शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विघातक प्रवृत्तीवर करणार कारवाई- रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:07 AM

पुण्यात कोरेगाव भीमा येथे दलित, मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केला, असे समाजविघातक कृत्य करणा-यावर कारवाई होईल. 

पिंपरी : पुण्यात कोरेगाव भीमा येथे दलित, मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केला, असे समाजविघातक कृत्य करणा-यावर कारवाई होईल. आरपीआय हा केवळ विशिष्ट समाजाचा पक्ष नसून त्यात अन्य समाजघटकांचा समावेश असावा, या भूमिकेतून सामाजिक सलोखा परिषद घेण्यात आली, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.आरपीआय शहर शाखेच्या वतीने पिंपरी येथे गुरुवारी सामाजिक सलोखा परिषद घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.ते म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणी दोषी असणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. मराठा समाजाला आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षण द्यावे, ब्राह्मण, मुस्लिम व अन्य समाजालाही आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. भाजपाबरोबर जाणे उचित ठरेल, असे यापूर्वी ज्यांना वाटायचे, त्यांना आता मी भाजपात असल्याने पोटशूळ उठले आहे. ते टीका करू लागले आहेत. भारिपा बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी यावे, आम्ही ऐक्य करण्यास तयार आहोत. त्यांच्या मागे समाज आहे, आमच्या मागेही समाज आहे. चळवळीत काम करणारे आणखी काही आहेत, त्यांच्याही मागे समाज आहे. वरकरणी ऐक्य नको. आरपीआय हा पक्ष अन्य समाज घटकांचा समावेश केल्याशिवाय वाढू शकणार नाही.या प्रसंगी शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब भागवत, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, रमेश चिमुरकर, तसेच वाहतूक आघाडीचे अजीज शेख, उद्योग आघाडीचे अमित मेश्राम, माजी नागरसेवक लक्ष्मण गायकवाड, पप्पू कागदे, सम्राट जकाते, के़ एम़ बुक्तर आदी उपस्थित होते.राणे यांनी आरपीआयमध्ये यावेमाजी मंत्री नारायण राणे यांना भाजपाकडून काही मिळत नसेल तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे, अशी आॅफर देत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री व आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले़ पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राणे यांना आरपीआयमध्ये आम्ही काही देऊ शकणार नाही, पण त्यांचा मराठा दलित ऐक्यासाठी उपयोग होईल.२०१९ मध्ये भाजपाच्या काही जागा घटतील, पण २५० पेक्षा कमी होणार नाहीत. एनडीए सत्तेत राहील, असे भाकीत त्यांनी केले. शिवसेना भाजपा स्वतंत्र लढल्यास दोघांचेही नुकसान होईल, शिवसेनेचे अधिक नुकसान होईल, उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यास आपण स्वत: पुढाकार घेणार आहे, तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.या वेळी शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, पुण्याचे उपमहापौर चंद्रकांत धेंडे, तसेच आरपीआय महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, उद्योग आघाडीचे अमित मेश्राम, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते़

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले