शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या फायद्यासाठी- आदित्य ठाकरे

By रोशन मोरे | Updated: September 24, 2022 19:00 IST

गाजर नको तर रोजगार हवा....

पिंपरी : महाआघाडी सरकार सत्तेतून गेल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत अनेकदा गेले. मात्र, त्यांची ही दिल्लीवारी महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हती. तर, स्वत:च्या फायद्यासाठी होती अशी टीका माजी मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वडगाव मावळ येथे झालेले जनआक्रोश मेळाव्यात केली.वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारमुळे गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वडगावमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

आदित्य ठाकरे म्हणाले, आजचा जनआक्रोश मोर्चा हा सर्वसामान्य तरुणाचा आवाज आहे. राज्यातील आणि मावळातील तरुण यांच्यात सरकारबाबत राग आणि आक्रोश आहे. महाविकास आघाडी सरकार असते तर वेदांत प्रकल्प मावळमध्ये आला असता आणि त्याचा जल्लोष आपण साजरा केला असता. गेल्या दोन ते तीन महिन्यांत तरुणांना रोजगार मिळेल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

प्रकल्प गेल्याचे दुख: नाही पण...

वेदांताचे प्रमुख यांनी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचे दुःख नाही, कारण महाराष्ट्र प्रगत राज्य आहे आणि आपण आपली जागा निर्माण केली आहे. देशातील रोजगार ज्यांना आपल्याकडे खेचून नेऊशी वाटतो त्या राज्याबाबत मला काही वाटत नाही. कारण प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे. परंतु महाराष्ट्रमध्ये येणारा निश्चित प्रकल्प दुसरीकडे हलवणे अयोग्य आहे. 

गाजर नको तर रोजगार हवामहाराष्ट्राला आश्वासनांचे गाजर नको रोजगार हवा आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी पाठपुरावा करत आहे. राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर हलवले गेल्याने दोन लाख रोजगार हिरावले गेले आहे.ही घटना दुसऱ्या राज्यात घडली असती तर उद्योगमंत्री यांनी राजीनामा दिला असता अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAditya Thackreyआदित्य ठाकरे