शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 02:58 IST

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मोशी : पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.बहुतांश अपघात हे चालकांच्या चुकीमुळेच होतात. वाहनात तांत्रिक बिघाड होऊन अपघाताचे प्रमाण फारच कमी आहे. यामुळे महामार्ग किंवा शहरात वाहन चालविणाºयांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मात्र आपल्याकडे प्रशिक्षणाशिवाय वाहन चालविणाºयांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्याची रुंदी तर वाढली; मात्र अपघातांची संख्याही वाढली आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने नागरिक स्वत:ची दुचाकी वाहने प्रवासाकरिता वापरतात. त्यामुळे दुचाकी अपघातांत मृत्युमुखी पडणाºयांची संख्या जादा आहे.दिवसा प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलीस असतात. मात्र रात्रीच्या वेळी पोलीस नसल्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. भरधाव वाहन चौकात आल्यावर त्याचा दुसºया वाहनाशी अपघात होतो. चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयामुळे अशा अपघातात चूक कोणाची, हे समजत असले तरी गेलेला जीव परत येऊ शकत नाही. हेल्मेट दुचाकीला अडकवून दुचाकी चालविणाºया एका २२ वर्षीय विवाहित तरुणीचा रस्ता दुभाजकाला धडकून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना याच आठवड्यात भोसरी येथे घडली. जर त्यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.जखमींवर वेळेत उपचार नाहीतअपघात झाल्यावर अनेकदा जखमी कित्येकवेळ रस्त्यावर पडून असतो. मात्र नागरिक त्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करीत नाहीत किंवा पोलिसांनाही कळवत नाही. त्यापैकी काही जण जखमीचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. जरी पोलीस आले तरी रुग्णवाहिका येण्यास उशीर होतो. अनेकदा गंभीर जखमी रुग्णास वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देतात. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात असल्यामुळे जखमींना वेळेत योग्य उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे.पोलिसांकडून योग्य उपाययोजनावाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, नशा करणे आणि सिग्नल तोडणे ही अपघाताची प्रमुख कारणे असली, तरी रस्त्यावरील खड्डे आणि अशास्त्रीय गतिरोधक हेदेखील अपघातास कारणीभूत ठरत आहेत. तसेच वाहन चालविताना स्टंट करणे, वेगात वाहन चालविण्याची स्पर्धा लावणे, ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे आदी प्रकारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नियमांचा भंग केला जातो. या विद्यार्थ्यांकडे अत्याधुनिक दुचाकी असल्याने ते कधीच पोलिसांच्या हाती लागत नाहीत. शहराच्या मुख्य चौकाचौकांत वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात