येथे वर्दळ असते.

गतिरोधक असल्याने वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. अणे येथील सरदार पटेल हायस्कूलजवळ शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच राजुरी येथील गणेश सहकारी दूध संस्थेच्या गेटपाशी, तर राजुरी गावची स्मशानभूमी ही महामार्गाच्या कडेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होतात.अपघातांसाठी चालकच जबाबदारमहामार्ग वा रस्त्यांवर होणाºया अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसºया गाडीचा असो वा कुणीही. तांत्रिक बिघाडामुळे अपघात होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे कोणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे; परंतु फारच थोड्या कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. ९० टक्के चालक हे प्रशिक्षणाविनाच गाडी महामार्गावर आणतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. यामध्ये चारचाकी वाहनधारकांचे प्रमाण जास्त आहे. 

वाहनचालकांनी धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नये. रस्त्यात कुठेही वाहने उभी करू नयेत. गाडीच्या वेगावर नियंत्रण असावे, चारचाकी वाहनचालकाने व प्रवाशाने सीटबेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. रस्त्याच्या नियमांचे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मत व्यक्त केले.टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :kalyanकल्याण