शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 02:58 IST

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मोशी : पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.बहुतांश अपघात हे चालकांच्या चुकीमुळेच होतात. वाहनात तांत्रिक बिघाड होऊन अपघाताचे प्रमाण फारच कमी आहे. यामुळे महामार्ग किंवा शहरात वाहन चालविणाºयांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मात्र आपल्याकडे प्रशिक्षणाशिवाय वाहन चालविणाºयांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्याची रुंदी तर वाढली; मात्र अपघातांची संख्याही वाढली आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने नागरिक स्वत:ची दुचाकी वाहने प्रवासाकरिता वापरतात. त्यामुळे दुचाकी अपघातांत मृत्युमुखी पडणाºयांची संख्या जादा आहे.दिवसा प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलीस असतात. मात्र रात्रीच्या वेळी पोलीस नसल्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. भरधाव वाहन चौकात आल्यावर त्याचा दुसºया वाहनाशी अपघात होतो. चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयामुळे अशा अपघातात चूक कोणाची, हे समजत असले तरी गेलेला जीव परत येऊ शकत नाही. हेल्मेट दुचाकीला अडकवून दुचाकी चालविणाºया एका २२ वर्षीय विवाहित तरुणीचा रस्ता दुभाजकाला धडकून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना याच आठवड्यात भोसरी येथे घडली. जर त्यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.जखमींवर वेळेत उपचार नाहीतअपघात झाल्यावर अनेकदा जखमी कित्येकवेळ रस्त्यावर पडून असतो. मात्र नागरिक त्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करीत नाहीत किंवा पोलिसांनाही कळवत नाही. त्यापैकी काही जण जखमीचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. जरी पोलीस आले तरी रुग्णवाहिका येण्यास उशीर होतो. अनेकदा गंभीर जखमी रुग्णास वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देतात. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात असल्यामुळे जखमींना वेळेत योग्य उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे.पोलिसांकडून योग्य उपाययोजनावाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, नशा करणे आणि सिग्नल तोडणे ही अपघाताची प्रमुख कारणे असली, तरी रस्त्यावरील खड्डे आणि अशास्त्रीय गतिरोधक हेदेखील अपघातास कारणीभूत ठरत आहेत. तसेच वाहन चालविताना स्टंट करणे, वेगात वाहन चालविण्याची स्पर्धा लावणे, ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे आदी प्रकारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नियमांचा भंग केला जातो. या विद्यार्थ्यांकडे अत्याधुनिक दुचाकी असल्याने ते कधीच पोलिसांच्या हाती लागत नाहीत. शहराच्या मुख्य चौकाचौकांत वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात