परीक्षेच्या आधी मुलांना खाऊ घाला ५ पदार्थ, एकाग्रता वाढेल आणि पाठ केलेलं आठवेल भरभर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2023 6:02 PM
1 / 8 काही मुलं भरपूर अभ्यास करतात. पण परीक्षेत नेमकं आठवतच नाही. किंवा काय लिहायचं सुचतच नाही. त्यामुळे मग सगळं येऊन- अभ्यास करूनही मार्क कमी पडतात. 2 / 8 असं तुमच्याही मुलांच्या बाबतीत होत असेल तर परीक्षेच्या आधी त्यांना कोणते पदार्थ खायला द्यावेत, याविषयी डॉ. नंदिता चक्रवर्ती यांनी टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपला दिलेली ही माहिती एकदा वाचा. 3 / 8 शरीराचा आणि मेंदूचा खूप जवळचा संबंध असतो. शरीर निरोगी असेल तर मेंदूही अधिक तल्लखपणे काम करतो. म्हणूनच मुलांच्या खाण्या-पिण्याकडे आणि विशेषत: परिक्षेदरम्यान जरा जास्त बारकाईने लक्ष द्या, असं त्या सांगतात. 4 / 8 डॉक्टर म्हणतात की अक्रोड, जवस असे ओमेगा ३ फॅटी ऍसिड असणारे पदार्थ मुलांचा मेंदू तल्लख ठेवतात. त्यामुळे परिक्षेपुर्वी त्यांना ते आवर्जून द्या. 5 / 8 ब्राऊन राईस, ओट्स या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समुळे मेंदूला एनर्जी मिळते. 6 / 8 बीन्स, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामुळे मेंदूचा अलर्टनेस आणि एकाग्रता वाढते, 7 / 8 परीक्षेच्या आधी नाश्ता करताना त्यामध्ये मुलांना एक फळ नक्की द्या. कारण फळांमध्ये असणाऱ्या ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे मेंदू अधिक सक्षमपणे काम करतो. 8 / 8 त्याचबरोबर शरीराला आणि मनाला आलेला थकवा दूर करण्यासाठी पाणी खूप गरजेचे आहे. म्हणून मुलांना परीक्षेच्यादरम्यान वारंवार पाणी प्यायला सांगा. लिंबू सरबत किंवा हर्बल टी देखील तुम्ही देऊ शकता. आणखी वाचा